शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

नुसतीच ढगांची गर्दी, पाऊस काही पडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

कोल्हापूर : मुंबई, रायगड, पालघरमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असताना कोल्हापुरात मात्र आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. ...

कोल्हापूर : मुंबई, रायगड, पालघरमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असताना कोल्हापुरात मात्र आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. रविवारी ढग भरून येत होते; पण हलकीशी म्हणावी अशीदेखील पावसाची सर येत नव्हती. दिवसभर ऊनसावल्यांचा खेळ सुरू होता. दरम्यान, उद्या, मंगळवार-बुधवारपासून पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पावसाने कोल्हापुरात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच धुमाकूळ घातला आहे. मृग नक्षत्र पावसातच गेले. त्यानंतर आलेल्या आर्द्रा व पुनर्वसू (तरणा पाऊस) ही नक्षत्रे बऱ्यापैकी कोरडी गेली आहेत. किरकोळ सरींचा अपवाद वगळता कडकडीत ऊन अनुभवण्याची वेळ या दोन्ही नक्षत्रांत आली. त्यामुळे जिल्ह्यातील पीकपाण्यावरही संकटाचे ढग अधिक गडद झाले. सलग दोन नक्षत्रे कोरडी गेल्याने आता सर्व भिस्त पुढील तीन नक्षत्रांवर आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी चार वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडेही पावसाने पाठ फिरविल्याचे दिसत आहे. पाटगाव मध्यम प्रकल्पात ५६ मिलिमीटरचा अपवाद वगळता उर्वरित धरणक्षेत्रात चार ते आठ मिलिमीटर इतका अत्यल्प पाऊस गेल्या २४ तासांत नोंदविला गेला आहे. पाऊसच थांबल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही घट होऊ लागली आहे. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळची पातळी एका दिवसात आणखी अडीच फुटांनी उतरली असून, ती आता साडेतेवीस फुटांवर आहे.

चौकट

आजपासून म्हातारा पाऊस

आज, सोमवारपासून पुष्यर्क (म्हातारा पाऊस) नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा आहे. त्यामुळे पाऊस उधळणार की धुळधाण उडविणार याची आता प्रतीक्षा लागली आहे. या नक्षत्रात चांगला पाऊस होईल, असा पारंपरिक अंदाज आहे, तर हवामान खात्याने मंगळवारपासून पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला आहे. बुधवारपासून आठवडाभर पावसाचा जोर राहील, असेही अंदाजात म्हटले आहे.

चौकट

चार बंधारे वाहतुकीसाठी खुले

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याखाली गेलेले बंधारे हळूहळू खुले होऊ लागले आहेत. रविवारी दूधगंगेवरील दत्तवाड व कुंभी नदीवरील कळे, शेणवडे, सांगशी हे चार बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले. आता पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ; भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे तर कासारी नदीवरील यवलूजएवढेच बंधारे अजून पाण्याखाली आहेत.