शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

किणी ग्रामीण रुग्णालय ठरणार अपघातग्रस्तांना वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला किणी येथील ग्रामीण रुग्णालय उभारणीचा प्रश्न अखेर ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला किणी येथील ग्रामीण रुग्णालय उभारणीचा प्रश्न अखेर निकालात निघाला आहे. महामार्गावरील होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना तातडीच्या उपचारांसाठी महामार्गावर आधुनिक रुग्णालय असावे यासाठी ‘लोकमत’ने याबाबत मालिका लिहून आवाज उठविला होता. किणी येथील रुग्णालयात आधुनिक सोसीसुविधांची सोय केल्यास अपघातग्रस्तांसाठी हे वरदान ठरणार आहे. परिसरातील जनतेतून रुग्णालयाच्या मान्यतेचे स्वागत होत आहे.

किणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम आठ वर्षांपासून मंत्रालयीन पातळीवर अटकले होते. अनेक त्रुटीचा सामना करीत जागेचा प्रश्न सुटल्यानंतरही निधीअभावी बांधकाम परवानगीच्या कचाट्यात सापडले होते. तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल व्हावे यासाठी सुरुवातीच्या काळात जोमाने प्रयत्न केले. गावचे सुपुत्र व मंत्रालयीन अधिकारी सुहास चव्हाण यांनी मंत्रालयीन पातळीवर केलेले प्रारंभीच्या टप्प्यातील प्रयत्न फार महत्त्वाचे होते.

मध्यंतरी विविध अडचणींमुळे कामाला विलंब होत गेला. महामार्गावरील वाढते अपघात आणि परिसरात सरकारी रुग्णालयाची गरज पाहता याबाबत ‘लोकमत’मधून रुग्णालय त्वरित व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत हा विषय नेटाने पुढे नेला. आमदार राजू आवळे यांनी गेल्या आठ-दहा महिन्यांत आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांच्याकडे निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला. राजेंद्र पाटील यांनी रुग्णालयासाठी मदत करण्याचे ठोस आश्वासन आवळे यांना दिले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची शिफारस करून मदत करण्याचे आश्वासन दिले.

ग्रामस्थ, प्रवासी वर्गातून मात्र रुग्णालय तातडीने झाले पाहिजे याचा रेटा सुरूच होता. जवळच्या मतदारसंघातील व नेहमी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून किणी मार्गे मुंबईला जाणारे आरोग्य राज्यमंत्री यांना याविषयीची तीव्रता गरज माहीत असल्याने या विषयात त्यांनी अगदी मनापासून लक्ष घातले. त्यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी असल्याने विशेष प्रयत्न करीत बांधकामास प्रशासकीय मंजुरी देण्याकरिता चांगली मदत केली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच निधीची तरतूद करण्याचा विषय मार्गी लागला.

अपघातप्रवण क्षेत्रात आधुनिक सुविधांची गरज

शिरोलीपासून किणी व तेथून पुढे कऱ्हाडपर्यंत मोठे शासकीय रुग्णालय नसल्याने महामार्गावर होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांची मोठी गैरसोय होते. अपघात प्रवण क्षेत्र असल्याने परिसरात रुग्णालयाची गरज सतत पुढे येत होती.

३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी १४ कोटी २१ लाखांच्या इमारत बांधकामाची प्रशासकीय मंजुरी मिळाली. हे रुग्णालय उभे राहिल्यानंतर त्यात आधुनिक सुविधा निर्माण केल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे. लवकरात लवकर निविदा प्रक्रिया होऊन कामास सुरुवात होण्यासाठी पाठपुरावा गरजेचा आहे.