शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रणरागिणींची गुरुवारी जनजागृती रॅली

By admin | Updated: October 9, 2016 01:34 IST

ताराराणी चौकातून निघणार : आचारसंहितेचे पालन करण्याबरोबर राज्यकर्त्यांना धडकी भरविणार

कोल्हापूर : मराठा मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी गुरुवारी (दि. १३) कोल्हापूर शहरात दुचाकी रॅली काढण्याचा निर्धार सकल मराठा रणरागिणींनी केला. याबाबत जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे शनिवारी बैठक झाली. यामध्ये रॅलीबाबत आचारसंहितेचे पालन करीत धडकी भरेल अशी रॅली काढण्याचा निश्चय यावेळी केला. गुरुवारी सकाळी नऊ वाजता ताराराणी चौकातून रॅलीस सुरुवात होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून बिंदू चौक, शिवाजी पुतळा मार्गे दसरा चौकात विसर्जित केली जाणार आहे. रॅलीच्या माध्यमातून १५ आॅक्टोबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. यावेळी विविध रणरागिणींनी मनोगत व्यक्त करीत शिस्तबद्ध रॅलीसाठी काय आचारसंहिता असणार याची माहिती दिली. दुचाकीवरून रॅलीत सहभागी होताना कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका, येताना पाण्याची बाटली, स्वत:चा डबा घेऊन यावे, असे आवाहन करीत वयोवृद्ध महिलांनी रॅलीत सहभागी होण्यापेक्षा दसरा चौकातील सांगता समारंभात उपस्थित राहावे, असे अरुंधती महाडिक यांनी सांगितले. १५ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपणाला जनजागृती करायची आहे, त्या दृष्टीने रॅलीतून प्रबोधन होणे गरजेचे आहे, अशी सूचना करीत येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक रणरागिणीने किमान ५० दुचाकी आणाव्यात, असे आवाहन प्रतिमा पाटील यांनी केले. रॅलीतून जाताना केवळ गाड्यांचेच आवाज येतील, याची दक्षता सर्वांनी घ्या. सेल्फीचा मोह कोणीही बाळगू नका, असे आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केले. मराठा समाजाला आतापर्यंत झालेला त्रास काय आहे, याची जाणीव आता सर्वच घटकाला झाल्याने १५ आॅक्टोबरचा मोर्चा ‘भूतो न भविष्यति’ असाच होईल, असा विश्वास महापौर अश्विनी रामाणे यांनी व्यक्त केला. रॅली नियोजनबद्ध केली तर अधिक चांगले होईल, यासाठी पुन्हा एकदा बैठक बोलावण्याची सूचना माजी महापौर सई खराडे यांनी केली. संयोगिताराजे छत्रपती, उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, रेखा आवळे, स्नेहल इनामदार, आदी उपस्थित होते.गाड्यांचा वेग ‘३०’ आणि नो स्कार्फ रॅलीमधील गाड्यांचा वेग प्रति तास २० ते ३० किलोमीटर असेल. त्यापेक्षा अधिक वेगाने गाडी पळवायची नाही, त्याचबरोबर तोंडाला स्कार्फ बांधायचा नाही आणि पांढरी साडी अथवा ड्रेस परिधान करूनच रॅलीत सहभागी होण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.