शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

उसाच्या कांड्यालाही विमा

By admin | Updated: June 19, 2015 00:21 IST

शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन : खरिपासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

म्हाकवे : खरीप हंगामातील पिकांचे नैसर्गिक आपत्ती, रोग व किडीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व आर्थिक साहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये आता ऊस पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. उसाच्या कांड्याला शासनाने विम्याचे सुरक्षाकवच दिल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आणि विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये ऊस पिकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे उसावरील पांढरा लोकरी मावा, तांबेरा, बुरशी, हुमणी यांसह अतिवृष्टी, महापूर, आदी नैसर्गिक आपत्तींमुळे उसाचे नुकसान झाल्यास येथील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. याचा शासनस्तरावर विचार होऊन भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ज्वारी, आदी पिकांबरोबरच ऊस पिकाचाही कृषी विमा योजनेमध्ये समावेश केला आहे. तसेच यंदाच्या खरीप हंगामातील पीक विम्यांचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. खरिपातील पिकांना नुकसानीच्या ६० टक्के जोखीम स्तर असून, केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच टक्के विमा हप्त्यांची रक्कमही भरली जाणार आहे. तर ऊस पिकासाठी ८० टक्क्यांपर्यंत जोखीम स्तर असून, आडसाली पूर्वहंगामी सुरू खोडवा, आदी सर्वच ऊसक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. पिकाचे नाव, शेतकऱ्याने भरावयाची हप्त्याची रक्कम व कंसात विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टरमध्ये) असे : भात ३८५ (१५,४००), ज्वारी २८८ (११,५००), सोयाबीन ६४१ (१८,३००), नाचणी ३२८ (१३,१००), भुईमूग (२४,७००), तर आडसाली ऊस १५,७३४ (१ लाख ८५ हजार १००), पूर्वहंगाम सुरू १३,६०९ (१ लाख ६० हजार १००), सुरू ऊस १२,४८७ (१ लाख ४६ हजार ९००), खोडवा ऊस १०,७९५ (१ लाख २७ हजार). तसेच या सर्व पिकांच्या विमा हप्त्यांमध्ये अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना दहा टक्क्यांपर्यंत सूट मिळणार असून, ही रक्कम शासन भरणार आहे.या योजनेंतर्गत महापूर, चक्रीवादळे, भूस्खलन, गारपीट यांसह रोग, किडी, आदींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ४८ तासांत शासनाच्या कृषी विभागाला कळविणे आवश्यक आहे.विशेष बाब म्हणजे कुळाने अथवा खंडाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतीसाठी कर्ज घेतलेले अथवा न घेतलेले शेतकरीही स्वेच्छेने यामध्ये सहभागी होऊ शकतात. सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी पिकांच्या पेरणीनंतर एक महिन्यात अथवा जास्तीत जास्त जून ते जुलैपर्यंत विमा हप्ता भरून सहभागी होऊ शकतात. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत सहभागी होऊन निश्चित राहावे. बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्ती अथवा रोगराईचा प्रभाव होऊन पिकांचे कधी नुकसान होईल, हे सांगता येत नाही. कमाल विमा संरक्षित रक्कम सरासरी उत्पन्नाच्या १५ टक्क्यांपर्यंत मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी ही विमा योजना आहे. - मोहन आहोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.