शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा प्रवास होणार सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाकडील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. ...

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाकडील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. यामुळे पूर्वीचे ११०० अधिक नव्याने वाढलेले ४०० रुपये असे एकूण १५०० रुपये आता त्यांना प्रवास भत्त्यापोटी मिळणार आहेत. परिणामी त्यांचा प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ८३७ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. विविध प्रस्तावांची मान्यता आणि प्रशासकीय कामकाजाच्या पाठपुराव्यासाठी त्यांना तालुका स्तरावरील पंचायत समिती, जिल्हा परिषदेला वेळोवेळी भेट द्यावी लागते. पाणी पुरवठा साहित्य, घर, पाणीपट्टी, आदी कामांसाठी ते तालुक्याच्या ठिकाणी ये - जा करीत असतात. म्हणूनच त्यांना दरमहा ११०० रुपयांचा प्रवास भत्ता मिळत होता; पण वाढलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे हा मिळणारा प्रवास भत्ता अपुरा होता. यामुळे त्यात वाढ करून तीन हजार रुपये मिळावेत, अशी मागणी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची होती. यासाठी ते संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करीत राहिले. ठोस पाठपुरावा करूनही भाजप सरकारच्या काळात त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष लक्ष घालून प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली. यामुळे ऐन कोरोना काळात ग्रामसेवकांना आर्थिक बाबतीत दिलासा मिळाला आहे.

कोट

भत्त्यासह विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे सरकारकडे गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. नुकताच आघाडी सरकारने प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली. हा निर्णय चांगला आहे; पण सरकारने अन्य प्रलंबित मागण्याही सोडवाव्यात.

एन. के. कुंभार, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन

चौकट

सुमारे दहा कोटींचा बोजा

वाढीव ४०० रुपयांच्या भत्त्याचा लाभ राज्यातील सुमारे २१ हजार ९०० ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा होणार आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या या वाढीव भत्त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे दहा कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

चौकट

प्रलंबित मागण्या अशा

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना पंचायत विकास अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, शैक्षणिक पात्रतेत बदल करावा.