शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

भाजप ओबीसी मोर्चातर्फे ‘जनआक्रोश’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त इतर मागास आरक्षण रद्द ...

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त इतर मागास आरक्षण रद्द ठरवले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे हे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने गुरुवारी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जन आक्रोश’ आंदोलन करण्यात आले.

सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.

संदीप कुंभार म्हणाले, या आरक्षण रद्द निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. १२ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ओबीसी समाजासाठी “लवकरात लवकर ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे’ गठन करावे, राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा, असे आदेश दिले होते. याला पंधरा महिने झाले तरीही अजून राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापनाही करण्यात आलेली नाही.

राहुल चिकोडे म्हणाले, ज्या गोपीनाथ मुंडे यांनी मोठा संघर्ष उभारून ओ.बी.सी. समाजाला अनेक सवलती मिळवून दिल्या. त्यांच्या स्मृतीदिनी आम्ही हे आंदोलन छेडले आहे. केवळ ठाकरे सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे हे आरक्षण रद्द झाले आहे.

यावेळी भाजप सरचिटणीस हेमंत आराध्ये, गणेश देसाई, ओ.बी.सी. महिला मोर्चा प्रमुख विद्या बनछोडे यांची भाषणे झाली.

यावेळी भाजप सरचिटणीस दिलीप मेत्राणी, दिग्विजय कालेकर, विजय आगरवाल, महेश यादव, राजाराम परिट, अरविंद वडगावकर, दीपक पेटकर, प्रकाश कालेकर, सतीश यादव, संजय खेडकर, श्रीशैल्य स्वामी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

०३०६२०२१ कोल बीजेपी ०१

भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने गुरुवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदाेलन करण्यात आले.