शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अवजारांच्या घोटाळ्याची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

जयसिंगपूर : राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा असून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल करून चौकशी करावी आणि दोषी ...

जयसिंगपूर : राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा असून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल करून चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मुंबई मंत्रालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवेदनाद्वारे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली.

राज्य शासनाने विकत घेतलेली सुमारे ८५ हजार अवजारे राज्यातील कृषी अधीक्षकांनी संबंधित शेतकऱ्यांना वाटलेली नाहीत. या अवजारांमध्ये एचडीपीई पाइप, सिंचन पंप, मळणी यंत्र, स्वयंचलित यंत्र, पॉवर ट्रिलर, ट्रॅक्टर चलित अवजारे आदी अवजारांचा समावेश आहे. राज्यातील अत्यल्प भूधारक, आदिवासी तसेच मागासवर्गीय व साधारण गटातील शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी अवजारे मंजूर केलेली आहेत. त्यासाठी जिल्हानिहाय अनुदानदेखील दिले आहे. मात्र, काही जिल्ह्यांतील ठेकेदारांनी कृषी विभागाच्या ताब्यात दिली. मात्र, ती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. त्यामुळे कृषी अवजारांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगसगिरी झालेली आहे. तीन वर्षांपासून अवजारे गंजून पडलेली आहेत. ही बाब निश्चितच धक्कादायक आहे. संबंधित अधिकाऱ्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कृषी विभागात सावळा गोंधळ तसेच बोगसगिरी उघड झालेली आहे. तसेच ही अवजारे शेतकऱ्यांसाठी होती की, अधिकारी तसेच ठेकेदारांना पोसण्यासाठी होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस बिले घेऊन अनुदान लाटल्याचे धक्कादायक प्रकार अनेक जिल्ह्यांत घडलेले आहेत. काही प्रकरणांत अवजारे चोरीस गेल्याचे नमूद केले आहे. अशा बाबी धक्कादायक असून राज्य शासनाची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून सखोल तपासणी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

फोटो - ३००३२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - मुंबई येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन दिले.