शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

पालिकांना पाणी वापराची यादी देणे सक्तीचे

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

दर तीन वर्षांनी आढावा : महसुली तूट रोखण्यासाठी जलसंपदा खात्याने दिले आदेश

अमर पाटील - कळंबा -बेभरवशाचा पाऊस, धरणातील दरवर्षीचा अत्यल्प पाणीसाठा, पाणी वाटपाचे बिघडणारे गणित, पाण्याची प्रचंड मागणी व अयोग्य वापर या साऱ्यांची सांगड घालताना जलसंपदा खात्यास नाकीनऊ येते. प्रत्येकवर्षी वित्तीय तूट सहन करावी लागत असल्याने हा विभाग तोट्यात येत आहे. पाण्याचे वाटप कोणास किती प्रमाणात केले याची यादी आता पालिका, नगरपालिका व कारखान्यांना जलसंपदा विभागास देणे बंधनकारक केले आहे. जसा पाण्याचा वापर तशी पाणीपट्टी वसुली करून खात्याचा महसूल वाढविणे हे उद्दिष्ट निश्चित केले आहे.याबाबत जलसंपदा खात्याने नोटिसा पाठविल्या असून, संबंधित संस्था खात्याकडून घेणारे पाणी कोणास देतात, याची यादी सादर केली नाही, तर पाच टक्के दंड, पुढील वर्षापासून पाणी न देण्याची तंबीच या नोटिसीद्वारे संबंधित प्रशासनास दिली आहे.खात्याने १ एप्रिल ते पुढील वर्षाचा ३१ मार्च असा कालावधी गृहित धरून नव्याने करारनामे करण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. ज्यांचा आढावा दर तीन वर्षांनी अधीक्षक अभियंत्यांनी घेणे बंधनकारक आहे.वित्तीय तूट रोखण्यासाठी आता कडक उपाययोजना आखली असून, यात बिगर सिंचन पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कायद्याचा बडगाही उगारला आहे. वास्तविक खात्याकडून पाणी वापराचे आरक्षण मंजूर करताना ९० टक्के घरगुती १० टक्के वाणिज्य अशी फोड केली जाते. गरजेप्रमाणे व मंजूर कोट्यानुसार पाणी मोजून दिले जाते.जलसंपदा खाते संबंधित विभागाकडून यासाठी ढोबळ आकाराने रक्कम आकारते. ज्यामुळे प्रत्यक्ष महसूल कमी मिळतो; पण संबंधित प्रशासकीय संस्था मनमानी आकारणी करून नफ्यात आहेत. या सगळ््यास चाप बसण्यासाठी खात्याने धोरणात बदल केला असून, यापुढे करारनामे करताना घरगुती व औद्योगिक पाणी वापराचे प्रमाण प्रत्यक्ष वापरानुसार होणार आहे. त्यानुसार संस्थांकडून याद्या घेऊन त्यांच्या संमतीने नवीन करारनामे करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी नगरपालिका, पालिका, कारखाने यांच्याकडून पाणी पुरविले जात असलेल्या वैयक्तिक पाणी वापर धारकांच्या याद्या घेण्याचे आदेश दिले आहेत, अन्यथा पाणी दिले जाणार नाही. जलसंपदा खात्याचे सचिव यशवंत भदाले यांनी हा आदेश जलसंपदा खात्याच्या सर्व विभागांना तसेच राज्यातील पालिका, नगरपरिषद, औद्योगिक वसाहती व कारखान्यांना दिला आहे. ज्यांची कार्यवाही बंधनकारक राहणार हे निश्चित.पाणीवाटप९०%घरगुती१०%वाणिज्य