शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गडकिल्ल्यांसाठी आता इशारा देणे बस्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 01:13 IST

युवराज संभाजीराजे : शिवराज्याभिषेक सोहळ्यातून दुष्काळाबाबत प्रबोधन करणार

कोल्हापूर : राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासासाठी सरकारला इशारा देणे बस्स झाले. आता कृतियुक्त पाऊल टाकले जाईल. याअंतर्गत सरकारच्या मदतीशिवाय आम्ही स्वत:च जागतिक वारसा समितीला राज्यातील गडकिल्ले दाखवून त्यांच्या समावेशाबाबत प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी येथे केले. यावर्षीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात दुष्काळाबाबत उपाययोजना म्हणून उपक्रम, प्रबोधन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वर्षीच्या ३४३ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. तुळजाभवानी मंदिरातील बैठकीस ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. रमेश जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी नगरसेवक आदिल फरास, समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत, आदी प्रमुख उपस्थित होते.युवराज संभाजीराजे म्हणाले, राज्यातील गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नोंद नसल्याने त्यांच्या विकासासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही. त्या अनुषंगाने गड-किल्ल्यांची नोंद व्हावी म्हणून जागतिक वारसा समितीच्या डॉ. शीखा जैन यांच्याशी चर्चा केली आहे. किल्ले पाहण्यासाठी दि. २४ मे पासून डॉ. जैन या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवराज्यभिषेक सोहळा लोकोत्सव झाला आहे; पण, छत्रपती शिवराय यांचे केवळ नाव न घेता त्यांचे विचार कृतीतून मांडण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. सोहळ्यावेळी रायगडावर प्रत्येक शिवभक्ताने शिस्त पाळावी.डॉ. जाधव म्हणाले, संभाजीराजे यांचे कार्य राजकारणविरहित आहे. त्यातून शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव बनला आहे. इंद्रजित सावंत म्हणाले, छत्रपती शिवराय यांचे नाव घेऊन मोदी सरकार सत्तेत आले; पण त्यांनी किल्ल्यांच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. या सरकारला जागे करण्याची जबाबदारी युवराज संभाजीराजेंनी घ्यावी. त्या दृष्टीने रायगडावरून कृती कार्यक्रम जाहीर करावा. बैठकीत माणिक मंडलिक, बाबा महाडिक, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी शाहीर दिलीप सावंत, आझाद नायकवडी, राम पाटील, फिरोजखान उस्ताद, संजय पोवार, विनायक फाळके, आदी उपस्थित होते. शहाजी माळी यांनी स्वागत केले. हेमंत साळोखे यांनी आभार मानले. यावेळी शहरातील गडकिल्लेप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)पन्हाळगडापासून पाहणीचा प्रारंभमहाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या पाहणीची सुरुवात डॉ. जैन या मंगळवारी (दि. २४) पन्हाळागडापासून करणार असल्याचे युवराज संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, पन्हाळ्यानंतर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड, शिवनेरीची त्या पाहणी करतील. यानंतर दि. २६ मे रोजी मंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत, तर दि. २७ मे रोजी सर्व दुर्ग संवर्धन संघटनांसमवेत त्यांची बैठक होणार आहे.मानधन, एक हजार किलो तांदूळया बैठकीत नगरसेविका हसिना फरास, नगरसेवक महेश सावंत, संदीप कवाळे यांनी महानगरपालिकेचे आपले एक महिन्याचे मानधन तर, महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी एक हजार किलो तांदळाची मदत जाहीर केली. पर्यावरण जपावे. ग्रामीण भागात सोहळा पोहोचावा. रायगडला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. गडावरील बुरूजांवर चढून त्यांची मोडतोड करणाऱ्यांना रोखावे, अशा सूचना बैठकीत काही शिवभक्तांनी केल्या.