शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील गुंडाचा कोल्हापुरात खून

By admin | Updated: May 17, 2015 01:13 IST

गिरगावात सापडला मृतदेह : शिर, हातांचे पंजे नसलेले धड; मृत लहू ढेकणे जन्मठेप भोगणारा कैदी

कोल्हापूर / कळंबा : पुणे-सातारा जिल्ह्यात खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण करून दोन खून प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा झालेला, तसेच कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सहा महिन्यांपूर्वी पॅरोलवर बाहेर पडलेला अट्टल गुंड लहू रामचंद्र ढेकणे (वय ३९, रा. देगाव, ता. भोर, जि. पुणे) याचा कोल्हापुरातील गिरगाव परिसरातील गवती डोंगरावर निर्घृण खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. मारेकऱ्यांनी त्याचे शिर व हातांचे पंजे धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा खून अनैतिक संबंधातून की अन्य कोणत्या कारणातून झाला, याबाबत पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, मृतदेहाच्या पॅँटच्या खिशातील डायरी व मतदान ओळखपत्रामुळे ढेकणे याची ओळख पटली; परंतु मृतदेह त्याचाच आहे का, याची खात्री करण्यासाठी त्याचा भाऊ अंकुश ढेकणे याला पोलिसांनी कोल्हापुरात बोलावून घेतले. त्याने मृतदेह ओळखल्यानंतर पोलिसांनी रात्रीच मारेकऱ्यांच्या शोधासाठी पुणे, सातारा, जयसिंगपूर, इचलकरंजी, कऱ्हाड, आदी परिसरात पथके रवाना केली. गिरगाव परिसरातील गवती डोंगरावर शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गुराख्यांना अज्ञात तरुणाचा शिर व दोन्ही हातांचे पंजे नसलेला मृतदेह दिसून आला. या प्रकाराची माहिती त्यांनी पाचगावचे पोलीस पाटील तात्यासो पाटील यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता तरुणाचा निर्घृण खून केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची वर्दी त्यांनी करवीरचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना दिली. अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक ढोमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या अंगामध्ये निळसर शर्ट व करड्या रंगाची पॅँट होती. पॅँटमध्ये डायरी मिळून आली. त्याशेजारीच चष्मा पडला होता. पोलिसांनी डायरी पाहिली असता त्यामध्ये लहू ढेकणे असे लिहिलेले दिसले. तसेच भाऊ व वहिनी असे लिहून त्यापुढे मोबाईल नंबर लिहिला होता. पोलिसांनी या दोन्ही मोबाईलवर संपर्क साधला असता ढेकणे याच्या वहिनीशी संपर्क झाला. यावेळी त्यांना घटनेची माहिती देऊन त्याच्या भावाला कोल्हापुरात येण्यास सांगितले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह ‘सीपीआर’च्या शवागारात ठेवण्यात आला. पोलिसांनी मृतदेहाचे शिर व हाताचे पंजे शोधून काढण्यासाठी दोन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. श्वानपथकाद्वारे मारेकऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)