शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

कोल्हापूरचं विमान ‘जमिनी’वरच

By admin | Updated: December 3, 2015 01:15 IST

विस्तारीकरण रखडले : जागेच्या पैशावरून तिढा; गडमुडशिंगीचाही विरोधात ठराव

संतोष मिठारी / कोल्हापूर वनविभागाला पर्यावरण निकषांप्रमाणे जमिनीच्या मोबदल्यात १ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी कुणी द्यावयाचा, या मुद्द्यावरून कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण, विकास आणि विमानसेवेचा प्रारंभ अडकला आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून याबाबत गेल्या पाच महिन्यांत संथगतीने कार्यवाही सुरू आहे. त्यातच गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने वनविभागाने जमीन देऊ नये, असा ठराव दिल्याने नवी अडचण निर्माण झाली आहे. धावपट्टीची दुरुस्ती, विमानसेवा चालविण्यास कंपन्यांचा नकार, विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारे अतिरिक्त भूसंपादन अशा कारणांमुळे गेल्या साडेचार वर्षांपासून कोल्हापूरची विमानसेवा बंद आहे. ती सुरू होण्यासह या ठिकाणी मोठी विमाने उतरविण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त ५.६० हेक्टर जमिनीची गरज आहे. यासाठी विमानतळाच्या गडमुडशिंगीकडील बाजूला असलेली वनविभागाची दहा हेक्टर पैकी पाच हेक्टर जमीन देण्यास वनविभाग तयार आहे. तांत्रिकदृष्ट्या विस्तारीकरणासाठी वनविभागाच्या जमिनीचा एकमेव पर्याय आहे. विमानतळासाठी संबंधित जमीन हस्तांतरित करण्याच्या बदल्यातील पर्यायी जमिनीसाठी जिल्हा प्रशासनाने शेंबवणे (ता. शाहूवाडी) या ठिकाणी देऊ केलेली जमीन वनविभागाला मान्य आहे. आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रस्तावानुसार वनविभागाला संबंधित जमिनीच्या मोबदल्यात अन्य जमिनीसह १ कोटी ७५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. एमआयडीसीकडून विमानतळाचे हस्तांतरण होताना राज्य शासनाकडून अतिरिक्त भूसंपादन विनामूल्य करून दिले जाईल, अशी तरतूद असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यानुसार कोल्हापुरातील प्राधिकरणाच्या कार्यालयाने मुंबई कार्यालयाला माहिती सादर केली आहे. शिवाय १९ नोव्हेंबरला राज्य शासनालाही याबाबतचे पत्र दिले आहे; पण महसूल विभागाची जमीन केवळ अशा पद्धतीने संपादित केली जाईल, अशी तरतूद असल्याचे समजते. गेल्या चार महिन्यांपासून प्राधिकरणाकडून वनविभागाला निधी देण्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. त्यातच वनविभागाची जमीन एखाद्या ग्रामपंचायतीच्या हद्दीशेजारी असल्यास, वनविभागाऐवजी अन्य कारणांसाठी जमीन वापरावयाची असल्यास संबंधित ग्रामपंचायतीची त्याला सहमती असणारा ठराव नव्या वनकायद्यानुसार आवश्यक आहे. त्यानुसार कोल्हापूर विमानतळासाठी वनविभागाची जमीन देताना गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक आहे. मात्र, या ग्रामपंचायतीने वनविभागाची जमीन विमानतळासाठी देण्यात येऊ नये, असा ठराव वनविभागाला दिला आहे. त्यामुळे विस्तारीकरणात नवी अडचण निर्माण झाली आहे. राज्य शासन व प्राधिकरणाची संथ कार्यवाही विमानतळाच्या विस्तारीकरणातील अडथळे वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, याबाबत कोल्हापूरचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले, पर्यायी जमिनीवर झाडे लावणे तसेच याबाबतच्या अन्य कामकाजासाठी १ कोटी ७५ लाख आवश्यक आहेत. शिवाय गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने दिलेला ठराव जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. विमानतळाचे व्यवस्थापक ए. रझाक यांनी याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)