शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

कोल्हापूर पुन्हा गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:41 IST

कोल्हापूर: थंडीने जाता-जाता तडाखा देण्यास सुरुवात केल्याने कोल्हापूर पुन्हा एकदा गारठले आहे. कोल्हापुरात तापमानाचा पारा १३ ते १४ अंशांपर्यंत ...

कोल्हापूर: थंडीने जाता-जाता तडाखा देण्यास सुरुवात केल्याने कोल्हापूर पुन्हा एकदा गारठले आहे. कोल्हापुरात तापमानाचा पारा १३ ते १४ अंशांपर्यंत खाली गेला आहे. विशेष म्हणजे रात्री दहानंतर गारठा जास्त वाढत आहे. आभाळ निरभ्र असल्याने कडक ऊन असले तरी गार हवेमुळे उन्हाचा तडाखा फारसा जाणवत नाही.

कोल्हापुरात गेल्या आठवड्यात थंडीने पुनरागमन केले. पण दोन दिवसांपूर्वी पुन्हा ढगाळ वातावरण झाल्याने थंडी गायब झाली होती. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने या दोन दिवसात पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला होता, तथापि हा कमी दाबाचा पट्टा पूर्णपणे निवळल्याने वातावरण पुन्हा एकदा कोरडे झाले आहे. त्यामुळेच थंडीने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली. तापमानाचा पारा कमाल ३० तर किमान १४ अंशापर्यंत आला आहे. थंडी परतल्याने जनजीवन गारठल्याचे दिसत आहे. साधारणपणे ही परिस्थिती पुढील आठवड्यातील शनिवारपर्यंत राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. थंडीमध्ये दवाचेही प्रमाण जास्त असल्याने शाळू, गहू, हरभऱ्यासह भाजीपाल्याच्या पिकासाठी खूपच पोषक वातावरण आहे.

दरम्यान, आता दोन दिवस कमाल तापमान ३० ते ३२ अंशांपर्यंत राहणार असले तरी त्यानंतर मात्र ते ३५ ते ३७ अंशापर्यंत वाढत जाणार आहे. त्यामुुळे रात्री थंडीचा आणि दिवसा उन्हाचा तडाखा अनुभवण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे.