शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

किटलीबॉयचा मुलगा झाला कॅबिनेट मंत्री

By admin | Updated: November 1, 2014 00:42 IST

पक्षनिष्ठा पावली : ३५ वर्षांच्या कार्याचे फळ, अभाविप कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा प्रवास

विश्वास पाटील - कोल्हापूरमुंबईतील कापड गिरण्यांतील चाय किटलीवाल्याचा मुलगा ते राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री अशी कोणत्याही सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटावी अशीच चंद्रकांतदादा पाटील यांची कारकीर्द. गुजरातचा चहावाला देशाचा पंतप्रधान झाला. आता मुंबईतील चहावाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री झाला आहे. ही सगळी किमया भाजप पक्षाची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाची आहे.पाटील यांचे वडील मूळचे शेतकरी. भुदरगड तालुक्यातील गारगोटीजवळ त्यांचे खानापूर नावाचे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे छोटेसे गाव; परंतु गावात पोट भरत नाही म्हणून आमदार पाटील यांचे वडील बच्चू पाटील हे मुंबईत गेले. मफतलाल नंबर २ या मिलमध्ये ते नोकरीस होते. मिलच्या कॅँटिनमध्ये किटलीबॉय अशी त्यांची नोकरी होती. त्यामुळे आमदार पाटील यांचा जन्म, बालपण व शिक्षणही मुंबईतच झाले. त्यावेळी हार्बर स्टेशन परिसरात ते राहत होते. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले. व्हीटीच्या सिद्धार्थ कॉलेजमधून ते कॉमर्स शाखेचे पदवीधर होऊन बाहेर पडले. कॉलेजला असतानाच त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी संघटनेसाठी पूर्ण वेळ वाहून घेण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे तेरा वर्षे ते पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून फिरत होते. त्यांच्याकडे जळगाव, धुळे, नाशिक, विदर्भ व नंतरच्या टप्प्यात गुजरात व गोवा राज्यांत काम करण्याची जबाबदारी होती. त्याचवेळी त्यांची नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी ओळख झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते १९९० ते ९३ या काळात अखिल भारतीय सरचिटणीस होते. हे काम केल्यानंतर ते मूळ गावी खानापूरला परतले व दोन वर्षे शेती केली. पुढे १९९५ च्या सुमारास टेलिमॅटिक्स नावाच्या संगणक कंपनीचे संचालक झाल्यावर ते पुन्हा कोल्हापुरात स्थायिक झाले.आमदार पाटील यांच्या राजकारणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा आहे. त्यांची जडणघडणही त्याच मुशीतून झाली आहे. संघाचे ते १९९५ ते ९९ पर्यंत कोल्हापूर विभागाचे सहकार्यवाह होते. २००४ मध्ये ते भाजपचे राज्य चिटणीस झाले. त्यांच्याकडे २००६ला पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी आली. २००८ला पुणे पदवीधर मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश पाटील-वाठारकर यांचा नऊ हजार मतांनी पराभव करून आमदार झाले. त्यानंतर २००९ला ते भाजपचे राज्य उपाध्यक्ष झाले. २०१४ला झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा आमदार झाले. विधानपरिषदेत ते पक्षाचे प्रतोद होते. शिवाजी व सोलापूर विद्यापीठांच्या सिनेटवर ते आहेत. मितभाषी, कार्यकर्त्याला सन्मान देणारे व विकासाचा स्वत:चा असा एक दृष्टिकोन असलेले नेते अशी आमदार पाटील यांची ओळख आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. संघाचे जुनेजाणते दिवंगत कार्यकर्ते अण्णा ठाकूर यांचाही चंद्रकांतदादा यांच्या राजकीय जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा राहिला आहे.