शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव

By admin | Updated: September 30, 2015 01:15 IST

आठ आॅक्टोबरपासून प्रारंभ : ग्रीन गार्डसला ‘वसुंधरा मित्र’

कोल्हापूर : सहावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शुक्रवार (दि. ८आॅक्टोबर) पासून सुरू होत आहे. त्याअंतर्गत पराग केमकर, राजा उपळेकर, ग्रीन गार्डस् या संस्थेला वसुंधरा मित्र व आदर्श सहेली मंच, युवक मित्रमंडळ राजारामपुरी व कोल्हापूर अग्निशामक दल यांचा ‘वसुंधरा गौरव’ने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व ‘किर्लोस्कर’चे सरव्यवस्थापक विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, महोत्सवाचे उद्घाटन शाहू स्मारक भवनमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सदस्य सचिव डॉ. दिलीप बोरालकर यांच्या हस्ते व ‘किर्लोस्कर’चे सह. संचालक आर. आर. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यंदा ‘शून्य कचरा’ हे महोत्सवाचे घोषवाक्य आहे. दि. ९ आॅक्टोबरला ‘वसुंधरा मित्र’ व ‘वसुंधरा गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, तर दि. ११ आॅक्टोबरच्या सांगता समारंभात ‘वसुंधरा सन्मान’ हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पराग केमकर हे पोलीस दलातील वायरलेस व रेडिओ कम्युनिकेशनमध्ये कार्यरत होते. गेल्या सात वर्षांपासून ते कचरा व टाकाऊ अन्नापासून बायोगॅस तयार करून त्यांचा वापर करतात व प्रशिक्षणही देतात. सौरचुल, सौरकंदिल, शेतातील धान्य वाळवणी यंत्र यांची प्रात्यक्षिके देतात.राजा उपळेकर हे छायाचित्रकार असून त्यांनी रंकाळा परिसरात कासव बचाव, सर्प बचाव अशा मोहिमेत सहभाग घेतला आहे. चित्रकारितेतही त्यांचा हातखंडा आहे. आदर्श सहेली मंचतर्फे टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून त्यांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. युवक मित्र मंडळाने ‘लाभांकूर’ हा प्रकल्प राबवून ‘शून्य कचरा’ ही संकल्पना रूजवली आहे. माणसासह मुक्या प्राण्यांच्याही मदतीला धावणाऱ्या ‘अग्निशमन दला’ने गेल्या तीन वर्षांत ७५० हून अधिक प्राणी, पक्षांना जीवदान दिले आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुमारे ४० लघुपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सव नि:शुल्क असून त्यासाठी १ तारखेपासून दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, गाळा नं ७, पहिला मजला, शाहू स्टेडियम, राणे-जोशी आॅर्थोपेडिकसमोर येथे नावनोंदणी करण्यात येईल, तरी इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.