शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागात ४१ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST

कोल्हापूर : संपूर्ण मे महिन्यात वादळी पावसाने लावलेल्या हजेरीने यंदा माॅन्सून सक्रिय होण्याआधीच कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांचा ...

कोल्हापूर : संपूर्ण मे महिन्यात वादळी पावसाने लावलेल्या हजेरीने यंदा माॅन्सून सक्रिय होण्याआधीच कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागात ४१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण गतवर्षीपेक्षा चार टक्केंनी जास्त आहे. थांबून थांबून महिनाभर पाऊस कोसळत राहिल्याने जमिनीची मशागती सुलभ झाली आणि रोहिणी नक्षत्रापासून पेरणी सुरू झाली. चांगले वातावरण असल्याने पेरणी झालेले भात, सोयाबीनची पिके जूनच्या पहिल्या आठवड्यातच जमिनीवर डोलू लागली आहेत.

पावसाळा मृग नक्षत्रापासून सुरू होतो; पण यावर्षी वादळी पावसामुळे तो मे महिन्यातच सुरू झाल्याचे चित्र कोल्हापूर विभागात होते. त्यामुळे मेच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी शेतशिवारांच्या मशागती आटोपल्या होत्या. पावसाचा अंदाज बघून पेरणीला सुरुवातही झाली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरण्यांचा टक्का निम्म्यापर्यंत गेला आहे. भाताची तर धूळवाफ पेरण्याही करून ठेवल्या आहेत. आता रोप लागणीसाठीचे तरवे टाकण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने सोयाबीनचा पेराही जलद गतीने आटोपला जात आहे.

खते आणि बियाणे यांचा प्रचंड तुटवडा असतानादेखील शेतकऱ्यांनी पदरमोड बियाणे खरेदी करत पेरा साधण्याची कसरत केली आहे. ११ लाख २१ हजार ९७३ हेक्टरांवरील ४ लाख ४९ हजार ६३८ हेक्टरांवरील पेरण्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. त्यात कोल्हापूरचे २ लाख ४ हजार २२४ , सांगलीचे १ लाग ५० हजार ५८८, साताऱ्याचे ९४ हजार ८२६ हेक्टरांवरील क्षेत्राचा समावेश आहे.

चौकट

विभागात कोल्हापूर प्रथम

विभागात ४१ टक्के पेरण्या झाल्या असल्यातरी जिल्हानिहाय आढावा घेतला तर ५६ टक्केसह कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. सांगली ४२ टक्केसह दुुसऱ्या तर, सातारा २५ टक्केसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विभागनिहाय पेरणी अहवाल

पीक पेरणी टक्केवारी

भात २२

ज्वारी १

बाजरी ३

मका ६

भूईमूग ६

सोयाबीन १३

नवीन ऊस लागणीही जोरात

आडसाली उसाचा हंगाम १५ जुलैपासून सुरू होत असलातरी आताच उसाच्या लागणीचा जाेर वाढला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच कोल्हापुरात २४६ हेक्टर नवीन लागवड झाली आहे. सातारा आणि सांगलीत मात्र अजून लागणींना सुरुवात नाही.

फोटो: १००६२०२१-कोल-पेरणी

फोटो ओळ: आभाळ भरून येत आहे, काेणत्याही क्षणी जोरदार पाऊस सुरू होईल असे वातावरण असल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी शिवारात एकच घाई उडाली आहे. पेरणी करून त्यावर दींड मारून परतत असतानाचे कासारवाडी (ता. करवीर) येथे टिपलेले हे छायाचित्र शेतकऱ्यांची लगबग अधोरेखित करते.

(छाया : नसीर अत्तार)