शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

हस्तक्षेपाशिवाय पूररेषा तयार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजनिअर्स या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन ...

येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजनिअर्स या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली शहरांसह शिरोळ तालुक्याची पूरस्थितीतील गंभीरता कमी आणण्यासाठी पंचगंगेचे पाणी भूमिगत पद्धतीने थेट राजापूर बंधाऱ्याखाली नेता येईल का यावर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीनही महापुरावेळी वेगवेगळी परिस्थिती होती. त्यामुळे त्यावर एकच उत्तर नाही. कोयना, वारणा धरण आणि कोल्हापूर जिल्ह्यात धरण प्रदेशात मोठा पाऊस झाला की सगळे पाणी कृष्णेत येते. राजापूर बंधाऱ्याच्या अलीकडे प्रचंड पाणी फुगवटा तयार होतो. त्याचा फटका सांगली, म्हैसाळ, राजापूरसह शिरोळ तालुका आणि कोल्हापूर शहरालाही बसतो. त्यामुळेच हे पाणी राजापूर बंधाऱ्याच्या खाली नेण्याचा विचार आहे. योजना खर्चिक आहे. परंतु, काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे.

बदलत्या परिस्थितीची मांडणी करताना पाटील म्हणाले, भान विसरून आम्ही कामाला लागलो. कुठेही गेले तरी गाडीच्या टायरला माती लागू नये यासाठी पेव्हिंग ब्लॉक घालत सुटलो. पाणी मुरण्याच्या जागा बंद केल्या. परिणामी नद्या, नाल्यांचे पाणी बाहेर पडू लागले. आता नव्याने पूररेषा करावी लागेल. ज्यामध्ये पूर्ण स्पष्टता असेल. फ्लॅट किंवा जागा घेताना येथे किती पाणी येऊ शकते याची माहिती आधीच ग्राहकाला मिळाली पाहिजे. ग्रामीण आणि शहरी नियमांमध्येही मोठा फरक असतो. त्यामुळे ग्रामपंचायती महानगरपालिकांमध्ये विलीन होण्यास तयार नसतात. शहराजवळच्या ग्रामपंचायतींबाबतच्या नियमांबाबतही फेरविचाराची गरज आहे. अत्यावश्यक ठिकाणी नदीला भिंत घालून आपण ठरावीक पातळीपर्यंत दक्षता घेेऊ शकतो.

चौकट

पाटील म्हणाले, यंदा धरणातून पाणी सोडण्याचे जे आम्ही नियोजन केले त्याला यश आले. त्यामुळे पुराची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. पालकमंत्री सतेज पाटीलही सातत्याने याबाबत पाठपुरावा करत होते. वडनेरे समितीने जरी अलमट्टीचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले असले तरी तेथील पाण्याचा विसर्ग वाढला की आपल्याकडील पाणी वेगाने खाली जाण्यास मदत होते हे मान्यच करायला हवे. म्हणूनच मी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेतली होती. याआधी कधीही याबाबत दोन्ही राज्यांचा इतका प्रभावी समन्वय नव्हता, असे कर्नाटकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आमच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी साडेतीन लाख क्युसेकपर्यंत पाणी सोडण्याची भूमिका घेतली.