शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

अमावस्येलाच अडकले ‘ते’ रेशीमगाठीत

By admin | Updated: June 17, 2015 00:39 IST

अशुभाला मानले शुभ : अजित अन् हेमा यांचा नोंदणी पद्धतीने विवाह

सातारा : अमावस्येला कोणत्याही शुभकार्याचे नियोजन केले जात नाही. या ‘अशुभ’ दिवसाला ‘शुभ’ करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कऱ्हाड येथील कार्यकर्त्याने घेतला. मंगळवारी (दि. १६) अमावस्येच्या ‘मुहूर्ता’वर मुलगा अजित आणि हेमा हे लग्नाच्या रेशीम बंधनात बांधले गेले अन् त्यांनी वैवाहिक जीवनाला प्रारंभ केला.अमावस्या ही नैसर्गिक कालचक्रासाठी अत्यावश्यक असल्याचे विज्ञान सांगत असले तरी आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. दूरगावी जायचे असले तरी अनेकजण रद्द करतात. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात अमावस्येला करत नाहीत. हा समज दूर करण्यासाठी कऱ्हाडचे सीताराम चाळके यांनी नातेवाइकांचे मन वळवून, प्रसंगी काहींचा रोष पत्करून आपला मुलगा अजित याचा विवाह हेमा यांच्याशी अमावस्येला करण्याचा निर्णय घेतला. लग्न आयुष्यात एकदाच होणारी घटना आहे. ती अविस्मरणीय व्हावी, म्हणून मोठा गाजावाजा केला जातो. मात्र नसानसात चळवळ भिनलेल्या चाळके कुटुंबीयांनी बँडबाजा, डॉल्बी, वरात, कर्मकांडे, होम आदींना फाटा दिला. सातारच्या नोंदणी अधिकाऱ्यांसमोर हा विवाह नोंदणी पद्धतीने उरकला. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते अन् मोजकेच नातेवाइक उपस्थित होते. त्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवण उरकले अन् विवाहसोहळा पार पडला. हा विवाह अविस्मरणीय ठरावा, यासाठी सायंकाळी स्वागत समारंभ आयोजित केला होता. यावेळी हिंदी-मराठी गीतांबरोबरच चळवळीतील, परिवर्तनाचा विचार सांगणाऱ्या प्रबोधनपर गाण्यांची मैफलीचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)विजेने साधला नेमका मुहूर्तअजित आणि हेमा यांचा विवाह नोंदणी पद्धतीने होणार होता. त्यांनी तो साध्या पद्धतीने करण्यासाठी फारसे कोणालाही निमंत्रण दिले नव्हते. मात्र, अमावस्येला लग्न करुन समाजात चांगला पायंडा पाडणार असल्याने ‘लोकमत’ने याची दखल घेतली होती. ‘लोकमत’मधील वृत्त वाचून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी असंख्य लोक वऱ्हाड बनून नोंदणी कार्यालयात ठिक बारा वाजता आलेही; पण वीज वितरण कंपनीनं नेमका मुहूर्त साधला. मंगळवार असल्याने दिवसभर विद्युतपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे नोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साडेदहालाच लग्न करण्याची विनंती केली अन् नाईलाजाने लग्न करावेही लागले. यामुळे बाराच्या मुहूर्तावर आलेल्यांची मात्र निराशा झाली.