शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडीला शिस्त लावणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST

लोगो: खुशाली की खंडणी कोल्हापूर : ऊसतोडीच्या त्रासाला कंटाळून उद्या शेतकऱ्यांनी ऊस लावणेच बंद केले तर जिल्ह्यातील साखर उद्योगाला ...

लोगो: खुशाली की खंडणी

कोल्हापूर : ऊसतोडीच्या त्रासाला कंटाळून उद्या शेतकऱ्यांनी ऊस लावणेच बंद केले तर जिल्ह्यातील साखर उद्योगाला ते परवडणारे नाही. ‘लोकमत’ने गेली ४ दिवस ऊसतोडीच्या माध्यमातून तयार होऊ पाहणाऱ्या खंडणी बहाद्दरांवर प्रहार केला. यावर शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत साखर कारखानादारांनीच याला शिस्त लावावी, असे ठाम मत व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निवडक साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी या विषयावरील दिलेल्या प्रतिक्रिया देत आहोत.

...............

ऊसताेड मजूर कमी येणे, हे एक कारणही या प्रकाराला हातभार लावत आहे. टोळ्या न येण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यासाठी शासनाने ऊसतोड मजूर महामंडळ तयार करावे. राज्यातील सर्व मजुरांची तेथे नोंदणी करावी. ज्या कारखान्यांना मजूर लागतील त्यांनी महामंडळाकडून पैसे भरून मजूर घेऊन जावे. यामुळे यातील गैरप्रकाराला आळा बसेल. शेतकऱ्यांनीही ऊसतोडीसाठी गडबड करू नये. शिस्त लावण्यासाठी कारखानदारांनीही पुढाकार घ्यायचा असेल तर आमची तयारी आहे.

-के.पी. पाटील, अध्यक्ष, दुधगंगा वेदगंगा साखर कारखाना, बिद्री

.....................

ऊसतोडीसाठी कुठे पैसे घेतले असतील तर माझ्याकडे लेखी तक्रार करा. मी त्या टॅक्टरवाल्याच्या वाहतूक बिलातून पैसे कट करून संबंधित शेतकऱ्याला देतो, असे आवाहन केले आहे; परंतु अद्याप एकाही शेतकऱ्याने तक्रार दिलेली नाही. शेतकऱ्यांनी ठाम राहून तोडीसाठी मागे लागणे बंद केले पाहिजे. आम्ही हस्तक्षेप केला तर टॅक्टरवाला दुसऱ्या दिवशीपासून इतर कारखान्याकडे ऊस नेण्यास सुरुवात करतो. यासाठी शेतकऱ्यांनीच आता पैसे देणार नाही, अशी भूमिका घ्यावी.

-सर्जेराव माने, अध्यक्ष, राजाराम सहकारी साखर कारखाना, क. बावडा

.....................

शेतकरी संघटनांची ठाम भूमिका व साखर कारखानदारांची शिस्त यामुळे शिरोळ तालुक्यात तरी तोडीसाठी पैसे घेण्याचे प्रकार कमी आहेत; परंतु इतर भागात अशा प्रकाराचा अतिरेक झाला आहे. आमच्याकडे क्रमपाळीनुसारच तोडणी होते व यात संचालकसुद्धा हस्तक्षेप करत नाहीत. असले प्रकार थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी आवाज उठवावा, त्यासाठी संचालकांनी पुढाकार घ्यावा. यामध्ये शिस्त आणण्यासाठी काही मदत लागली तर गुरुदत्त शुगर्स कायम तयार असेल.

-माधवराव घाटगे, प्रमुख गुरुदत्त शुगर्स, सैनिक टाकळी.

........................

आमच्या कारखान्यात क्रम पाळीपत्रकानुसारच तोडणी होते; परंतु कारखानदारांच्या स्पर्धेमुळे यंदा कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. आमच्याकडे ८० टक्के तोडणी मजूर हे भागातीलच आहेत. त्यांना काही दिवस गावात तर काही दिवस भागात ऊस तोड करावी लागते; परंतु इतर कारखान्यांनी त्यांना कुठूनही आणा; पण ऊस पुरवा, असे सांगितल्याने आमच्याकडील अनेक टोळ्या कमी झाल्या आहेत. आम्हाला अमुक एका कारखान्याकडे गावातच तोडणी मिळणार असेल, तर तुमच्याकडे कशाला येऊ, असा त्यांचा सवाल आहे. यातूनच पैसे घेऊन मनमानीपणे तोडीचे प्रकार सुरू आहेत. याला शिस्त लावणे काळाची गरज आहे.

-चंद्रदीप नरके, अध्यक्ष कुंभी कासारी साखर कारखाना, कुडित्रे.

......................

आम्ही कारखान्यावर अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे की, करार केलेले वगळता इतर टॅक्टर आमच्याकडे ऊस उतरूच शकत नाहीत. यंदा मजूर कमी आल्याने भीतीपोटी शेतकरी पैसे देऊन ऊस तोड घेत आहे; परंतु हे सर्व प्रकार आमच्या अपरोक्ष सुरू आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी तोडीसाठी गडबड करू नये. आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर असून शिस्त लावण्यासाठी काही निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी करू.

-श्रीधर गोसावी, जनरल मॅनेजर, डालमिया शुगर्स, आसुर्ले, पोर्ले

.........................

‘लाेकमत’ची भूमिका...

खुशाली नव्हे, खंडणी ही मालिका आम्ही मांडली. यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया मांडल्या. जिल्ह्यात सर्व पातळीवर शेतकऱ्यांची लूट सुरू असताना साखर कारखानदार, लाेकप्रतिनिधी, प्रशासन गांधारीची भूमिका घेऊन स्वस्थ कसे काय बसू शकतात, असा सवालही उपस्थित झाला. या ज्वलंत विषयावर मार्ग काढत शेतकऱ्यांची गळचेपी थांबावी, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व कारखानदार, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी यांची सर्वसमावेशक बैठक घ्यावी व यातून ऊसतोडीवर कुणाचे तरी नियत्रंण राहील, यासाठी कार्यक्रम तयार करावा. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची सधन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी ससेहोलपट होणे बरे नाही. यात लोकमत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांबरोबर असेल.

(समाप्त)