शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

आता महाविद्यालयांत घुमणार ‘जन गन मन....

By admin | Updated: July 20, 2014 00:09 IST

उच्च शिक्षणचे सर्व विद्यापीठांना पत्र : प्राचार्य व विद्यार्थी संघटनांमधून निर्णयाचे स्वागत

कोल्हापूर : ‘जन गण मन...’ हे राष्ट्रगीत आता सर्व महाविद्यालयांत घुमणार आहे. महाविद्यालयांत राष्ट्रगीत सुरू करण्याबाबतचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलसचिव आणि शिक्षण संचालकांना पाठविले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार असून, या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात येत असून, राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती वाढण्यास यामुळे नक्कीच उपयुक्त ठरेल, असे मत विविध महाविद्यालयांतील प्राचार्य व विद्यार्थी संघटनांमधून व्यक्त होत आहे. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत म्हटले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व देशभक्तीची भावना निर्माण होते. हीच भावना तरुण पिढीमध्ये जागृत करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रगीत म्हणण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम वाढण्यासाठी मदत होणार आहे. तसेच महाविद्यालय सुरू होताना पहिल्यांदा राष्ट्रगीत होणार आहे. त्यानंतर महाविद्यालय सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत येण्याची सवय लागणार आहे. यातून देशप्रेम, बंधुप्रेम आणि सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. - प्राचार्य एस. बी. कणसे,महावीर महाविद्यालय पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत घेतले जाते. आता महाविद्यालयांतही राष्ट्रगीत म्हटले जाणार आहे. त्यामुळे शाळांतील जुन्या आठवणींना उजाळा तर मिळणार आहे. पण त्यासोबतच देशाबद्दल युवक-युवतीमध्ये आणखी देशप्रेम वाढणार आहे. - भारत घोडके, अध्यक्ष, एनएसयुआयराष्ट्रगीत सक्तीबाबत विद्यापीठास शासनाचे परिपत्रक मिळाले आहे. याबाबत शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्यावतीने विद्यापीठाशी संलग्नित २८० महाविद्यालयांना परिपत्रक काढण्यात आले आहे. महाविद्यालयांनी कार्यवाहीबाबतचा अहवाल विद्यापीठाला पाठवावा लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेपुढे या बाबात विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत चर्चा होवू यांची अमंलबजावाणी करण्यात येणार आहे. - डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळशासनाने प्रत्येक महाविद्यालयांत राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे केले आहे. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची दररोज महाविद्यालयातील सुरुवात एका चांगल्या विचाराने होणार आहे. यामुळे त्यांच्यामध्ये देशप्रेम तर निर्माण होईलच, पण त्यासोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. - प्राचार्य डॉ. के. एस. नलवडे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज शासनाचा हा निर्णय चांगला आहे. देशभक्ती कमी होत चालेली होती,या निर्णयामुळे देशभक्ती वाढण्यासाठी आणि युवकांच्या मध्ये एकता वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे. या निर्णयांचे आम्ही स्वागत करतो. - चेतन शिंदे, जिल्हाप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना