शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘करवीर’चे २00 एकरांतील ऊस पीक धोक्यात

By admin | Updated: September 26, 2015 00:13 IST

दुष्काळाचे सावट : नद्यांची पाण्याची पातळी घटली, ऊस पिके करपू लागली, उत्पादन घटणार

शिवराज लोंढे -- सावरवाडी  यंदाच्या खरीप हंगामातील जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले असून करवीर तालुक्यात नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी खालावली गेली. सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनाद्वारे पिकांना होणाऱ्या अपुरा पाणीपुरवठ्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याची पातळी खालावल्याने पावसाविना तालुक्याच्या पश्चिम भागातील दोनशे एकर उभे ऊस पीक वाळू लागल्याने शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे.डोंगरी भागातील खरीप पिके पावसाअभावी वाळू लागली आहेत. नाचना, ज्वारी, भूईमुग, वरी, सोयाबीन, भात, ऊस या पिकांना यंदा अपुऱ्या पावसाचा फटका बसू लागला आहे. दुष्काळसदृश स्थिती निर्माण होऊ लागल्याने खरिपाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.पावसाने दडी मारल्याने नदी व विहिरीतील पाणी शेतीला देण्यासाठी बळिराजाला कठोर परिश्रम करावे लागले. ऊस क्षेत्राला नियोजित हंगामात पाणी वेळेवर न मिळाल्यामुळे ऊस पिके सध्या वाळू लागली आहेत. नद्यांच्या पात्रात पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने शेती पिकांबरोबर नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाणी प्रश्न भेडसावणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात ऊस पिकांना मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे विविध खतांचे डोस शेतकऱ्यांनी देणे बंद केले. शिवाय वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ऊस पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाल्याने साखर कारखान्यांच्यासमोर चालू ऊस गळीत हंगामात ऊस खोडवा, बोडवा, ऊस लागण क्षेत्र ऊस पिकांतून एकरी २0 ते २५ हजार रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. खरीप हंगामात पाऊस झाला नसल्यामुळे उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून ऊस टंचाईचा फटका साखर कारखान्यासह ऊस तोडणी मजूर, ऊस वाहतूकदार, शेतकरी, नोकरदार वर्ग यांना बसणार आहे. यावर्षी दुष्काळ स्थिती निर्माण झाल्यामुळे भात, भुईमूग, वरी, नाचणा या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तालुक्यातील डोंगरी भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाझर तलावाच्या उभारणीकडे दुर्लक्ष झाले. मोठ- मोठे तलावांची उभारणी झाली नसल्यामुळे पाणी आडवा योजना राबविल्या नाहीत. परिणामी भोगावती, तुळशी नद्यांवरील पाण्याचा ताण अद्याप कमी झालेला नाही. दुष्काळ काळात शेतीला पाणीपुरवठ्याबाबत अद्याप कोणत्याच डोंगरी भागात योजना राबविल्या नसल्यामुळे पाणी टंचाई काळात शेती ओलिताखाली आणण्याचे स्वप्न भंगले आहे. पावसाची साथ न लाभल्यामुळे खरीप पिकांबरोबर ऊस पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. राज्य शासनाने करवीर तालुका दुष्काळ जाहीर करावा. शेतीला पाणी मिळाले पाहिजे. यासाठी पाझर तलावांची उभारणी होणे गरजेचे आहे. -रघुनाथ वरुटे, बहिरेश्वर , ता. करवीर