शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

किणी ग्रामीण रुग्णालय ठरणार अपघातग्रस्तांना वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला किणी येथील ग्रामीण रुग्णालय उभारणीचा प्रश्न अखेर ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला किणी येथील ग्रामीण रुग्णालय उभारणीचा प्रश्न अखेर निकालात निघाला आहे. महामार्गावरील होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना तातडीच्या उपचारांसाठी महामार्गावर आधुनिक रुग्णालय असावे यासाठी ‘लोकमत’ने याबाबत मालिका लिहून आवाज उठविला होता. किणी येथील रुग्णालयात आधुनिक सोसीसुविधांची सोय केल्यास अपघातग्रस्तांसाठी हे वरदान ठरणार आहे. परिसरातील जनतेतून रुग्णालयाच्या मान्यतेचे स्वागत होत आहे.

किणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम आठ वर्षांपासून मंत्रालयीन पातळीवर अटकले होते. अनेक त्रुटीचा सामना करीत जागेचा प्रश्न सुटल्यानंतरही निधीअभावी बांधकाम परवानगीच्या कचाट्यात सापडले होते. तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल व्हावे यासाठी सुरुवातीच्या काळात जोमाने प्रयत्न केले. गावचे सुपुत्र व मंत्रालयीन अधिकारी सुहास चव्हाण यांनी मंत्रालयीन पातळीवर केलेले प्रारंभीच्या टप्प्यातील प्रयत्न फार महत्त्वाचे होते.

मध्यंतरी विविध अडचणींमुळे कामाला विलंब होत गेला. महामार्गावरील वाढते अपघात आणि परिसरात सरकारी रुग्णालयाची गरज पाहता याबाबत ‘लोकमत’मधून रुग्णालय त्वरित व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत हा विषय नेटाने पुढे नेला. आमदार राजू आवळे यांनी गेल्या आठ-दहा महिन्यांत आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांच्याकडे निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला. राजेंद्र पाटील यांनी रुग्णालयासाठी मदत करण्याचे ठोस आश्वासन आवळे यांना दिले होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची शिफारस करून मदत करण्याचे आश्वासन दिले.

ग्रामस्थ, प्रवासी वर्गातून मात्र रुग्णालय तातडीने झाले पाहिजे याचा रेटा सुरूच होता. जवळच्या मतदारसंघातील व नेहमी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून किणी मार्गे मुंबईला जाणारे आरोग्य राज्यमंत्री यांना याविषयीची तीव्रता गरज माहीत असल्याने या विषयात त्यांनी अगदी मनापासून लक्ष घातले. त्यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी असल्याने विशेष प्रयत्न करीत बांधकामास प्रशासकीय मंजुरी देण्याकरिता चांगली मदत केली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरच निधीची तरतूद करण्याचा विषय मार्गी लागला.

अपघातप्रवण क्षेत्रात आधुनिक सुविधांची गरज

शिरोलीपासून किणी व तेथून पुढे कऱ्हाडपर्यंत मोठे शासकीय रुग्णालय नसल्याने महामार्गावर होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांची मोठी गैरसोय होते. अपघात प्रवण क्षेत्र असल्याने परिसरात रुग्णालयाची गरज सतत पुढे येत होती.

३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी १४ कोटी २१ लाखांच्या इमारत बांधकामाची प्रशासकीय मंजुरी मिळाली. हे रुग्णालय उभे राहिल्यानंतर त्यात आधुनिक सुविधा निर्माण केल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे. लवकरात लवकर निविदा प्रक्रिया होऊन कामास सुरुवात होण्यासाठी पाठपुरावा गरजेचा आहे.