शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जनार्दन भोसलेंनी केली पाच हजार वृक्षलागवड

By admin | Updated: June 13, 2017 00:28 IST

१७ वर्षांचा प्रवास; पर्यावरणरक्षणाचा वसा--आम्ही जगवली झाडे..!

भरत बुटाले ।  लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आज ती झाडे डौलाने मुळं घट्ट करून उभी आहेत. सुमारे २० ते २५ फूट उंच असतील. अनेकदृष्टीने फायदेशीर ठरणारी झाडे पर्यावरणरक्षणाचेही कार्य करीत आहेत. टाकाळा परिसरात राहणाऱ्या जनार्दन भोसले यांनी १९९९ मध्ये पंढरपुरात विठ्ठलचरणी वृक्षारोपणाचा संकल्प केला होता. त्यावेळेपासून आजपर्यंत सुमारे चार ते पाच हजार झाडे त्यांनी लावून जास्तीत जास्त झाडांचे संगोपन केले आहे. प्रवासी वाहतूक व्यावसायिक भोसले हे पंढरपूर भागात दर्शनाला गेल्यावर तेथे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष अनुभवाला आले. तिथेच त्यांनी वृक्षारोपणाचा संकल्प सोडला आणि टाकाळा परिसरात झाडे लावण्यास सुरुवात केली. स्वखर्चातून झाडे आणायची, योग्य जागा पाहून तिथं ती लावायची, त्याच्या खत-पाण्याची व्यवस्था करायची आणि शक्य तेवढे त्यांचे संगोपन करायचे, असा त्यांचा हा उपक्रम. अल्प शिक्षण आणि अगदी सामान्य परिस्थिती असूनसुद्धा त्यांनी १७ वर्षांपूर्वी केलेला हा संकल्प अनेक ठिकाणी लावलेल्या वृक्षराजीच्या रूपाने फळास आला आहे.त्यांनी आजपर्यंत रेन ट्री, कॅशिओ, गुलमोहर, लिंब, आंबा, फणस, करंजी, फॅटोडिया, कदंबा, डालचिनी, चिकू, नारळ या झाडांबरोबर औषधी झाडेही लावलेली आहेत. झाडांना ट्री गार्ड लावून त्याचे संरक्षण करणाऱ्या जनार्दन भोसले यांना त्यांच्या मित्रपरिवाराने ‘वृक्षमित्र’ उपाधी बहाल केली आहे. टाकाळा, पांजरपोळ, उजळाईवाडी, कागल पंचतारांकित एमआयडीसी, निपाणी बसस्टँड, आदी अनेक परिसरात त्यांनी लावलेली झाडे डौलाने उभी आहेत. त्यांच्या या संकल्पाला अनेकांनी हातभार लावला आहे. वैयक्तिक, संस्था तसेच जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते झालेला गौरव हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.प्रत्येकाने एकतरी झाड लावावे आणि त्याला आपल्या मुलाप्रमाणे जपावे, असे नेहमीच वाटते. याची फळे पुढच्या पिढीला नक्कीच मिळतील. नाही तर पुढची पिढी, निसर्ग आपल्याला कदापिही माफ करणार नाही. - जनार्दन भोसले, वृक्षमित्र, टाकाळा, कोल्हापूर.कोल्हापुरातील टाकाळा येथील विद्यालंकार क्लासेसच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. शिवाजी सावंत, जनार्दन भोसले, रोहन शिर्के, डॉ. सुरज पोवार, रवी चव्हाण, आदी उपस्थित होते.