शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

‘राज्य नाट्य’ची मर्यादा नको : कोल्हापूर जिल्ह्याच्या नाट्य चळवळीला हवा वर्षभर बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:21 IST

कोल्हापूरला जशी चित्रपटसृष्टीची मोठी परंपरा लाभली आहे, त्याचप्रमाणे नाट्यक्षेत्राचीही बीजे येथे रोवली गेली. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व अशी मंडळी या मातीत घडली. संगीत नाटकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता दोनअंकी नाटक, एकांकिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक पातळीवर संघांच्या सादरीकरणासाठी हवा पुढाकार-बदलती रंगभूमी

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : ‘राज्य नाट्य’चे बिगुल वाजले की कोल्हापुरातील सर्व संघ जोमाने तयारीला लागतात. महिनाभर प्रेक्षकांना दर्जेदार नाटकांचा आस्वाद मिळतो; पण एकदा स्पर्धा संपली की, सगळेजण पुढच्या वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत निवांत होतात, असा आजवरचा अनुभव आहे. कोल्हापुरातील नाट्यसृष्टी बहरायची असेल तर वर्षभर प्रायोगिक आणि व्यावसायिक पातळीवर संघांनी नाटकांचे सादरीकरण सुरू ठेवणे अणि त्यांना रसिकांची साथ मिळणे तितकेच गरजेचे आहे.

कोल्हापूरला जशी चित्रपटसृष्टीची मोठी परंपरा लाभली आहे, त्याचप्रमाणे नाट्यक्षेत्राचीही बीजे येथे रोवली गेली. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व अशी मंडळी या मातीत घडली. संगीत नाटकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता दोनअंकी नाटक, एकांकिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. राज्य नाट्य स्पर्धेवेळी झालेल्या गैरकारभारामुळे २० वर्षांपूर्वी कोल्हापूरचे प्राथमिक केंद्र हटविले गेले. त्यानंतर ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’च्या प्रशांत जोशी यांच्या प्रयत्नांतून १० वर्षांपूर्वी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कोल्हापूरला पुन्हा मान्यता दिली आहे. पहिल्या वर्षी १० संघांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आता २९ नाटके सादर होत आहेत. दिवाळी संपली की, संघांकडून ‘राज्य नाट्य’ची तयारी सुरू होते. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा या सगळ्या पातळ्यांवर जोमाने तयारी होते. नाटकांचे दर्जेदार सादरीकरण होते. स्पर्धा संपते, निकाल लागतो आणि पुन्हा सगळं काही थंडावतं ते अगदी पुढच्या ‘राज्य नाट्य’पर्यंत.

कोल्हापूरला लाभलेली नाट्यपरंपरा पुढे चालवायची असेल, जोपासायची आणि वाढवायची असेल तर केवळ ‘राज्य नाट्य’ला केंद्रस्थानी न ठेवता वर्षभर संस्थांच्या पातळीवर लहान-मोठे प्रयोग सुरू ठेवले पाहिजे. अशा प्रयोगांना रसिकांची दाद मिळणेही तितकेच गरजेचे आहे.

कामगार कल्याणचे केंद्रही कोल्हापूरगेल्या दोन वर्षांत हिंदी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी, अंतिम फेरीतील विजेत्या संघांच्या नाटकांचा महोत्सव, बालनाट्य स्पर्धांमधून प्रेक्षकांना दर्जेदार नाटके पाहण्याची संधी मिळाली आहे. आता जानेवारी महिन्यात कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाट्य स्पर्धा होत आहेत. त्यात पुणे महसूल विभागाचे केंद्र म्हणून कोल्हापूरची निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारीपासून ही स्पर्धा होत असून विभागात येत असलेल्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील संघ यात सादरीकरण करणार आहेत.

 

राज्य नाट्य स्पर्धेत संघांना नाट्यगृह मोफत मिळते. सादरीकरणासाठी अर्थसाहाय्य केले जाते; त्यामुळे हौशी रंगभूमीवरचे अनेक प्रयोग या स्पर्धेत पाहायला मिळतात; पण वैयक्तिक अथवा व्यावसायिकदृष्ट्या नाटकाचा प्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या अशा संघांना परवडणारे नसते. त्यामुळे हे कलाकार व्यासपीठ मिळण्यासाठी राज्य नाट्य स्पर्धेची वाट बघतात. ग्रामीण संघांचे सादरीकरण शहरातील संघांप्रमाणे चकचकीत किंवा सफाईदार नसते. त्यांना तळमळ, इच्छा आणि उत्साह तर असतो; पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही.- किरणसिंह चव्हाण, दिग्दर्शक

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNatakनाटक