शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कागलच्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा २२ व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:25 IST

कागल : व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याचे काम तसे सोपे नाही. एक तर ती व्यक्ती स्वतःच्या आत्मबलावर यातून ...

कागल : व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याचे काम तसे सोपे नाही. एक तर ती व्यक्ती स्वतःच्या आत्मबलावर यातून बाहेर पडते. अथवा त्याच्यावर शास्त्रीय उपचाराची आवश्यकता असते. व्यसनाच्या गर्तेत सापडलेल्या शेकडो लोकांना बाहेर काढून त्यांना व्यसनमुक्त करण्याचे काम गेली २२ वर्षे कागलमधील नवजीवन संस्था करीत आहे. नावा प्रमाणे नवजीवन प्राप्त करून हे लोक येथून बाहेर पडले आहेत.

कागल शहरात नवनवीन शैक्षणिक सुविधा निर्माण करणारे कै.वाय.डी माने आण्णा यांनी दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून १९९८ मध्ये अलका शेती फार्मच्या निसर्गरम्य वातावरणात हे केंद्र सुरू केले. पदरमोड करून चालवलेही. आज महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यसनमुक्ती केंद्र म्हणून नवजीवन संस्थेचा लौकिक झाला आहे. प्रामुख्याने दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना येथे उपचारासाठी सोडले जाते. वैद्यकीय उपचार आणि मानसोपचाराच्या माध्यमातून १०० टक्के व्यसनमुक्त करण्याचे काम केले जाते. व्यसनमुक्त होऊन गेलेल्या व्यक्तींशी पुन्हा पुढील वर्षभर संपर्क ठेवून त्याचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भय्या माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक बिपीन माने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या डीन शिल्पा पाटील, प्रकल्प समन्वयक अक्षय पाटील आणि त्यांचे सहकारी या केंद्राचे काम पाहत आहेत.

● चौकटीत.

कागल सांगावं रस्त्यावर हे केंद्र निसर्गरम्य वातावरणात आहे. निवासाची, भोजनाची सोय आहे. ग्रंथालय, व्यायाम, योग, मनोरंजन, क्रीडासाहित्य अशा सुविधांबरोबर वैद्यकीय आणि मानसोपचार ही येथे केले जातात. शास्त्रीय पद्धतीने व्यसनमुक्तीचे उपाय येथे होतात.