शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फक्त मुहूर्ताची प्रतीक्षा!

By admin | Updated: May 26, 2014 01:14 IST

कोणत्याही क्षणी टोलधाड : पोलीस यंत्रणा सज्ज; ‘आयआरबी’ची तयारी बाकी

 कोल्हापूर : शहरात कोणत्याही क्षणी टोल सुरू होण्याची शक्यता आहे. टोलसाठी आवश्यक संरक्षण देण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आयआरबीने मागणी क रताच संरक्षण दिले जाणार आहे. आयआरबी व पोलीस यंत्रणा दोन्हींकडून टोलवसुलीची तयारी पूर्ण झाल्याने आता टोलसाठी फक्त मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून टोल सुरू होणार असल्याची शहरवासीयांत चर्चेला उधाण आले आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर आयआरबीने टोलवसुलीची तयारी सुरू केली. सुरुवातीस पोलीस प्रशासनास बंदोबस्त पुरविण्यासाठी पत्रव्यवहार केला. प्रथम लोकसभा निवडणूक व त्यानंतर नाक्यांवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पायाभूत सुविधा पुरविण्यावरून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त देण्यास असमर्थता दर्शविली. पोलिसांनी मागणी केल्याप्रमाणे सुविधा पुरविण्याची आयआरबीने तयारी पूर्ण केली आहे. आयआरबीने कोणत्याही परिस्थितीत पाऊस सुरू होण्यापूर्वी ३० मेपूर्वी टोल सुरू करण्याची व्यूहरचना आहे. न्यायालयाचा कौल बाजूने लागल्याने टोलवसुली सुरू करावीच लागेल. यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात आहे. आयआरबीच्या वरिष्ठांकडून टोलवसुली सुरू करण्याबाबत आदेश येताच शहरातील टोलवसुली सुरू करण्यात येईल. टोलवसुली सुरू होणार हे शंभर टक्के खरे असले तरी कधीपासून ते नेमके सांगता येणार नाही. मात्र, लवकरच टोलवसुली सुरू केली जाईल, असे आयआरबीने मनोज चौधरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)