शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

रहिमत खाँ यांची कबर अस्वच्छतेच्या विळख्यात

By admin | Updated: June 23, 2016 01:06 IST

संस्थानकालीन गायक : कुरुंदवाड नगरपालिकेचे दुर्लक्ष; संगीत प्रेमींतून तीव्र नाराजी

 गणपती कोळी -- कुरुंदवाड --संस्थानकालीन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय संगीताचे गायक भूगंधर्व रहिमत खाँ यांची कबर दुर्लक्षित झाली असून, अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे़ त्यामुळे संगीत प्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ २४ जून भूगंधर्व रहिमत खाँ यांचा स्मृतिदिन असून, यानिमित्ताने तर पालिका प्रशासनाला स्वच्छतेसाठी जाग येणार का? असा सवाल शहरवासीयांतून व्यक्त होत आहे़ कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून, पटवर्धन सरकार यांचे राज्य होते़ त्यामुळे येथील राज दरबारात कलाकार, संगीतकार, पैलवान यांना आश्रय देऊन त्यांचा मानसन्मान ठेवला जात असे़ भूगंधर्व रहिमत खाँ हे मूळचे ग्वाल्हेरचे असून, त्यांचे वडील हुदुखाँसाहेब यांच्या मृत्यूनंतर घरचे दारिद्र्य व कौटुंबिक कलहातून रहिमत खाँ यांनी घर सोडले़ गायन करीत फिरत असताना कुरुंदवाडचे सुपुत्र व भारतीय सर्कसचे जनक विष्णुपंत छत्रे यांच्याशी १८९२ साली वाराणसीत भेट झाली़विष्णुपंत छत्रे यांनी सर्कशीत रहिमत खाँ यांच्या संगीत गायनाचा कार्यक्रम घेत त्यांना कुरुंदवाडचे सरकार आण्णासाहेब पटवर्धन यांच्या दरबारात घेऊन आले़ रहिमत खाँ यांचे संगीत व गायन ऐकून पटवर्धन सरकार यांनी दरबारी गायक म्हणून त्यांची नेमणूक केली़ त्यांना मानपानाबरोबर राहण्याची, भोजनाची व्यवस्था येथील पोलिस ठाण्यासमोरील घोरपडे यांच्या इमारतीमध्ये केली़ त्यांच्या दिमतीला नोकरही ठेवण्यात आला होता़येथील राजवाड्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे़ त्यामध्ये भूगंधर्व रहिमत खाँ यांच्या शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम होत असे़ त्या काळात रहिमत खाँ व इचलकरंजीच्या बाळकृष्णबुवा यांचा जुगलबंदी कार्यक्रम सुमारे साडेसहा तास रंगल्याचा इतिहास आहे़ अशा या भूगंधर्व यांचा २४ जून १९२२ रोजी मृत्यू झाला़ संस्थानिक पटवर्धन सरकार यांनी येथील दौलतशहावली दर्ग्याच्या पिछाडीस दफन देऊन कबर बांधली आहे़ मात्र, संस्थानिकानंतर या आंतरराष्ट्रीय भूगंधर्वाच्या कबरीकडे दुर्लक्ष झाले आहे़ परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडला आहे़ याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने साहित्यिक व संगीत प्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ भूगंधर्व यांचा २४ जून रोजी स्मृतिदिन आहे़ त्यानिमित्ताने तरी पालिका प्रशासनाने लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी संगीत प्रेमींतून होत आहे. दरबारातील संगीतरत्नसम्राट अकबरच्या दरबारातील मियाँ तानसेन यांच्यानंतर २५० वर्षांनी ज्यांची कीर्ती उत्तर भारतातून दक्षिणेकडे येऊन पोहोचली़ त्यामध्ये स्थाल गायकीचा श्रेष्ठ दर्जा निर्माण करणारे रहिमत खाँ पटवर्धन सरकार यांच्या दरबारातील संगीतरत्न होते़ तानसेनच्या महान परंपरेतील शेवटचे गायक असा त्यांचा त्याकाळी गौरवपूर्ण उल्लेख केला जात असे़ अशा महान संगीत गायकाच्या कबरीला पंडित भीमसेन जोशींसह अनेक दिग्गजांनी व रसिकांनी भेट दिली आहे़