शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

साहित्यिक, वाचक यांचा संवाद साधला जावा

By admin | Updated: May 20, 2016 00:31 IST

नवोदित लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ : मुस्लिम मराठी साहित्य संमेलन उद्यापासून कोल्हापुरात

संतोष तोडकर -- कोल्हापूर --मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून मुस्लिम बोर्डिंग हाऊसतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, शनिवारपासून दोन दिवसीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने...साहित्य संमेलन हा त्या भाषेतील समाजाचा वाङ्मयीन उत्सवच असतो. त्यामुळे अशा संमेलनाकडून साऱ्यांच्याच अपेक्षा असतात. साहित्य संमेलनांमध्ये पूर्वीचे साहित्य कसे होते, त्याचे आजचे स्वरूप कसे आहे आणि भविष्यात साहित्यसृष्टीत कोणते बदल होऊ शकतात, कसे बदल अपेक्षित आहेत, यावर चर्चा होणे अपेक्षित असते. साहित्य चळवळीला बळ मिळावे, ती अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने कोणती पावले टाकली जावीत, याची दिशा ठरविण्यासाठी ते उपयुक्त असते. तसेच साहित्यिक-वाचक यांचा एकमेकांशी संवाद व्हावा, अशी अपेक्षा असते. मराठी भाषेतील शिखर समजले जाणारे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ अनेकदा राजकीय प्रचाराची व्यासपीठे आणि वादावादीचे कें द्र बनल्याचे आपण पाहतो. वाचक अशा संमेलनांपासून दुरावत असल्याचे दिसते. तसेच अशा प्रस्थापित साहित्य संमेलनातून नवोदित मुस्लिम लेखकांना व त्यांच्या ग्रंथसंपदेला नेहमीच दुर्लक्षित केले गेल्याने मुस्लिम मराठी लेखकही अशा व्यासपीठापासून कोसो दूर असल्याचे चित्र दिसते. मुस्लिम मराठी साहित्यात १५ व्या शतकापासून संतसाहित्याची परंपरा आढळते; परंतु आजवर मुस्लिम साहित्यकांना हक्काचे व्यासपीठ न मिळाल्याने काही अपवाद वगळता त्यांची ग्रंथसंपदा समाजासमोर आलीच नाही. कोणतेही साहित्य हे त्या काळातील समाजाचे प्रतिबिंब असते. वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यांत व कालावधीत समाजाचे चित्रण, सार्वभौम मुस्लिम अस्मिता, जीवनशैली, सर्वसमावेशक इस्लाम संस्कृती, इतिहास या गोष्टी सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे ‘मुस्लिम मराठी साहित्य संमेलन’ भरविणे ही काळाची गरज बनली. या संमेलनात सुमारे पाचशे लेखक हजेरी लावणार आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या चर्चा, परिसंवाद, वैचारिक घुसळणीतून नवे विचार समाजाला मिळतील. अनेक समस्यांवर साधक-बाधक चर्चा होतील. अशा साहित्य संमेलनात वाचकांना सहभागी करून घेऊन वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न होतील. नवोदित मुस्लिम मराठी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने मराठी साहित्यविश्वात मोलाची भर पडेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. मुस्लिम लेखक हे महाराष्ट्रभर विखुरलेले आहेत. त्यांच्या समस्या, दुखणी वेगळी आहेत. सर्वसामान्य मराठी वाचकांना त्यांचं जग अपरिचित आहे. मुस्लिम साहित्याची नोंद मराठी साहित्यात घेतली जात आहे. रसिकांनाही आता या साहित्याबद्दल कुतूहल वाटत आहे. अशा साहित्य संमेलनामुळे वेगळे आवाज मराठी साहित्याला समृद्ध करतील. - शफाअत खान, अध्यक्ष, मुस्लिम मराठी साहित्य संमेलनया संमेलनात विविध क्षेत्रांतील विचारवंतांच्या परिसंवाद, चर्चेतून अनेक मौलिक विचार साहित्य चळवळीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील. नव्या लेखकांना व्यासपीठ मिळाल्याने साहित्यनिर्मितीस चालना मिळेल.- गणी आजरेकर, निमंत्रक, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन