शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

भाताच्या किमान वैधानिक दराची केवळ चर्चाच

By admin | Updated: December 17, 2014 23:10 IST

आजऱ्यातील स्थिती : शेतकऱ्यांच्या गरजेनुसारच ठरतात दर, पीक येण्यापूर्वीच पैशाची उचल

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -गेले महिनाभर भाताच्या दर्जानुसार भाताला दर मिळावेत, भाताला किमान दर न देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत होणारी मागणी, कृषि उत्पन्न बाजार समित्या व व्यापाऱ्यांचे साटेलोटे असल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याचा केला जाणारा आरोप या सर्व मुद्यांनी भाताच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजेनुसार एप्रिल ते जून या कालावधीत येणाऱ्या भातपिकावर व्यापारी वर्गाकडून आगावू पैसे उचल होत असल्याने दराच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत.सर्वसाधारणपणे पेरणीपूर्व मशागतीपर्यंत ग्रामीण भागातील छोटा शेतकरी वर्ग निश्चित असतो. एक-दोन वादळी पाऊस झाल्यानंतर पेरणीची धांदल उडते. बियाणे खरेदी, खते खरेदी, चिखलणी, लावण, कापणी, मळणी अशी ही खर्चाची मालिका सुरूच राहते. भरीस भर म्हणून यामधील कालावधीत येणारे सण-समारंभावरील खर्च शेतकरी वर्गाला आर्थिक अडचणीत आणणारे ठरतात. समोर पीक असल्याने बँकापेक्षाही दोन-चार महिन्यांसाठी भात व्यापारी जवळचे वाटतात आणि भातपीक हातात येण्यापूर्वीच भाताचे दर ठरून बऱ्यापैकी पैसेही उचल केले जातात.आजरा तालुक्यात हा प्रकार सर्रास शेतकरी व व्यापारी या दोघांकडूनही वापरला जातो. या व्यवहारात गरजेला पैसे मिळाल्याने दराचा विषय दुय्यम ठरतो. तर उत्पादीत भात आपणाला मिळणारा याची खात्री व्यापारी वर्गास झाल्याने सुगीनंतर संबंधित शेतकऱ्याकडून भात वसूल करणे एवढेच काम व्यापाऱ्याचे राहते.वर्षानुवर्षे ग्रामीण भागामध्ये हिच प्रथा चालत आली आहे. त्यामुळे किमान वैधानिक दर हा प्रकार सामान्य शेतकऱ्यांपासून कितीतरी दूर आहे. गरजेनुसार पैशाला प्राधान्य दिले जाते. भात उत्पादकांना बाजारपेठेतील भाताच्या दराच्या कल्पना असल्याने फारसे आर्थिक नुकसान होणार नाही याची असे व्यवहार होताना काळजी घेतली जाते.आजरा तालुक्यात सुमारे पावणेतीन लाख क्विंटल भात प्रतिवर्षी उत्पादित होते. यापैकी दोन लाख क्विंटल भात शेतकरी वर्ग स्वत:च्या वापरासाठी तर ७५ हजार क्विंटल विक्रीसाठी उपलब्ध होतो यापैकी सुमारे २५ ते ३० हजार क्विंटलची उलाढाल ही शेतकरी-व्यापारी संबंधातून होते. यात दराला दुय्यम स्थान रहाते.बाजार समितीचेही प्रयत्न फसलेयापूर्वी कृषि उत्पन्न बाजार समितीने भात खरेदीचा उपक्रम राबविला होता. परंतु हा उपक्रम भात खरेदी करणारे, भात विक्री करणारे व भाताचा दर ठरवणारेही व्यापारीच असल्याने यशस्वी होवू शकला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम न पोहोचल्याने बाजार समितीला यामध्ये अपयश आले.दर्जेदार भाताची थेट बाजारात विक्रीभातावर व्यापाऱ्यांकडून आगाऊ स्वरूपात रकमांची उचल केली जात असली तरीही दफ्तरी, घनसाळ, काळा जिरगा, इद्रायणी, कोमल यासारख्या बाजारात वाढीव दर असणाऱ्या भातांची वाणे शेतकरी वर्ग थेट बाजारात विक्रीसाठी आणण्याकडेच शेतकऱ्यांचा कल दिसतो.