शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

ग्रामसेवकांचा प्रवास होणार सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाकडील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. ...

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाकडील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. यामुळे पूर्वीचे ११०० अधिक नव्याने वाढलेले ४०० रुपये असे एकूण १५०० रुपये आता त्यांना प्रवास भत्त्यापोटी मिळणार आहेत. परिणामी त्यांचा प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ८३७ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. विविध प्रस्तावांची मान्यता आणि प्रशासकीय कामकाजाच्या पाठपुराव्यासाठी त्यांना तालुका स्तरावरील पंचायत समिती, जिल्हा परिषदेला वेळोवेळी भेट द्यावी लागते. पाणी पुरवठा साहित्य, घर, पाणीपट्टी, आदी कामांसाठी ते तालुक्याच्या ठिकाणी ये - जा करीत असतात. म्हणूनच त्यांना दरमहा ११०० रुपयांचा प्रवास भत्ता मिळत होता; पण वाढलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे हा मिळणारा प्रवास भत्ता अपुरा होता. यामुळे त्यात वाढ करून तीन हजार रुपये मिळावेत, अशी मागणी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची होती. यासाठी ते संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करीत राहिले. ठोस पाठपुरावा करूनही भाजप सरकारच्या काळात त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष लक्ष घालून प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली. यामुळे ऐन कोरोना काळात ग्रामसेवकांना आर्थिक बाबतीत दिलासा मिळाला आहे.

कोट

भत्त्यासह विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे सरकारकडे गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. नुकताच आघाडी सरकारने प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली. हा निर्णय चांगला आहे; पण सरकारने अन्य प्रलंबित मागण्याही सोडवाव्यात.

एन. के. कुंभार, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन

चौकट

सुमारे दहा कोटींचा बोजा

वाढीव ४०० रुपयांच्या भत्त्याचा लाभ राज्यातील सुमारे २१ हजार ९०० ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा होणार आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या या वाढीव भत्त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे दहा कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

चौकट

प्रलंबित मागण्या अशा

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना पंचायत विकास अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, शैक्षणिक पात्रतेत बदल करावा.