शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

व्याज सवलत योजना फसवी

By admin | Updated: July 7, 2016 00:41 IST

शेतकऱ्यांतून संताप : पीक कर्ज परताव्याचे २0 कोटी गेल्या दोन वर्षांपासून अडकले

राजाराम लोंढे - कोल्हापूरशेतकऱ्यांसाठीच्या पीक कर्ज व्याज सवलत योजनेतील २0 कोटी रुपयांचा परतावा अद्याप केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेला नाही. सरकारकडून दोन-तीन वर्षांचे एकदम पैसे येत असल्याने विकास संस्था शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करतात. त्यामुळे ही व्याज सवलत योजना शेतकऱ्यांसाठी ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशीच झाली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारने ‘डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना’ आणली. त्यात केंद्र सरकारनेही सहभाग घेऊन शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत शून्य टक्के, तर तीन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. एक लाखापर्यंतच्या कर्जाचे तीन-तीन टक्के व्याज केंद्र व राज्य सरकार देते; तर एक लाख ते तीन लाखांपर्यंतच्या कर्जाचे तीन टक्के केंद्र व एक टक्का व्याज राज्य सरकार बॅँकांना देते. त्यामुळे विकास संस्थांनी शेतकऱ्यांकडून या व्याजदरानेच आकारणी करावी, अशी ही व्याज सवलत योजना सांगते; पण प्रत्यक्षात केंद्र व राज्य सरकारकडून दोन-अडीच वर्षे व्याजाचा परतावा मिळत नसल्याने जिल्हा बॅँकेने विकास संस्थांच्या खात्यातून व्याज वसूल करण्यास सुरुवात केली. बॅँक व्याज घेते म्हटल्यावर विकास संस्थांनी शेतकऱ्यांकडून वसुली सुरू केली. सुरुवातीच्या काळात संस्थांनी व्याज वसुली केली नाही; पण ताळेबंद कोलमडल्याने त्यांनी सुरुवात केली. जिल्हा बॅँकेअंतर्गत वर्षाला जवळपास १२०० कोटी पीक कर्जाचे वाटप केले जाते. त्यापैकी एक लाखापर्यंतचे व तीन लाखांपर्यंतचे कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे दीड लाख आहे. गेले २०१३-१४ व २०१४-१५ या कालावधीतील २0 कोटी रुपयांचा व्याज परतावा आलेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. असा मिळतो शेतकऱ्यांना परतावा...केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेत परतफेडीचा कालावधी वेगवेगळा आहे. त्यातच ऊस पिकाचा कालावधी १६ ते १८ महिने असल्याने लवकर वसूल होत नाही. परिणामी, अनेक शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरतात. जे काही पात्र ठरतात, त्यांच्या खात्यावर दोन वर्षांनी विकास संस्था परतावा जमा करतात. उशिराला सरकारच जबाबदारव्याजाचा परतावा देण्यासाठी सरकारकडून सर्व सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅँकांचे प्रस्ताव मागविले जातात. सहकारी बॅँकांचे प्रस्ताव नाबार्ड, तर राष्ट्रीयीकृत बॅँकांचे थेट रिझर्व्ह बॅँकेच्या माध्यमातून दाखल होतात. देशातील सगळ्या बॅँकांचे प्रस्ताव आल्यानंतर परताव्याची रक्कम काढली जात असल्याने वेळ होत असल्याचे बॅँकांचे म्हणणे आहे. नवीन योजनेमुळे टक्का कमी केंद्र सरकारने तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज चार टक्के व्याजाने देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील योजनेपेक्षा एक टक्क्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असला तरी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊन परतावा वेळेत देणे गरजेचे आहे.