शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

शिरढोणमध्ये काविळीने मुलाचा मृत्यू

By admin | Updated: January 1, 2015 00:34 IST

दूषित पाण्याचा बळी : कृष्णा-पंचगंगा दूषित पाण्याबद्दल नागरिकांतून संताप

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे काविळीच्या साथीने पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या वैभव प्रकाश पाटील (वय ८) या मुलाचा मृत्यू झाला. कृष्णा-पंचगंगेच्या दूषित पाण्याचा तालुक्यातील पहिला बळी ठरला. मात्र, आरोग्य यंत्रणा अद्यापही सुस्तच असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.पंचगंगेच्या दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसतो. कोल्हापूरपासून इंचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगेत सोडले जाते. त्यामुळे पंचगंगेचे पाणी काळेकुट्ट झाले असून, त्याला उग्र वास येत आहे. पंचगंगेचे पाणी दूषित झाल्याने इचलकरंजी नगरपालिकेने बस्तवाड येथून कृष्णा नदीतून पिण्यासाठी पाणी योजना केली आहे. मात्र, पंचगंगेच्या दूषित पाणी प्रवाह कृष्णा नदीत मिसळून योजनेच्या बाजूनेच प्रवाहित होऊन कृष्णेचे पाणीही दूषित झाले आहे. शिरढोण गावाला पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, बहुतेक ग्रामस्थ पिण्यासाठी इचलकरंजी कृष्णा नळ योजनेच्या एअर व्हॉल्व्हमधून पडणाऱ्या पाण्याचाच उपयोग करतात.पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे कृष्णा नदीचा पश्चिम बाजूचा प्रवाहही दूषित झाला आहे. परिणामी तालुक्यातील अनेक गावांत साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. येथील माळभागात राहणाऱ्या वैभवला पंधरा दिवसांपूर्वी काविळीची लागण झाली होती. त्यामुळे दहा दिवसांपासून इंचलकरजी येथील बालरोग तज्ज्ञ रमेश स्वामी यांच्या दवाखान्यात उपचार चालू होते. मात्र, कावीळ वाढतच राहिल्याने नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात सोमवारी दाखल के ले होते. कावीळ मेंदूत चढल्याने आज, बुधवारी सकाळी उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. काविळीच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तच राहिल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)