शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘केल्याने होत आहे रे...आधी..’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:22 IST

शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन सहकार चळवळीत काम करताना विश्वास संपादन करणे, हेच सूत्र महत्त्वाचे आहे. माझ्या कार्यक्षेत्रात हेच सूत्र वापरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळेच सहकार

ठळक मुद्दे नेहमीच मनात ठेवून प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करावे लागेल, असे मला मनापासून वाटते.

शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन सहकार चळवळीत काम करताना विश्वास संपादन करणे, हेच सूत्र महत्त्वाचे आहे. माझ्या कार्यक्षेत्रात हेच सूत्र वापरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळेच सहकार चळवळीच्या रथाची ही दोन चाके गतिमान होताना दिसत आहेत. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हे मात्र नक्की!

सहकार चळवळीचा मूलभूत पाया शेतकरी व कामगार वर्गानेच घातला आहे. चळवळ यशस्वी व्हायची असेल, तर अशा पायाभूत काम करणाऱ्या घटकांना विश्वासात घेऊन काम करावे लागते, हा माझा अनुभव आहे. एकदा का विश्वास निर्माण झाला की, समन्वय साधता येतो. नवनवीन प्रयोग करताना या घटकांचा अधिक लाभ मिळतो. या घटकांकडे दुर्लक्ष झाल्यास चळवळीचा हेतू बिघडतो. सद्य:स्थितीला शेती उत्पादन हा विषय चिंतनाचा बनला आहे. दिवसेंदिवस शेतकºयांचे प्रश्न गंभीर स्वरूपाने पुढे येत आहेत, अशा प्रश्नांकडे पाठ फिरवून चालणार नाही. उदा. शिरोळ तालुक्यातील क्षारपड झालेल्या हजारो एकर नापिक जमिनी व या संकटातून आर्थिकदृष्ट्या हतबल झालेला शेतकरी हे वास्तव नाकारता येण्यासारखे नाही. याप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आम्ही अशा शेतकºयांना एकत्रित करून जमीन क्षारपडमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

कामगार व कष्टकरी हा वर्ग उत्पादनाशी निगडित असला तरी सर्व क्षेत्रांंत येऊ पाहत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान कामगारांना देऊन त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. यासाठी त्यांची मानसिकता तयार करणे व दर्जेदार उत्पादनानंतर त्यांना त्याचा लाभ उपलब्ध करून देण्याचे काम योग्य वेळी झाले पाहिजे, ही माझी भूमिका आहे.- गणपतराव पाटील, अध्यक्ष श्री दत्त साखर कारखाना, शिरोळ.बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यातून आमचे प्रयत्नही सुरू आहेत. कामगार व कर्मचारी यांची नोकर वर्ग एवढीच व्याख्या न करता तेही समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. प्रत्येकांशी संवाद साधण्याचे काम करीत राहिल्याने कामगार वर्गाशीही आमचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. कारण शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावरच पुढे जायचे आहे. ते नेहमीच मनात ठेवून प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करावे लागेल, असे मला मनापासून वाटते.