शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

संगणक खरेदी रद्द करून प्रकरणाची राज्य शासनामार्फत चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:35 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात एकाच दिवसात झालेल्या १ कोटी ४८ लाखांची संगणक खरेदी रद्द करून ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात एकाच दिवसात झालेल्या १ कोटी ४८ लाखांची संगणक खरेदी रद्द करून त्याची चौकशी राज्य शासनामार्फत करावी, असा महत्त्वपूर्ण ठराव गुरुवारी झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत झाला. कुणालाही विश्वासात न घेता केवळ ४४ लाखांच्या भ्रष्टाचारासाठी हा सगळा खरेदीचा खटाटोप केलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही बैठकीत झाली. यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करण्याचेही ठरले.

जिल्हा परिषदेत गेल्या महिनाभरापासून संगणक खरेदीचा विषय गाजत आहे. याचे पडसाद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पडसाद गुरुवारी झालेल्या सभेत उमटले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर जोरदार चर्चा झाली. स्वत: अध्यक्ष पाटील यांनी अमन मित्तल यांनी गोड बोलून जाता जाता चांगली खुट्टी मारली, कुणालाही विश्वासात न घेता केलेले हे कृत्य चुकीचे आहे. अशा अधिकाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असे सांगितले. सदस्य शिवाजी मोरे यांनी, तर यात सरळ सरळ ४४ लाखांचा अपहार केला असल्याचा आरोप केला. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्र पाठवणार असल्याचे आणी यासंदर्भात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

चौकट ०१

काय आहे प्रकरण

पाणीपुरवठा विभागाला पाच लॅपटॉपची गरज होती, सादीलवार खर्चातून निधीची तरतूद केली होती. पण अचानकपणे यात बदल करून लॅपटॉप ऐवजी संगणकासह प्रिंटरचाही अंतर्भाव केला गेला. जलव्यवस्थापन, स्थायी, सर्वसाधारण सभा, यापैकी एकाही टप्प्यावर फाइल न पाठवता परस्पर १६८ संगणक खरेदी करून ते तालुकास्तरावर पोहोचलेदेखील. यासाठी १ कोटी ४८ लाखाचा निधीही अध्यक्ष, पदाधिकारी यांना विश्वासात न घेता खर्चही करून टाकला.

चौकट ०२

मागणी नसतानाही खरेदी

तालुकास्तरावरून संगणक व प्रिंटरची मागणी नव्हती. तरीदेखील याची खरेदी केली गेली, व ते मुरवण्यासाठी अधिकारी संख्येची माहिती न घेताच वाटप केले गेले. गगनबावड्यात दोन अधिकारी असताना चार संगणक प्रिंटरसह पोहच झाले. एवढे करूनही शिल्लक राहिल्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी सहा संगणक दिले गेले आहेत. संगणक दिलेल्यांपैकी कोणाचीही मागणी नव्हती.