शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अवजारांच्या घोटाळ्याची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

जयसिंगपूर : राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा असून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल करून चौकशी करावी आणि दोषी ...

जयसिंगपूर : राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा असून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल करून चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मुंबई मंत्रालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवेदनाद्वारे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली.

राज्य शासनाने विकत घेतलेली सुमारे ८५ हजार अवजारे राज्यातील कृषी अधीक्षकांनी संबंधित शेतकऱ्यांना वाटलेली नाहीत. या अवजारांमध्ये एचडीपीई पाइप, सिंचन पंप, मळणी यंत्र, स्वयंचलित यंत्र, पॉवर ट्रिलर, ट्रॅक्टर चलित अवजारे आदी अवजारांचा समावेश आहे. राज्यातील अत्यल्प भूधारक, आदिवासी तसेच मागासवर्गीय व साधारण गटातील शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी अवजारे मंजूर केलेली आहेत. त्यासाठी जिल्हानिहाय अनुदानदेखील दिले आहे. मात्र, काही जिल्ह्यांतील ठेकेदारांनी कृषी विभागाच्या ताब्यात दिली. मात्र, ती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. त्यामुळे कृषी अवजारांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगसगिरी झालेली आहे. तीन वर्षांपासून अवजारे गंजून पडलेली आहेत. ही बाब निश्चितच धक्कादायक आहे. संबंधित अधिकाऱ्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कृषी विभागात सावळा गोंधळ तसेच बोगसगिरी उघड झालेली आहे. तसेच ही अवजारे शेतकऱ्यांसाठी होती की, अधिकारी तसेच ठेकेदारांना पोसण्यासाठी होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस बिले घेऊन अनुदान लाटल्याचे धक्कादायक प्रकार अनेक जिल्ह्यांत घडलेले आहेत. काही प्रकरणांत अवजारे चोरीस गेल्याचे नमूद केले आहे. अशा बाबी धक्कादायक असून राज्य शासनाची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून सखोल तपासणी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

फोटो - ३००३२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - मुंबई येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन दिले.