शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

कोल्हापुरात आता संचारबंदी नाही, तर जमावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:13 IST

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीच्या निर्णयात राज्य शासनाने अंशत: बदल केला आहे. संचारबंदी मागे घेऊन फक्त जमावबंदी ...

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीच्या निर्णयात राज्य शासनाने अंशत: बदल केला आहे. संचारबंदी मागे घेऊन फक्त जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता येथून पुढे पाच जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते सकाळी ६ या वेळेत बाहेर फिरता येणार आहे, पण एकाच ठिकाणी पाचहून अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही.

ब्रिटनमध्ये कोरोनासदृश नव्या आजाराचा प्रसार झाल्याच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांच्या माध्यमातून प्रादुर्भाव वाढू नये, याची दक्षता म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली होती. तथापि यावरून बरीच टीका झाल्यानंतर या संचारबंदीच्या आदेशात किरकोळ सुधारणा केली गेली आहे. याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.

त्यानुसार कोल्हापुरातही या संचारबंदीच्या आदेशात किरकोळ बदल करून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत आता नागरिकांना मुक्तपणे संचार करता येणार आहे. पोलीस त्यांना अटकाव करणार नाहीत. पण पाचपेक्षा जास्त लोकांनी मात्र एकत्र जमता कामा नये, अशी अट घालण्यात आली आहे.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाो गलांडे यांच्याकडे विचारणा केली असता, शासन आदेशानुसार हा बदल लागू करण्यात आला आहे, त्याचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संचारबंदी शिथिल, तरी लाभ नाहीच

रात्रीच्या संचारबंदीतून नागरिकांची सुटका झाली असली तरी जमावबंदी कायम असल्यामुळे, सवलत मिळूनही काही उपयोग होणार नाही. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी आयोजनांवर निर्बंध कायम राहणार असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. रात्री अकरापर्यंतच हॉटेल्स सुरू ठेवण्याची मुभा असणार आहे.