शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कलानगर-चंदूर मार्गावरील रेंगाळलेल्या पुलाची पाहणी

By admin | Updated: July 1, 2016 23:41 IST

अहवालाकडे लक्ष : प्रवीण किडे यांच्यासह पथकाकडून शहानिशा

इचलकरंजी : कलानगर-चंदूर मार्गावरील रेंगाळलेल्या पुलाच्या कामाची पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी पथकासह शुक्रवारी पाहणी केली. यावेळी परिसरातील तक्रारदार नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर हा पूल मंजूर झाला असल्याने अधिकाऱ्यांनी यातून तत्काळ मार्ग काढून पुलाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिल्या.कलानगर-चंदूर मार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू झाले. कॉलम उभारल्यानंतर पुलाची संभाव्य उंची लक्षात आली. या उंचीचा पूल उभारल्यास या मार्गाला येऊन मिळणारे दोन रस्ते बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या परिसरातील काही ग्रामस्थांनी पुलाची उंची कमी करावी, अशी मागणी केली. मंजूर झालेल्या पुलाची उंची कमी करणे आपल्या हातात नसल्याचे सांगत मक्तेदार व हातकणंगले बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरूच ठेवले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी या मार्गावरून होणाऱ्या ऊस व यंत्रमाग उद्योगातील वाहनांना मार्गाची व्यवस्था करा, अशी मागणी केली. त्यामुळे पुलाचे काम सहा महिन्यांपासून बंद पडले आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक एस. आर. साळोखे, कार्यकारी अभियंता डी. एस. पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पाहणीनंतर कोणता निर्णय घेतला जातो? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)रस्ता निकृष्ट दर्जाचा : पावसाळ्यात कसरतचंदूरसह रुई व कबनूरच्या वाढीव वसाहतींकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरील नागरिकांची पुलाचे काम तटल्याने गैरसोय होऊ लागली. पर्यायी निर्माण करण्यात आलेला तात्पुरता रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते. या पुलाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी करत रास्ता रोकोसह विविध आंदोलने करून आमदार सुरेश हाळवणकर यांना निवेदने देण्यात आली. त्यावर हाळवणकरांनी परिसरातील नागरिकांचे म्हणणे व पुलाच्या उंचीसंदर्भातील तांत्रिक अडचणी तपासून पाहून मार्ग काढून तत्काळ पूल बांधावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. त्यानुसार पुणे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता किडे यांनी शुक्रवारी पाहणी करून परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.