शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘राज्य नाट्य’ची मर्यादा नको : कोल्हापूर जिल्ह्याच्या नाट्य चळवळीला हवा वर्षभर बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:21 IST

कोल्हापूरला जशी चित्रपटसृष्टीची मोठी परंपरा लाभली आहे, त्याचप्रमाणे नाट्यक्षेत्राचीही बीजे येथे रोवली गेली. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व अशी मंडळी या मातीत घडली. संगीत नाटकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता दोनअंकी नाटक, एकांकिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

ठळक मुद्देव्यावसायिक पातळीवर संघांच्या सादरीकरणासाठी हवा पुढाकार-बदलती रंगभूमी

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : ‘राज्य नाट्य’चे बिगुल वाजले की कोल्हापुरातील सर्व संघ जोमाने तयारीला लागतात. महिनाभर प्रेक्षकांना दर्जेदार नाटकांचा आस्वाद मिळतो; पण एकदा स्पर्धा संपली की, सगळेजण पुढच्या वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत निवांत होतात, असा आजवरचा अनुभव आहे. कोल्हापुरातील नाट्यसृष्टी बहरायची असेल तर वर्षभर प्रायोगिक आणि व्यावसायिक पातळीवर संघांनी नाटकांचे सादरीकरण सुरू ठेवणे अणि त्यांना रसिकांची साथ मिळणे तितकेच गरजेचे आहे.

कोल्हापूरला जशी चित्रपटसृष्टीची मोठी परंपरा लाभली आहे, त्याचप्रमाणे नाट्यक्षेत्राचीही बीजे येथे रोवली गेली. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व अशी मंडळी या मातीत घडली. संगीत नाटकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता दोनअंकी नाटक, एकांकिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. राज्य नाट्य स्पर्धेवेळी झालेल्या गैरकारभारामुळे २० वर्षांपूर्वी कोल्हापूरचे प्राथमिक केंद्र हटविले गेले. त्यानंतर ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’च्या प्रशांत जोशी यांच्या प्रयत्नांतून १० वर्षांपूर्वी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कोल्हापूरला पुन्हा मान्यता दिली आहे. पहिल्या वर्षी १० संघांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आता २९ नाटके सादर होत आहेत. दिवाळी संपली की, संघांकडून ‘राज्य नाट्य’ची तयारी सुरू होते. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा या सगळ्या पातळ्यांवर जोमाने तयारी होते. नाटकांचे दर्जेदार सादरीकरण होते. स्पर्धा संपते, निकाल लागतो आणि पुन्हा सगळं काही थंडावतं ते अगदी पुढच्या ‘राज्य नाट्य’पर्यंत.

कोल्हापूरला लाभलेली नाट्यपरंपरा पुढे चालवायची असेल, जोपासायची आणि वाढवायची असेल तर केवळ ‘राज्य नाट्य’ला केंद्रस्थानी न ठेवता वर्षभर संस्थांच्या पातळीवर लहान-मोठे प्रयोग सुरू ठेवले पाहिजे. अशा प्रयोगांना रसिकांची दाद मिळणेही तितकेच गरजेचे आहे.

कामगार कल्याणचे केंद्रही कोल्हापूरगेल्या दोन वर्षांत हिंदी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी, अंतिम फेरीतील विजेत्या संघांच्या नाटकांचा महोत्सव, बालनाट्य स्पर्धांमधून प्रेक्षकांना दर्जेदार नाटके पाहण्याची संधी मिळाली आहे. आता जानेवारी महिन्यात कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाट्य स्पर्धा होत आहेत. त्यात पुणे महसूल विभागाचे केंद्र म्हणून कोल्हापूरची निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारीपासून ही स्पर्धा होत असून विभागात येत असलेल्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील संघ यात सादरीकरण करणार आहेत.

 

राज्य नाट्य स्पर्धेत संघांना नाट्यगृह मोफत मिळते. सादरीकरणासाठी अर्थसाहाय्य केले जाते; त्यामुळे हौशी रंगभूमीवरचे अनेक प्रयोग या स्पर्धेत पाहायला मिळतात; पण वैयक्तिक अथवा व्यावसायिकदृष्ट्या नाटकाचा प्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या अशा संघांना परवडणारे नसते. त्यामुळे हे कलाकार व्यासपीठ मिळण्यासाठी राज्य नाट्य स्पर्धेची वाट बघतात. ग्रामीण संघांचे सादरीकरण शहरातील संघांप्रमाणे चकचकीत किंवा सफाईदार नसते. त्यांना तळमळ, इच्छा आणि उत्साह तर असतो; पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही.- किरणसिंह चव्हाण, दिग्दर्शक

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNatakनाटक