शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

जिगरबाज शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर कंपनीला नमविले

By admin | Updated: March 2, 2017 01:07 IST

सर्वोच्च न्यायालयात दिली झुंज : नुकसानभरपाई मिळाली ६७ लाख

विश्वास पाटील (कोल्हापूर) : ‘अन्याय झाला की त्याविरोधात संघर्ष करायचा’ हा कोल्हापूरच्या मातीचाच गुण आहे या गुणाचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले असून या जिल्'ातील नऊ शेतकऱ्यांनी एका बलाढ्य ट्रॅक्टर कंपनीबरोबर तब्बल वीस वर्षे संघर्ष करून आपल्या घामाचे दाम परत मिळविण्यात यश मिळविले. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्यांची लढाई कोल्हापूरच्याच नव्हे, तर समस्त देशभरातील शेतकरीबांधवांना प्रेरणादायी आहे. या नऊ शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे २३ लाख रुपये १९९७ ला भरले होते. त्या बदल्यात कंपनीकडून व्याजासह ६७ लाख ४६ हजार ७०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.या खटल्याचा (केस क्रमांक ४५४२-४५५०/ २००८) निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मदन लोकूर व आदर्श गोयल यांनी दि. ६ डिसेंबर २०१६ ला दिला; परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दि. ३० जानेवारी २०१७ ला डिमांड ड्राफ्ट पाठविण्यात आले. ते नुकतेच त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. या खटल्यात कामेरी (ता. वाळवा) येथील अ‍ॅड. सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू नाममात्र मोबदल्यावर लावून धरली.घडले ते असे : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी तुकाराम पाटील (रा. तिटवे), पांडुरंग रामचंद्र आगळे (रा. सिद्धनेर्ली), आण्णासाहेब तातोबा मालगांवे (रा.भेंडवडे), पांडुरंग नागोजी पाटील (रा.चेंचेवाडी), हौसाबाई नारायण घाटगे (रा. वंदूर),चंद्रकांत बाबूराव जाधव (रा. शिये), नेमाण्णा बाळासाहेब वसकुटे (रा. चंदनकुड), पांडुरंग नामदेव दळवी (रा. मालेवाडी) आणि सुमन शिवाजी कदम (रा.मुरगूड) यांनी १९९७ ला साई ट्रॅक्टर कंपनी यांचे वितरक संजय बाळासाहेब पाटील (रा. जुने खेड) यांच्याकडे नऊ ट्रॅक्टरसाठी २३ लाख रुपये भरले; परंतु कंपनीकडून आलेले ट्रॅक्टर वितरक पाटील याने परस्पर दुसऱ्यांना विकले व तो पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या शेतकऱ्यांनी कोल्हापुरात अ‍ॅड. सोळांकुरे यांच्या मदतीने ग्राहक न्यायालयात दाद मागितली. या न्यायालयाने २६ मे १९९८ ला ट्रॅक्टरसह नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी दहा हजार रुपये द्यावेत, असा निर्णय दिला; परंतु कंपनीने मुंबई ग्राहक न्यायालयात त्यास आव्हान दिले. या न्यायालयात न्यायाधीश अमित बोरकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला व हा दावा दाखल करून घेतानाच कंपनीने अगोदर प्रत्येकी शेतकऱ्याच्या नावावर प्रत्येकी एक लाख रुपये अनामत रक्कम भरावी, असा आदेश दिला. कंंपनीने या निकालास दिल्ली ग्राहक न्यायालयात आव्हान दिले. त्याचा निकाल २२ डिसेंबर २००७ ला लागला. शेतकऱ्यांनी कंपनी व वितरक एजंटावर खटला दाखल केला होता; परंतु दरम्यान एजंटाचा मृत्यू झाला. कंपनीने या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई सोडून द्यावी, असाही हेतू त्यामागे होता; परंतू शेतकरी मागे सरले नाहीत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तब्बल दहा वर्षे झुंज दिली.शेट्टी यांच्यामुळे लढाईला बळ..कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपिल केल्यावर शेतकऱ्यांच्या पोटात गोळाच आला. कर्जाचे हप्ते आणि न्यायालयीन खर्च पेलताना जीव मेटाकुटीला आला. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न तयार झाल्यावर राजेंद्र मालगावे यांनी त्यांची खासदार राजू शेट्टी यांच्याशी भेट घडवून आणली. शेट्टी यांनी हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने मला राजकीयदृष्ट्या त्यात काही करता येणार नाही, परंतु तुम्ही जेवढ्या वेळेला त्याच्या तारखेसाठी दिल्लीत याल तेव्हा तुमच्या तेथील राहण्याची व जेवणाची व्यवस्था करतो, असे सांगितले. या देशातील न्यायव्यवस्था दुबळी नाही, ती तुम्हाला नक्कीच न्याय देईल. तुम्ही धीर सोडू नका, असा दिलासा दिल्यावर या शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली व न्याय मिळवूनच ते थांबले.तिघांचा मृत्यू..हा खटला सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. काही तर पैसे कधी मिळतील म्हणून झुरून मेले; परंतु अखेर न्याय मिळालाच व जेवढी रक्कम भरली होती त्याच्या तिप्पट मिळाली. जाट आंदोलनावेळी रेल्वे सेवा विस्कळीत झाली तेव्हा या खटल्यासाठी शेतकरी बेळगांवहून विमानाने दिल्लीला गेले परंतु माघार घेतली नाही.