शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

पुण्यातील गुंडाचा कोल्हापुरात खून

By admin | Updated: May 17, 2015 01:13 IST

गिरगावात सापडला मृतदेह : शिर, हातांचे पंजे नसलेले धड; मृत लहू ढेकणे जन्मठेप भोगणारा कैदी

कोल्हापूर / कळंबा : पुणे-सातारा जिल्ह्यात खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण करून दोन खून प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा झालेला, तसेच कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सहा महिन्यांपूर्वी पॅरोलवर बाहेर पडलेला अट्टल गुंड लहू रामचंद्र ढेकणे (वय ३९, रा. देगाव, ता. भोर, जि. पुणे) याचा कोल्हापुरातील गिरगाव परिसरातील गवती डोंगरावर निर्घृण खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. मारेकऱ्यांनी त्याचे शिर व हातांचे पंजे धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा खून अनैतिक संबंधातून की अन्य कोणत्या कारणातून झाला, याबाबत पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, मृतदेहाच्या पॅँटच्या खिशातील डायरी व मतदान ओळखपत्रामुळे ढेकणे याची ओळख पटली; परंतु मृतदेह त्याचाच आहे का, याची खात्री करण्यासाठी त्याचा भाऊ अंकुश ढेकणे याला पोलिसांनी कोल्हापुरात बोलावून घेतले. त्याने मृतदेह ओळखल्यानंतर पोलिसांनी रात्रीच मारेकऱ्यांच्या शोधासाठी पुणे, सातारा, जयसिंगपूर, इचलकरंजी, कऱ्हाड, आदी परिसरात पथके रवाना केली. गिरगाव परिसरातील गवती डोंगरावर शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गुराख्यांना अज्ञात तरुणाचा शिर व दोन्ही हातांचे पंजे नसलेला मृतदेह दिसून आला. या प्रकाराची माहिती त्यांनी पाचगावचे पोलीस पाटील तात्यासो पाटील यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता तरुणाचा निर्घृण खून केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची वर्दी त्यांनी करवीरचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना दिली. अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक ढोमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या अंगामध्ये निळसर शर्ट व करड्या रंगाची पॅँट होती. पॅँटमध्ये डायरी मिळून आली. त्याशेजारीच चष्मा पडला होता. पोलिसांनी डायरी पाहिली असता त्यामध्ये लहू ढेकणे असे लिहिलेले दिसले. तसेच भाऊ व वहिनी असे लिहून त्यापुढे मोबाईल नंबर लिहिला होता. पोलिसांनी या दोन्ही मोबाईलवर संपर्क साधला असता ढेकणे याच्या वहिनीशी संपर्क झाला. यावेळी त्यांना घटनेची माहिती देऊन त्याच्या भावाला कोल्हापुरात येण्यास सांगितले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह ‘सीपीआर’च्या शवागारात ठेवण्यात आला. पोलिसांनी मृतदेहाचे शिर व हाताचे पंजे शोधून काढण्यासाठी दोन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. श्वानपथकाद्वारे मारेकऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)