शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

‘कृष्णा नळपाणी’ची चौकशी करा

By admin | Updated: June 7, 2014 01:04 IST

इचलकरंजीतील नागरिकांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : इचलकरंजी शहरासाठी राबविण्यात आलेल्या कृ ष्णा नळपाणी पुरवठा योजनेला वारंवार गळती लागून कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे, तर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून या योजनेच्या कामाची चौकशी करावी तसेच पंचगंगा नदी सतत प्रवाहित ठेवण्यात यावी, नागरिकांना पाणीटंचाईच्या जोखडातून मुक्त करण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन आज घर कामगार मोलकरीण सखी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचे चिटणीस डी. आर. सावंत यांनी हे निवेदन स्वीकारले. इचलकरंजी नगरपालिकेने शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पंचगंगा व कृ ष्णा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. पंचगंगा नदी प्रदूषित असल्याने तेथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. कृष्णा योजनेच्या पाईपला गळती लागल्याने सहा दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा गळती सुरू झाली आहे. जीवन प्राधिकरणाने केलेल्या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. त्यामुळे जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. म्हणूनच या योजनेची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. इचलकरंजीकरिता पाणीपुरवठा सुधारण्याकरिता हस्तक्षेप करून इचलकरंजीतील नागरिकांची पाणीटंचाईच्या जोखडातून मुक्तता करावी, अशाही मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील चिटणीसांना भेटलेल्या शिष्टमंडळात रघुनाथ कांबळे, आनंदा गुरव, छाया नाईक, वैशाली कांबळे, जयश्री घाटगे, कमल पारीख, संपत कांबळे, अभिमन्यू चव्हाण, आदींचा समावेश होता.