शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कासारवाडीकरांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST

कासारवाडी गावाला गेल्या एक महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसत असून, नागरिकांना कोरोनाच्या महामारीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...

कासारवाडी गावाला गेल्या एक महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसत असून, नागरिकांना कोरोनाच्या महामारीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यंदा तरी गावची पेयजल योजना पूर्ण होईल, असे वाटत होते; पण ही योजना वनीकरणाच्या नियमात अडकली असल्याने कासारवाडीकरांच्या नशिबी यंदाही पेयजलचे पाणी मिळणार नाही.

कासारवाडी गावची लोकसंख्या २२०० आहे. गावात आठ दिवसांतून एकदा नळाला पाणी येते. प्रत्येक कुटुंबाला अपुरे पाणी मिळते. त्यामुळे महिलांना धुणे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. गावाला वाघजाई विहिरीतून पाणी येते; पण ती विहीरच कोरडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. शौचालय, जनावरे, धुणी भांडी यासाठी पाण्याची आवश्यकता अधिक आहे; मात्र यासाठीही पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कोरोना काळात आधीच नागरिक बेजार झाले असताना पाणीटंचाईच्या समस्येने त्यात भरच घातली आहे. विशेष म्हणजे अनेक नागरिक विकतचे पाणी घेत असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य नागरिकांना विकतचे पाणी घेणे परवडत नसल्याने ते पाण्यासाठी दूरची भटकंती करत आहेत.

कोट : कासारवाडी गावाला तात्पुरती सोय म्हणून अंबप मनपाडळे योजनेतून लवकरच वारणेचे पाणी देण्याचे नियोजन केले आहे. मनीषा माने, (जिल्हा परिषद सदस्य)

गावाला प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. वारणेचे पाणी ग्रामपंचायतीकडून विकत घेतले जाते. वारणेची पाणी पट्टी भरली असून, पाणी दोन दिवसांत येईल. शोभाताई खोत, सरपंच

फोटो : ०५ कासारवाडीत पाणीटंचाई

कासारवाडीत सध्या पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी वणवण करताना महिला.

२) कोरोनाच्या महामारीत पाण्यासाठी वणवण करणारी वृद्ध महिला.