शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

ग्रामसेवकांचा प्रवास होणार सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाकडील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. ...

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाकडील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. यामुळे पूर्वीचे ११०० अधिक नव्याने वाढलेले ४०० रुपये असे एकूण १५०० रुपये आता त्यांना प्रवास भत्त्यापोटी मिळणार आहेत. परिणामी त्यांचा प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ८३७ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. विविध प्रस्तावांची मान्यता आणि प्रशासकीय कामकाजाच्या पाठपुराव्यासाठी त्यांना तालुका स्तरावरील पंचायत समिती, जिल्हा परिषदेला वेळोवेळी भेट द्यावी लागते. पाणी पुरवठा साहित्य, घर, पाणीपट्टी, आदी कामांसाठी ते तालुक्याच्या ठिकाणी ये - जा करीत असतात. म्हणूनच त्यांना दरमहा ११०० रुपयांचा प्रवास भत्ता मिळत होता; पण वाढलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे हा मिळणारा प्रवास भत्ता अपुरा होता. यामुळे त्यात वाढ करून तीन हजार रुपये मिळावेत, अशी मागणी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची होती. यासाठी ते संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करीत राहिले. ठोस पाठपुरावा करूनही भाजप सरकारच्या काळात त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष लक्ष घालून प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली. यामुळे ऐन कोरोना काळात ग्रामसेवकांना आर्थिक बाबतीत दिलासा मिळाला आहे.

कोट

भत्त्यासह विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे सरकारकडे गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. नुकताच आघाडी सरकारने प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली. हा निर्णय चांगला आहे; पण सरकारने अन्य प्रलंबित मागण्याही सोडवाव्यात.

एन. के. कुंभार, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन

चौकट

सुमारे दहा कोटींचा बोजा

वाढीव ४०० रुपयांच्या भत्त्याचा लाभ राज्यातील सुमारे २१ हजार ९०० ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा होणार आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या या वाढीव भत्त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे दहा कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

चौकट

प्रलंबित मागण्या अशा

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना पंचायत विकास अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, शैक्षणिक पात्रतेत बदल करावा.