शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यासारख्या ‘झेंडू’ला कवडीमोल दर

By admin | Updated: April 2, 2015 00:39 IST

बाजारात दोन ते तीन रुपये किलो दर : व्यापाऱ्यांकडून एक रुपये किलोने झेंडू मागून चेष्टा; उत्पादनखर्चही न मिळाल्याने शेतकरी अस्वस्थ

प्रकाश पाटील - कोपार्डे -उसाला पर्याय शोधत दररोज आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फूल शेतीचा पर्याय निवडला आहे. यात झेंडू फुलाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले असले, तरी आज झेंडूचा दर दोन ते तीन रुपये किलोवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून सर्वांत जास्त उसाला प्राधान्य दिले जाते. मात्र, ऊसपीक किमान १२ ते १६ महिने सांभाळावे लागते. त्याची तोड झाल्यानंतरही वेळेत पैसे न मिळण्याबरोबर उत्पादन खर्चाएवढा भाव मिळत नसल्याने काही प्रयोगशील शेतकरी वेगळा पर्याय शोधून आपले शेतीतून अर्थकारण सांभाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यातही व्यापाऱ्यांची साखळी व बाजारपेठेचे योग्य नियोजन न समजल्याने शेतकऱ्यांची मोठी लूट होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून झेंडू फूल शेतीला प्राधान्य दिले जात आहे. चार महिन्यांच्या पिकामधून चांगला आर्थिक फायदा मिळेल म्हणून अनेक शेतकरी या फूल शेतीकडे वळले आहेत. सध्या सर्वत्र लग्नसराई, तसेच धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रमाचा हा कालावधी असताना व या फुलांना यावेळेला महत्त्व असतानाही झेंडूचा दर दोन ते तीन रुपये किलोवर घसरला असल्याने शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. झेंडू हे नाशवंत असल्याने फुलाचा तोडा झाल्यानंतर आठ ते दहा तासांत त्याची विक्री झाली तरच फायद्याचे ठरते; अन्यथा तो कोमेजल्यास फेकून द्यावी लागतात. सध्या जिल्ह्यात कोठेही फुलांसाठी साठवणुकीला शीतकेंद्रे नाहीत आणि शेतकऱ्यांकडे तशी सोयही नाही.याचा फायदा बाजारातील खरेदी-विक्रीचे ज्ञान अवगत असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून उठविला जात आहे. सध्या बाजारात झेंडूचा दर दोन ते तीन रुपये किलोवर घसरला असतानाही शेतकऱ्यांच्या आगतिकतेचा फायदा उठवत एक रुपया किलो दराने झेंडू फुले मागितली जात आहेत.या झेंडूच्या प्रतिरोपाची किंमत चार ते पाच रुपये असून, खते, पाणी, बुरशीनाशक, कीटकनाशक, फुले तोडणी मजुरी, वाहतूक याचा एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च आहे. मात्र, सध्या बाजारातील झेंडूला मिळणाऱ्या दराने १५ ते २० हजार रुपये प्रति एकर तोटा होणार आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच अवकाळी पाऊस व हवामानातील बदलाने रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फुलाच्या प्रतवारीवरसुद्धा परिणाम झाला आहे.