शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

रहिमत खाँ यांची कबर अस्वच्छतेच्या विळख्यात

By admin | Updated: June 23, 2016 01:06 IST

संस्थानकालीन गायक : कुरुंदवाड नगरपालिकेचे दुर्लक्ष; संगीत प्रेमींतून तीव्र नाराजी

 गणपती कोळी -- कुरुंदवाड --संस्थानकालीन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय संगीताचे गायक भूगंधर्व रहिमत खाँ यांची कबर दुर्लक्षित झाली असून, अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे़ त्यामुळे संगीत प्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ २४ जून भूगंधर्व रहिमत खाँ यांचा स्मृतिदिन असून, यानिमित्ताने तर पालिका प्रशासनाला स्वच्छतेसाठी जाग येणार का? असा सवाल शहरवासीयांतून व्यक्त होत आहे़ कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून, पटवर्धन सरकार यांचे राज्य होते़ त्यामुळे येथील राज दरबारात कलाकार, संगीतकार, पैलवान यांना आश्रय देऊन त्यांचा मानसन्मान ठेवला जात असे़ भूगंधर्व रहिमत खाँ हे मूळचे ग्वाल्हेरचे असून, त्यांचे वडील हुदुखाँसाहेब यांच्या मृत्यूनंतर घरचे दारिद्र्य व कौटुंबिक कलहातून रहिमत खाँ यांनी घर सोडले़ गायन करीत फिरत असताना कुरुंदवाडचे सुपुत्र व भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांच्याशी १८९२ साली वाराणसीत भेट झाली़विष्णुपंत छत्रे यांनी सर्कशीत रहिमत खाँ यांच्या संगीत गायनाचा कार्यक्रम घेत त्यांना कुरुंदवाडचे सरकार आण्णासाहेब पटवर्धन यांच्या दरबारात घेऊन आले़ रहिमत खाँ यांचे संगीत व गायन ऐकून पटवर्धन सरकार यांनी दरबारी गायक म्हणून त्यांची नेमणूक केली़ त्यांना मानपानाबरोबर राहण्याची, भोजनाची व्यवस्था येथील पोलिस ठाण्यासमोरील घोरपडे यांच्या इमारतीमध्ये केली़ त्यांच्या दिमतीला नोकरही ठेवण्यात आला होता़येथील राजवाड्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे़ त्यामध्ये भूगंधर्व रहिमत खाँ यांच्या शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम होत असे़ त्या काळात रहिमत खाँ व इचलकरंजीच्या बाळकृष्णबुवा यांचा जुगलबंदी कार्यक्रम सुमारे साडेसहा तास रंगल्याचा इतिहास आहे़ अशा या भूगंधर्व यांचा २४ जून १९२२ रोजी मृत्यू झाला़ संस्थानिक पटवर्धन सरकार यांनी येथील दौलतशहावली दर्ग्याच्या पिछाडीस दफन देऊन कबर बांधली आहे़ मात्र, संस्थानिकानंतर या आंतरराष्ट्रीय भूगंधर्वाच्या कबरीकडे दुर्लक्ष झाले आहे़ परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडला आहे़ याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने साहित्यिक व संगीत प्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ भूगंधर्व यांचा २४ जून रोजी स्मृतिदिन आहे़ त्यानिमित्ताने तरी पालिका प्रशासनाने लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी संगीत प्रेमींतून होत आहे. दरबारातील संगीतरत्नसम्राट अकबरच्या दरबारातील मियाँ तानसेन यांच्यानंतर २५० वर्षांनी ज्यांची कीर्ती उत्तर भारतातून दक्षिणेकडे येऊन पोहोचली़ त्यामध्ये स्थाल गायकीचा श्रेष्ठ दर्जा निर्माण करणारे रहिमत खाँ पटवर्धन सरकार यांच्या दरबारातील संगीतरत्न होते़ तानसेनच्या महान परंपरेतील शेवटचे गायक असा त्यांचा त्याकाळी गौरवपूर्ण उल्लेख केला जात असे़ अशा महान संगीत गायकाच्या कबरीला पंडित भीमसेन जोशींसह अनेक दिग्गजांनी व रसिकांनी भेट दिली आहे़