शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

गडकिल्ल्यांसाठी आता इशारा देणे बस्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 01:13 IST

युवराज संभाजीराजे : शिवराज्याभिषेक सोहळ्यातून दुष्काळाबाबत प्रबोधन करणार

कोल्हापूर : राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासासाठी सरकारला इशारा देणे बस्स झाले. आता कृतियुक्त पाऊल टाकले जाईल. याअंतर्गत सरकारच्या मदतीशिवाय आम्ही स्वत:च जागतिक वारसा समितीला राज्यातील गडकिल्ले दाखवून त्यांच्या समावेशाबाबत प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी येथे केले. यावर्षीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात दुष्काळाबाबत उपाययोजना म्हणून उपक्रम, प्रबोधन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वर्षीच्या ३४३ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. तुळजाभवानी मंदिरातील बैठकीस ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. रमेश जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी नगरसेवक आदिल फरास, समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत, आदी प्रमुख उपस्थित होते.युवराज संभाजीराजे म्हणाले, राज्यातील गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नोंद नसल्याने त्यांच्या विकासासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही. त्या अनुषंगाने गड-किल्ल्यांची नोंद व्हावी म्हणून जागतिक वारसा समितीच्या डॉ. शीखा जैन यांच्याशी चर्चा केली आहे. किल्ले पाहण्यासाठी दि. २४ मे पासून डॉ. जैन या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवराज्यभिषेक सोहळा लोकोत्सव झाला आहे; पण, छत्रपती शिवराय यांचे केवळ नाव न घेता त्यांचे विचार कृतीतून मांडण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. सोहळ्यावेळी रायगडावर प्रत्येक शिवभक्ताने शिस्त पाळावी.डॉ. जाधव म्हणाले, संभाजीराजे यांचे कार्य राजकारणविरहित आहे. त्यातून शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव बनला आहे. इंद्रजित सावंत म्हणाले, छत्रपती शिवराय यांचे नाव घेऊन मोदी सरकार सत्तेत आले; पण त्यांनी किल्ल्यांच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. या सरकारला जागे करण्याची जबाबदारी युवराज संभाजीराजेंनी घ्यावी. त्या दृष्टीने रायगडावरून कृती कार्यक्रम जाहीर करावा. बैठकीत माणिक मंडलिक, बाबा महाडिक, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी शाहीर दिलीप सावंत, आझाद नायकवडी, राम पाटील, फिरोजखान उस्ताद, संजय पोवार, विनायक फाळके, आदी उपस्थित होते. शहाजी माळी यांनी स्वागत केले. हेमंत साळोखे यांनी आभार मानले. यावेळी शहरातील गडकिल्लेप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)पन्हाळगडापासून पाहणीचा प्रारंभमहाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या पाहणीची सुरुवात डॉ. जैन या मंगळवारी (दि. २४) पन्हाळागडापासून करणार असल्याचे युवराज संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, पन्हाळ्यानंतर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड, शिवनेरीची त्या पाहणी करतील. यानंतर दि. २६ मे रोजी मंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत, तर दि. २७ मे रोजी सर्व दुर्ग संवर्धन संघटनांसमवेत त्यांची बैठक होणार आहे.मानधन, एक हजार किलो तांदूळया बैठकीत नगरसेविका हसिना फरास, नगरसेवक महेश सावंत, संदीप कवाळे यांनी महानगरपालिकेचे आपले एक महिन्याचे मानधन तर, महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी एक हजार किलो तांदळाची मदत जाहीर केली. पर्यावरण जपावे. ग्रामीण भागात सोहळा पोहोचावा. रायगडला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. गडावरील बुरूजांवर चढून त्यांची मोडतोड करणाऱ्यांना रोखावे, अशा सूचना बैठकीत काही शिवभक्तांनी केल्या.