शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘करवीर’चे २00 एकरांतील ऊस पीक धोक्यात

By admin | Updated: September 26, 2015 00:13 IST

दुष्काळाचे सावट : नद्यांची पाण्याची पातळी घटली, ऊस पिके करपू लागली, उत्पादन घटणार

शिवराज लोंढे -- सावरवाडी  यंदाच्या खरीप हंगामातील जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले असून करवीर तालुक्यात नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी खालावली गेली. सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनाद्वारे पिकांना होणाऱ्या अपुरा पाणीपुरवठ्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने पावसाविना तालुक्याच्या पश्चिम भागातील दोनशे एकर उभे ऊस पीक वाळू लागल्याने शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे.डोंगरी भागातील खरीप पिके पावसाअभावी वाळू लागली आहेत. नाचना, ज्वारी, भूईमुग, वरी, सोयाबीन, भात, ऊस या पिकांना यंदा अपुऱ्या पावसाचा फटका बसू लागला आहे. दुष्काळसदृश स्थिती निर्माण होऊ लागल्याने खरिपाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.पावसाने दडी मारल्याने नदी व विहिरीतील पाणी शेतीला देण्यासाठी बळिराजाला कठोर परिश्रम करावे लागले. ऊस क्षेत्राला नियोजित हंगामात पाणी वेळेवर न मिळाल्यामुळे ऊस पिके सध्या वाळू लागली आहेत. नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने शेती पिकांबरोबर नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाणी प्रश्न भेडसावणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात ऊस पिकांना मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे विविध खतांचे डोस शेतकऱ्यांनी देणे बंद केले. शिवाय वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ऊस पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाल्याने साखर कारखान्यांच्यासमोर चालू ऊस गळीत हंगामात ऊस खोडवा, बोडवा, ऊस लागण क्षेत्र ऊस पिकांतून एकरी २0 ते २५ हजार रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. खरीप हंगामात पाऊस झाला नसल्यामुळे उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून ऊस टंचाईचा फटका साखर कारखान्यासह ऊस तोडणी मजूर, ऊस वाहतूकदार, शेतकरी, नोकरदार वर्ग यांना बसणार आहे. यावर्षी दुष्काळ स्थिती निर्माण झाल्यामुळे भात, भुईमूग, वरी, नाचणा या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तालुक्यातील डोंगरी भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाझर तलावाच्या उभारणीकडे दुर्लक्ष झाले. मोठ- मोठे तलावांची उभारणी झाली नसल्यामुळे पाणी आडवा योजना राबविल्या नाहीत. परिणामी भोगावती, तुळशी नद्यांवरील पाण्याचा ताण अद्याप कमी झालेला नाही. दुष्काळ काळात शेतीला पाणीपुरवठ्याबाबत अद्याप कोणत्याच डोंगरी भागात योजना राबविल्या नसल्यामुळे पाणी टंचाई काळात शेती ओलिताखाली आणण्याचे स्वप्न भंगले आहे. पावसाची साथ न लाभल्यामुळे खरीप पिकांबरोबर ऊस पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. राज्य शासनाने करवीर तालुका दुष्काळ जाहीर करावा. शेतीला पाणी मिळाले पाहिजे. यासाठी पाझर तलावांची उभारणी होणे गरजेचे आहे. -रघुनाथ वरुटे, बहिरेश्वर , ता. करवीर