शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

...तर खासगी साखर कारखाने बंद ठेवू

By admin | Updated: July 10, 2015 21:58 IST

माधवराव घाटगे : शासनाने मागण्यांबाबत १५ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्यावा

जयसिंगपूर : देशांतर्गत व जागतिक स्तरावर साखरेचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना चालू हंगामातील ‘एफआरपी’ची रक्कम साखर कारखान्यांना देणे शक्य नाही. त्यामुळे येणारा गळीत हंगाम सुरू करणे अडचणीचे बनले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाबाबत शासनाने १५ आॅगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या गळीत हंगामात खासगी कारखाने सुरू करणार नसल्याची माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) पुणेचे संचालक व श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते पुढे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योग वाचविण्याच्या दृष्टिकोनातून खासगी साखर कारखान्यांच्यावतीने पुणे येथे ‘विस्मा’ संघटनेची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत साखर उद्योगाबाबत चर्चा करण्यात आली. साखर दर व ऊस किमतीचे व्यस्त प्रमाण हे खरे आजच्या आर्थिक संकटाचे मूळ कारण आहे. २०१४-१५ च्या हंगामामध्ये साखरेचे दर ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल एवढी घसरण झाली. कृषिमूल्य आयोगाने शिफारस केलेला एफआरपी दर २२०० रुपये ठरला होता. प्रत्यक्षात २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल साखरेला दर मिळाला. सन २०१४-१५च्या हंगामातील कारखान्यांच्या एकूण उत्पन्नातून ७० ते ७५ टक्केरक्कम ऊस किमतीच्या स्वरूपात बहुतेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. त्यामुळे कृषिमूल्य आयोगाच्या व सी. रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार उर्वरित एफआरपीची रक्कम केंद्र शासनाने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.मागील हंगामापेक्षा चालू हंगामासाठी एफआरपी १०० रुपयांनी वाढ धरली असता, साखरेचा दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा कृषिमूल्य आयोगाने गृहीत धरला आहे. मात्र, प्रत्यक्षात साखरेच्या दरात १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या हंगामात साखर कारखाना सुरू करणे अशक्य आहे, असे स्पष्ट करून घाटगे पुढे म्हणाले, तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार न करणे, केंद्र व राज्य शासनाचे कर्ज अर्थसहाय न स्वीकारणे, किमान २० टक्केसाखर दरवर्षी निर्यात करणे, अशा प्रमुख मागण्यांबाबत बैठकीत चर्चा होऊन निर्णय झाला आहे. याबाबत शासनाने १५ आॅगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा सर्व साखर कारखानदार एकजुटीने त्यास सामोरे जातील, असा इशाराही देण्यात आला. पुणे येथे झालेल्या बैठकीस महाराष्ट्रातील ८० खासगी साखर कारखानदार व कर्नाटकातील खासगी कारखानदार उपस्थित होते.(प्रतिनिधी)मालतारण मंजूर रक्कम पहिली उचल म्हणून देण्यास शासनाने मंजुरी द्यावीयेत्या हंगामासाठी राज्य सहकारी बॅँक, जिल्हा सहकारी बॅँक व राष्ट्रीयीकृत बॅँका ऊस दरासाठी जी रक्कम मालतारण खात्यावर मंजूर करतील, ती पहिली उचल म्हणून शेतकऱ्यांना देण्यास केंद्र व राज्य शासनाने मंजुरी द्यावी. तसेच उर्वरित रक्कम साखर विक्रीनंतर हप्त्याहप्त्याने देण्यास मान्यता द्यावी, अशी ‘विस्मा’ची मागणी असल्याचे घाटगे यांनी सांगितले.