शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

कोल्हापूरकरांनी कष्टातून कारखानदारी उभारली : पवार

By admin | Updated: January 18, 2016 00:44 IST

जगभरात गौरव : ‘विवेक ’इंजिनिअरिंगच्या नवीन युनिटचे उद्घाटन

शिरोली : कोल्हापूरच्या उद्योजकांनी कष्टाने, जिद्दीने कारखानदारी उभी केली आहे. येथील उद्योगाची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्याला साजेशा कारखान्याची उभारणी विवेक इंजिनिअरिंंगने केल्याचे गौरवोद्गार माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी काढले. ते शिरोली येथील विवेक इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीच्या नवीन युनिटच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील होते.पवार म्हणाले, अत्याधुनिक यंत्रणा वापरून येथील उत्पादने जगभरात पोहोचली आहेत. जुने जाणकार उद्योजक महादबा मेस्त्री, वाय. पी. पोवार यांनी डिझेल इंजिनच्या माध्यमातून उद्योगाचा पाया रचला आहे, तर नव्या पिढीने हा कोल्हापूरचा आॅटोमोबाईल उद्योग जगभरात पोहोचविला आहे. आधुनिक शेतीसाठी अत्यंत चांगले ट्रेलर आणि शेतीऔजारे निर्माण करण्याचे काम बाबूराव हजारे, जगन्नाथ लिधडे यांनी ‘विवेक’च्या माध्यमातून केले आहे. म्हणूनच आज एवढी मोठी प्रगती झाली आहे. यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, हजारे आणि लिधडे यांनी ‘विवेक’च्या माध्यमातून माणसे जोडण्याचे काम केले आहे. यापाठीमागे दोघांचेही कष्ट आहेत. पन्नास वर्षांच्या मैत्रीचा हा यशस्वी सोहळा आहे. यावेळी आमदार जयंत पाटील यांचेही भाषण झाले. तत्पूर्वी शरद पवार यांचे धनगरी ढोलांच्या निनादात स्वागत झाले. यावेळी पवार यांच्या हस्ते हजारे आणि लिधडे यांचा सत्कार झाला, तर पवार यांचा पंचाहत्तरीनिमित्त डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, प्रल्हाद चव्हाण, संजय डी. पाटील, टोपच्या सरपंच धनश्री पाटील, आप्पासाहेब हजारे, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर, बाबाभाई वसा, फौन्ड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, उपाध्यक्ष राजू पाटील, ‘आयमा’चे अध्यक्ष कृष्णात पाटील, संपर्कप्रमुख युवराज चौगुले, रणजित जाधव, गोशिमा अध्यक्ष देवेंद्र दिवाण, संचालक श्यामसुंदर तोतला, जयदीप चौगुले, निरज झंवर, अतुल पाटील, दीपक पाटील, एम. वाय. पाटील, रामराजे बदाले, जे. आर. मोटवानी, सूरजितसिंग पवार, राहुल बुधले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.‘मेक इन कोल्हापूर’ इजिप्त दौऱ्यावर गेलो असताना तेथील नाईल नदीवर पाणी उपसण्यासाठी इंजीन बसविले होते, मी तिथे जाऊन पाहिले तर ते इंजिन भारतीय बनावटीचे होते. त्यावर ‘उद्यमनगर कोल्हापूर’असे लिहिले होते, त्यामुळे कोल्हापूरची ख्याती जगभरात पोहोचली आहे, असे पवार म्हणाले.