शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

कळंबा ग्रामपंचायत आक्रमक; टोलवसुली थांबवली

By admin | Updated: June 17, 2014 01:21 IST

पाच वाजता आयआरबीने वसुलीची टोलधाड टाकली

कळंबा : कळंबा टोलनाक्यावर सायंकाळी पाच वाजता आयआरबीने वसुलीची टोलधाड टाकली. सुरुवातीस कंपनीचे कर्मचारी रस्त्यावर बॅरेकेटस् लावून अरेरावीत टोलवसुली करत होते ही बाब ग्रामपंचायत सदस्यांच्या निदर्शनास येताच सरपंच विश्वास गुरव, उपसरपंच उदय जाधव, दीपक तिवले, प्रकाश पाटील अन्य सहकारी मोठ्या संख्येने टोलनाक्यावर आले व त्यांनी वसुली बंद पाडली. टोलनाका ग्रामपंचायत हद्दीत असून बॅरेकेटस् काढा व जबरदस्तीने टोलवसुली करू नका, असे त्यांनी सुनावले. यावर टोल कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तर केल्याने वादाचा प्रसंग उद्भवला पण ग्रामपंचायतीच्या टोल केबिनवरील नोटिशीने व आक्रमक भूमिकेने नमते घेत टोलवसुली थांबवून ते केबिनजवळ निर्विकारपणे तटस्थ उभे होते. कळंबा ग्रामपंचायतीचे सर्व आक्रमक सदस्य मोठ्या जागरूकतेने दर तासाला टोलनाक्यावर भेट देत राहिल्याने टोलवसुली थांबवण्यात आली. यावेळी एक सपोनि, ९ पोलीस कर्मचारी व एसआरपी सेक्शन पोलीस बंदोबस्तासाठी होते, तर आयआरबीचे आठ कर्मचारी व दोन गार्ड टोलवसुलीसाठी कार्यरत होते. पोलीस निवाऱ्याविना... गेले आठ दिवस आयआरबीने कळंबा टोलनाक्यावर निवारा उपलब्ध करून न दिल्याने पोलिसांना मुलभूत गरजांसाठी वणवण करावी लागते. किलबिल हॉटेलचे चालक अमित साळोखे यांनी सामाजिक दातृत्व जपले. त्यामुळे हॉटेल परिसर व एका खताच्या दुकानाबाहेर वळकटी टाकून बाहेरगावच्या पोलिसांनी रात्र काढली. आता पावसाळ्यात काय, हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. (वार्ताहर)