शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचं विमान ‘जमिनी’वरच

By admin | Updated: December 3, 2015 01:15 IST

विस्तारीकरण रखडले : जागेच्या पैशावरून तिढा; गडमुडशिंगीचाही विरोधात ठराव

संतोष मिठारी / कोल्हापूर वनविभागाला पर्यावरण निकषांप्रमाणे जमिनीच्या मोबदल्यात १ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी कुणी द्यावयाचा, या मुद्द्यावरून कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण, विकास आणि विमानसेवेचा प्रारंभ अडकला आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून याबाबत गेल्या पाच महिन्यांत संथगतीने कार्यवाही सुरू आहे. त्यातच गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने वनविभागाने जमीन देऊ नये, असा ठराव दिल्याने नवी अडचण निर्माण झाली आहे. धावपट्टीची दुरुस्ती, विमानसेवा चालविण्यास कंपन्यांचा नकार, विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारे अतिरिक्त भूसंपादन अशा कारणांमुळे गेल्या साडेचार वर्षांपासून कोल्हापूरची विमानसेवा बंद आहे. ती सुरू होण्यासह या ठिकाणी मोठी विमाने उतरविण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त ५.६० हेक्टर जमिनीची गरज आहे. यासाठी विमानतळाच्या गडमुडशिंगीकडील बाजूला असलेली वनविभागाची दहा हेक्टर पैकी पाच हेक्टर जमीन देण्यास वनविभाग तयार आहे. तांत्रिकदृष्ट्या विस्तारीकरणासाठी वनविभागाच्या जमिनीचा एकमेव पर्याय आहे. विमानतळासाठी संबंधित जमीन हस्तांतरित करण्याच्या बदल्यातील पर्यायी जमिनीसाठी जिल्हा प्रशासनाने शेंबवणे (ता. शाहूवाडी) या ठिकाणी देऊ केलेली जमीन वनविभागाला मान्य आहे. आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रस्तावानुसार वनविभागाला संबंधित जमिनीच्या मोबदल्यात अन्य जमिनीसह १ कोटी ७५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. एमआयडीसीकडून विमानतळाचे हस्तांतरण होताना राज्य शासनाकडून अतिरिक्त भूसंपादन विनामूल्य करून दिले जाईल, अशी तरतूद असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यानुसार कोल्हापुरातील प्राधिकरणाच्या कार्यालयाने मुंबई कार्यालयाला माहिती सादर केली आहे. शिवाय १९ नोव्हेंबरला राज्य शासनालाही याबाबतचे पत्र दिले आहे; पण महसूल विभागाची जमीन केवळ अशा पद्धतीने संपादित केली जाईल, अशी तरतूद असल्याचे समजते. गेल्या चार महिन्यांपासून प्राधिकरणाकडून वनविभागाला निधी देण्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. त्यातच वनविभागाची जमीन एखाद्या ग्रामपंचायतीच्या हद्दीशेजारी असल्यास, वनविभागाऐवजी अन्य कारणांसाठी जमीन वापरावयाची असल्यास संबंधित ग्रामपंचायतीची त्याला सहमती असणारा ठराव नव्या वनकायद्यानुसार आवश्यक आहे. त्यानुसार कोल्हापूर विमानतळासाठी वनविभागाची जमीन देताना गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक आहे. मात्र, या ग्रामपंचायतीने वनविभागाची जमीन विमानतळासाठी देण्यात येऊ नये, असा ठराव वनविभागाला दिला आहे. त्यामुळे विस्तारीकरणात नवी अडचण निर्माण झाली आहे. राज्य शासन व प्राधिकरणाची संथ कार्यवाही विमानतळाच्या विस्तारीकरणातील अडथळे वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, याबाबत कोल्हापूरचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले, पर्यायी जमिनीवर झाडे लावणे तसेच याबाबतच्या अन्य कामकाजासाठी १ कोटी ७५ लाख आवश्यक आहेत. शिवाय गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने दिलेला ठराव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. विमानतळाचे व्यवस्थापक ए. रझाक यांनी याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)