शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

अमावस्येलाच अडकले ‘ते’ रेशीमगाठीत

By admin | Updated: June 17, 2015 00:39 IST

अशुभाला मानले शुभ : अजित अन् हेमा यांचा नोंदणी पद्धतीने विवाह

सातारा : अमावस्येला कोणत्याही शुभकार्याचे नियोजन केले जात नाही. या ‘अशुभ’ दिवसाला ‘शुभ’ करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कऱ्हाड येथील कार्यकर्त्याने घेतला. मंगळवारी (दि. १६) अमावस्येच्या ‘मुहूर्ता’वर मुलगा अजित आणि हेमा हे लग्नाच्या रेशीम बंधनात बांधले गेले अन् त्यांनी वैवाहिक जीवनाला प्रारंभ केला.अमावस्या ही नैसर्गिक कालचक्रासाठी अत्यावश्यक असल्याचे विज्ञान सांगत असले तरी आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. दूरगावी जायचे असले तरी अनेकजण रद्द करतात. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात अमावस्येला करत नाहीत. हा समज दूर करण्यासाठी कऱ्हाडचे सीताराम चाळके यांनी नातेवाइकांचे मन वळवून, प्रसंगी काहींचा रोष पत्करून आपला मुलगा अजित याचा विवाह हेमा यांच्याशी अमावस्येला करण्याचा निर्णय घेतला. लग्न आयुष्यात एकदाच होणारी घटना आहे. ती अविस्मरणीय व्हावी, म्हणून मोठा गाजावाजा केला जातो. मात्र नसानसात चळवळ भिनलेल्या चाळके कुटुंबीयांनी बँडबाजा, डॉल्बी, वरात, कर्मकांडे, होम आदींना फाटा दिला. सातारच्या नोंदणी अधिकाऱ्यांसमोर हा विवाह नोंदणी पद्धतीने उरकला. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते अन् मोजकेच नातेवाइक उपस्थित होते. त्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवण उरकले अन् विवाहसोहळा पार पडला. हा विवाह अविस्मरणीय ठरावा, यासाठी सायंकाळी स्वागत समारंभ आयोजित केला होता. यावेळी हिंदी-मराठी गीतांबरोबरच चळवळीतील, परिवर्तनाचा विचार सांगणाऱ्या प्रबोधनपर गाण्यांची मैफलीचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)विजेने साधला नेमका मुहूर्तअजित आणि हेमा यांचा विवाह नोंदणी पद्धतीने होणार होता. त्यांनी तो साध्या पद्धतीने करण्यासाठी फारसे कोणालाही निमंत्रण दिले नव्हते. मात्र, अमावस्येला लग्न करुन समाजात चांगला पायंडा पाडणार असल्याने ‘लोकमत’ने याची दखल घेतली होती. ‘लोकमत’मधील वृत्त वाचून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी असंख्य लोक वऱ्हाड बनून नोंदणी कार्यालयात ठिक बारा वाजता आलेही; पण वीज वितरण कंपनीनं नेमका मुहूर्त साधला. मंगळवार असल्याने दिवसभर विद्युतपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे नोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साडेदहालाच लग्न करण्याची विनंती केली अन् नाईलाजाने लग्न करावेही लागले. यामुळे बाराच्या मुहूर्तावर आलेल्यांची मात्र निराशा झाली.