शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

ग्रामसेवकांचा प्रवास होणार सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाकडील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. ...

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाकडील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात दरमहा ४०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. यामुळे पूर्वीचे ११०० अधिक नव्याने वाढलेले ४०० रुपये असे एकूण १५०० रुपये आता त्यांना प्रवास भत्त्यापोटी मिळणार आहेत. परिणामी त्यांचा प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ८३७ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना होणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. विविध प्रस्तावांची मान्यता आणि प्रशासकीय कामकाजाच्या पाठपुराव्यासाठी त्यांना तालुका स्तरावरील पंचायत समिती, जिल्हा परिषदेला वेळोवेळी भेट द्यावी लागते. पाणी पुरवठा साहित्य, घर, पाणीपट्टी, आदी कामांसाठी ते तालुक्याच्या ठिकाणी ये - जा करीत असतात. म्हणूनच त्यांना दरमहा ११०० रुपयांचा प्रवास भत्ता मिळत होता; पण वाढलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे हा मिळणारा प्रवास भत्ता अपुरा होता. यामुळे त्यात वाढ करून तीन हजार रुपये मिळावेत, अशी मागणी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची होती. यासाठी ते संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करीत राहिले. ठोस पाठपुरावा करूनही भाजप सरकारच्या काळात त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष लक्ष घालून प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली. यामुळे ऐन कोरोना काळात ग्रामसेवकांना आर्थिक बाबतीत दिलासा मिळाला आहे.

कोट

भत्त्यासह विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे सरकारकडे गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. नुकताच आघाडी सरकारने प्रवास भत्त्यात ४०० रुपयांची वाढ केली. हा निर्णय चांगला आहे; पण सरकारने अन्य प्रलंबित मागण्याही सोडवाव्यात.

एन. के. कुंभार, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन

चौकट

सुमारे दहा कोटींचा बोजा

वाढीव ४०० रुपयांच्या भत्त्याचा लाभ राज्यातील सुमारे २१ हजार ९०० ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा होणार आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या या वाढीव भत्त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला सुमारे दहा कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

चौकट

प्रलंबित मागण्या अशा

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना पंचायत विकास अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, शैक्षणिक पात्रतेत बदल करावा.