शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

कोल्हापूर रेल्वे ‘ट्रॅक’वर

By admin | Updated: July 18, 2015 00:20 IST

केंद्राचा हातभार : मूलभूत गोष्टींचा विकास करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे

कोल्हापूर : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू असलेले कोल्हापूर रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मपासून पादचारी पुलासारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही झगडत असल्याचे चित्र असले, तरी देशभरातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या योजनेस केंद्राने मंजुरी दिली आहे. या योजनेतील ‘अ’ वर्गात कोल्हापूर स्थानकाचाही समावेश झाल्यामुळे कोल्हापूर रेल्वेस्थानक आता खऱ्या अर्थाने विकासाच्या ‘ट्रॅक’वर येण्याची आशा आहे.पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूर शहरातील या रेल्वेस्थानकाला १२४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २००३ साली या रेल्वेस्थानकाचे नामकरण ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज टर्मिनस’ करण्यात आले. यानंतरच्या काळात या रेल्वेस्थानकाच्या विकासासंदर्भात अनेक नेत्यांनी घोषणा केल्या; पण त्यांची पूर्तता झाली नाही. प्लॅटफॉर्मची संख्या वाढली नाही, ना पादचारी पूल बांधण्यात आले. कोल्हापुरातील राजकीय नेत्यांनीही या रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले नाहीत. केंद्राच्या रेल्वेस्थानक पुनर्विकास योजनेत कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर रेल्वेस्थानकामधील विविध समस्यांवर टाकलेला हा प्रकाशझोत. (प्रतिनिधी) अतिक्रमित जागा ताब्यात घेणे गरजेचे परीख पूल ते जुने रेल्वे फाटक या दरम्यान रेल्वेची सुमारे साडेबारा एकर जमीन आहे. यातील बहुतांश जागेत अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी जनरल डब्याने प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट खिडकी, सार्वजनिक प्रतीक्षागृह, सुलभ शौचालयांची उभारणी करता येणे शक्य आहे. यासाठी रेल्वेने ही अतिक्रमण केलेली जागा ताब्यात घेणे आवश्यक आहे. प्रतीक्षागृहांची संख्या पुरेशी नसल्यामुळे प्रवासी प्लॅटफॉर्मवर कुठेही बसतात. अनेकजण खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर उरलेसुरले तिथेच टाकून देतात. त्यामुळे रेल्वेस्थानकामध्ये अस्वच्छता हा कळीचा प्रश्न बनला आहे. जादा गाडीसाठी प्लॅटफॉर्मची संख्या वाढविणे आवश्यक आहे, अशी माहिती महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी दिली.प्लॅटफॉर्म कोल्हापूर रेल्वेस्थानकाला १२४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मध्य रेल्वेचे हे शेवटचे स्थानक आहे; पण कोल्हापूर-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, कोल्हापूर रेल्वे कोकणला जोडावी या मागण्या खूप जुन्या आहेत.रेल्वेस्थानकामध्ये तीन प्लॅटफॉर्म आहेत. यांपैकी एक आणि तीन क्रमांकांचे प्लॅटफॉर्म अपुरे आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ यांची उंची खूपच कमी असल्यामुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे; पण हे काम पूर्ण होण्यासाठी अद्यापही नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आवश्यक कामे :प्लॅटफॉर्मच्या संख्येत वाढ, सध्या केवळ तीनच प्लॅटफॉर्म आहेत. जनरल प्रतीक्षागृहे सुरू करणे शौचालयांची संख्या वाढविणे रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमणे काढणे परीख पूल आणि विक्रमनगर येथे पादचारी पूल उभारणे. पादचारी पुलाचा अभाव अन् जिवाला धोका परीख पूल येथे पादचारी पूल व्हावा, ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. याशिवाय विक्रमनगर येथेही पादचारी पुलाची आवश्यकता आहे. या ठिकाणी पादचारी पूल नसल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका आहे. रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणात या ठिकाणी पादचारी पूल होणे अत्यावश्यक आहे. आसनव्यवस्थेचा अभाव रेल्वेस्थानकाच्या तिकीटगृहामध्ये साधारण प्रवाशांसाठी आसनव्यवस्था नाही; त्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. गाडीला काही कारणाने विलंब झाला किंवा तिकिटांसाठी गर्दी असेल, तर प्रवाशांना बसण्याची अडचण निर्माण होते.