शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

रहिमत खाँ यांची कबर अस्वच्छतेच्या विळख्यात

By admin | Updated: June 23, 2016 01:06 IST

संस्थानकालीन गायक : कुरुंदवाड नगरपालिकेचे दुर्लक्ष; संगीत प्रेमींतून तीव्र नाराजी

 गणपती कोळी -- कुरुंदवाड --संस्थानकालीन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय संगीताचे गायक भूगंधर्व रहिमत खाँ यांची कबर दुर्लक्षित झाली असून, अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे़ त्यामुळे संगीत प्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ २४ जून भूगंधर्व रहिमत खाँ यांचा स्मृतिदिन असून, यानिमित्ताने तर पालिका प्रशासनाला स्वच्छतेसाठी जाग येणार का? असा सवाल शहरवासीयांतून व्यक्त होत आहे़ कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून, पटवर्धन सरकार यांचे राज्य होते़ त्यामुळे येथील राज दरबारात कलाकार, संगीतकार, पैलवान यांना आश्रय देऊन त्यांचा मानसन्मान ठेवला जात असे़ भूगंधर्व रहिमत खाँ हे मूळचे ग्वाल्हेरचे असून, त्यांचे वडील हुदुखाँसाहेब यांच्या मृत्यूनंतर घरचे दारिद्र्य व कौटुंबिक कलहातून रहिमत खाँ यांनी घर सोडले़ गायन करीत फिरत असताना कुरुंदवाडचे सुपुत्र व भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांच्याशी १८९२ साली वाराणसीत भेट झाली़विष्णुपंत छत्रे यांनी सर्कशीत रहिमत खाँ यांच्या संगीत गायनाचा कार्यक्रम घेत त्यांना कुरुंदवाडचे सरकार आण्णासाहेब पटवर्धन यांच्या दरबारात घेऊन आले़ रहिमत खाँ यांचे संगीत व गायन ऐकून पटवर्धन सरकार यांनी दरबारी गायक म्हणून त्यांची नेमणूक केली़ त्यांना मानपानाबरोबर राहण्याची, भोजनाची व्यवस्था येथील पोलिस ठाण्यासमोरील घोरपडे यांच्या इमारतीमध्ये केली़ त्यांच्या दिमतीला नोकरही ठेवण्यात आला होता़येथील राजवाड्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे़ त्यामध्ये भूगंधर्व रहिमत खाँ यांच्या शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम होत असे़ त्या काळात रहिमत खाँ व इचलकरंजीच्या बाळकृष्णबुवा यांचा जुगलबंदी कार्यक्रम सुमारे साडेसहा तास रंगल्याचा इतिहास आहे़ अशा या भूगंधर्व यांचा २४ जून १९२२ रोजी मृत्यू झाला़ संस्थानिक पटवर्धन सरकार यांनी येथील दौलतशहावली दर्ग्याच्या पिछाडीस दफन देऊन कबर बांधली आहे़ मात्र, संस्थानिकानंतर या आंतरराष्ट्रीय भूगंधर्वाच्या कबरीकडे दुर्लक्ष झाले आहे़ परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडला आहे़ याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने साहित्यिक व संगीत प्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ भूगंधर्व यांचा २४ जून रोजी स्मृतिदिन आहे़ त्यानिमित्ताने तरी पालिका प्रशासनाने लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी संगीत प्रेमींतून होत आहे. दरबारातील संगीतरत्नसम्राट अकबरच्या दरबारातील मियाँ तानसेन यांच्यानंतर २५० वर्षांनी ज्यांची कीर्ती उत्तर भारतातून दक्षिणेकडे येऊन पोहोचली़ त्यामध्ये स्थाल गायकीचा श्रेष्ठ दर्जा निर्माण करणारे रहिमत खाँ पटवर्धन सरकार यांच्या दरबारातील संगीतरत्न होते़ तानसेनच्या महान परंपरेतील शेवटचे गायक असा त्यांचा त्याकाळी गौरवपूर्ण उल्लेख केला जात असे़ अशा महान संगीत गायकाच्या कबरीला पंडित भीमसेन जोशींसह अनेक दिग्गजांनी व रसिकांनी भेट दिली आहे़