शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

अपघाताची माहिती सुरक्षा विभागाला देणे बंधनकारक

By admin | Updated: March 29, 2016 23:57 IST

अभिजीत अवसरे : कंपनी-ठेकेदारांत कोणताही दुजाभाव नाही...

आवाशी : कोणत्याही कारखान्यात महिलांनी काम करणे, हा समान नागरी कायद्याचाच भाग असल्याने त्याचा महिलानाही अधिकार प्राप्त होतो. मात्र, कंपनी आवारात अपघात घडल्यास ती महिला कंपनीत काम करते की ठेकेदाराकडे यात दुजाभाव नसून, आवारात घडलेल्या कोणत्याही अपघाताची माहिती त्यांनी सुरक्षा विभागाला देणे हे बंधनकारक आहे, अशी माहिती सुरक्षा विभाग, कोल्हापूरचे निरीक्षक अभिजीत अवसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लोटे - परशुराम (ता. खेड) येथे शनिवारी नामांकित रासायनिक कारखान्यात एका महिलेला अपघात झाला. एक महिला एका रासायनिक कंपनीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पॉवर प्रोजेक्टमध्ये बांधकाम विभागात काम करत होती. सकाळच्या सत्रात कामावर असताना तिला कंपनीतच सर्पदंश झाला. तिथे काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तिला जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यावेळी ती बेशुध्द पडली होती. तिथे उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचार करून शुद्धीवर आणले व अधिक उपचारासाठी डेरवण येथे रुग्णवाहिकेतून पाठवले. यावेळी तिच्यासोबत तिच्या कामातील केवळ सहकारी होते. कंपनीचा वा ती ज्या ठेकेदाराकडे काम करते, तोही सोबत नव्हता. उपलब्ध माहितीनुसार अजूनही ती महिला तेथे उपचार घेत असल्याचे समजते.या घटनेवर कंपनी प्रशासनाकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ‘लोकमत’ने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असता कोल्हापूरचे सुरक्षा विभागाचे निरीक्षक अभिजित अवसरे यांनी सांगितले की, कंपनीत महिलांना काम करण्याचा अधिकार आहे. मात्र, आपल्याकडे अजून तरी रात्रपाळीत काम करण्यासाठी कोणताही अध्यादेश कार्यान्वित केलेला नाही. तरीदेखील ही महिला ठेकेदारी पद्धतीवर वा तत्सम कोणत्याही क्षेत्रात काम करत असेल आणि तिला अपघाताला सामोरे जाऊन वैद्यकीय उपचार घेण्याची वेळ येत असेल, तर तासाच्या कालावधीत ज्या कंपनीत अपघात घडला आहे, त्या कंपनीने सुरक्षा विभागाला माहिती देणे बंधनकारक आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दोन दिवसांपूवी घडलेली घटना कोणत्या कंपनीत घडली, याची माहिती घ्या आणि आम्हाला कळवा, आम्ही त्वरित कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले. मात्र, या वसाहतीत दररोज किरकोळ वा गंभीर स्वरूपाचे अपघात होत असतात. अशावेळी इथल्या राजकीय वा स्थानिक ठेकेदाराला हाताशी धरून पोलिसांकरवी ही प्रकरणे दडपण्यात येतात. हाही अपघात तसाच दडपला गेल्याची दाट शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.स्थानिक पोलिसांना माहिती देऊनही मंगळवारी त्यांना विचारणा केली असता त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. याबाबत अवसरे म्हणाले की, कंपनी आवारात घडलेला अपघात छोटा असो वा मोठा, त्याची माहिती सुरक्षा विभागाला देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, इथे तसे होताना दिसत नाही. परवाच्या अपघाताबाबत यामध्ये कमालीची दिरंगाई दिसून आली असून, असे प्रकार या वसाहतीत सातत्याने दिसून येतात.ती महिला कंपनीची कायमस्वरूपी कामगार असती तर तिची तरी नोंद घेतली असती का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या आणि एकूणच कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (वार्ताहर)लोटे परशुराम येथील रासायनिक कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पात काम करत असताना महिलेला झाला सर्पदंश.कंपनी प्रशासनाकडून घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न.कंपनीत अपघात झाल्यानंतर तासाभरात सुरक्षा विभागाला माहिती देणे कंपनीला बंधनकारक : अवसरे यांची माहिती.