शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

शिरढोणमध्ये काविळीने मुलाचा मृत्यू

By admin | Updated: January 1, 2015 00:34 IST

दूषित पाण्याचा बळी : कृष्णा-पंचगंगा दूषित पाण्याबद्दल नागरिकांतून संताप

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे काविळीच्या साथीने पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या वैभव प्रकाश पाटील (वय ८) या मुलाचा मृत्यू झाला. कृष्णा-पंचगंगेच्या दूषित पाण्याचा तालुक्यातील पहिला बळी ठरला. मात्र, आरोग्य यंत्रणा अद्यापही सुस्तच असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.पंचगंगेच्या दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसतो. कोल्हापूरपासून इंचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगेत सोडले जाते. त्यामुळे पंचगंगेचे पाणी काळेकुट्ट झाले असून, त्याला उग्र वास येत आहे. पंचगंगेचे पाणी दूषित झाल्याने इचलकरंजी नगरपालिकेने बस्तवाड येथून कृष्णा नदीतून पिण्यासाठी पाणी योजना केली आहे. मात्र, पंचगंगेच्या दूषित पाणी प्रवाह कृष्णा नदीत मिसळून योजनेच्या बाजूनेच प्रवाहित होऊन कृष्णेचे पाणीही दूषित झाले आहे. शिरढोण गावाला पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, बहुतेक ग्रामस्थ पिण्यासाठी इचलकरंजी कृष्णा नळ योजनेच्या एअर व्हॉल्व्हमधून पडणाऱ्या पाण्याचाच उपयोग करतात.पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे कृष्णा नदीचा पश्चिम बाजूचा प्रवाहही दूषित झाला आहे. परिणामी तालुक्यातील अनेक गावांत साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. येथील माळभागात राहणाऱ्या वैभवला पंधरा दिवसांपूर्वी काविळीची लागण झाली होती. त्यामुळे दहा दिवसांपासून इंचलकरजी येथील बालरोग तज्ज्ञ रमेश स्वामी यांच्या दवाखान्यात उपचार चालू होते. मात्र, कावीळ वाढतच राहिल्याने नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात सोमवारी दाखल के ले होते. कावीळ मेंदूत चढल्याने आज, बुधवारी सकाळी उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. काविळीच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तच राहिल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)