शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

गडकिल्ल्यांसाठी आता इशारा देणे बस्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 01:13 IST

युवराज संभाजीराजे : शिवराज्याभिषेक सोहळ्यातून दुष्काळाबाबत प्रबोधन करणार

कोल्हापूर : राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासासाठी सरकारला इशारा देणे बस्स झाले. आता कृतियुक्त पाऊल टाकले जाईल. याअंतर्गत सरकारच्या मदतीशिवाय आम्ही स्वत:च जागतिक वारसा समितीला राज्यातील गडकिल्ले दाखवून त्यांच्या समावेशाबाबत प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी येथे केले. यावर्षीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात दुष्काळाबाबत उपाययोजना म्हणून उपक्रम, प्रबोधन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वर्षीच्या ३४३ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. तुळजाभवानी मंदिरातील बैठकीस ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. रमेश जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी नगरसेवक आदिल फरास, समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत, आदी प्रमुख उपस्थित होते.युवराज संभाजीराजे म्हणाले, राज्यातील गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नोंद नसल्याने त्यांच्या विकासासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही. त्या अनुषंगाने गड-किल्ल्यांची नोंद व्हावी म्हणून जागतिक वारसा समितीच्या डॉ. शीखा जैन यांच्याशी चर्चा केली आहे. किल्ले पाहण्यासाठी दि. २४ मे पासून डॉ. जैन या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवराज्यभिषेक सोहळा लोकोत्सव झाला आहे; पण, छत्रपती शिवराय यांचे केवळ नाव न घेता त्यांचे विचार कृतीतून मांडण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. सोहळ्यावेळी रायगडावर प्रत्येक शिवभक्ताने शिस्त पाळावी.डॉ. जाधव म्हणाले, संभाजीराजे यांचे कार्य राजकारणविरहित आहे. त्यातून शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव बनला आहे. इंद्रजित सावंत म्हणाले, छत्रपती शिवराय यांचे नाव घेऊन मोदी सरकार सत्तेत आले; पण त्यांनी किल्ल्यांच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. या सरकारला जागे करण्याची जबाबदारी युवराज संभाजीराजेंनी घ्यावी. त्या दृष्टीने रायगडावरून कृती कार्यक्रम जाहीर करावा. बैठकीत माणिक मंडलिक, बाबा महाडिक, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी शाहीर दिलीप सावंत, आझाद नायकवडी, राम पाटील, फिरोजखान उस्ताद, संजय पोवार, विनायक फाळके, आदी उपस्थित होते. शहाजी माळी यांनी स्वागत केले. हेमंत साळोखे यांनी आभार मानले. यावेळी शहरातील गडकिल्लेप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)पन्हाळगडापासून पाहणीचा प्रारंभमहाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या पाहणीची सुरुवात डॉ. जैन या मंगळवारी (दि. २४) पन्हाळागडापासून करणार असल्याचे युवराज संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, पन्हाळ्यानंतर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड, शिवनेरीची त्या पाहणी करतील. यानंतर दि. २६ मे रोजी मंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत, तर दि. २७ मे रोजी सर्व दुर्ग संवर्धन संघटनांसमवेत त्यांची बैठक होणार आहे.मानधन, एक हजार किलो तांदूळया बैठकीत नगरसेविका हसिना फरास, नगरसेवक महेश सावंत, संदीप कवाळे यांनी महानगरपालिकेचे आपले एक महिन्याचे मानधन तर, महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी एक हजार किलो तांदळाची मदत जाहीर केली. पर्यावरण जपावे. ग्रामीण भागात सोहळा पोहोचावा. रायगडला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. गडावरील बुरूजांवर चढून त्यांची मोडतोड करणाऱ्यांना रोखावे, अशा सूचना बैठकीत काही शिवभक्तांनी केल्या.