शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ कामांची चौकशी करा

By admin | Updated: May 30, 2017 16:38 IST

शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : अधिकारी-ठेकेदारांनी योजना लुटल्याचा आरोप

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : जलयुक्त योजनेतून जिल्ह्यात झालेल्या कामांची जबाबदार अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे केली.

गगनबावडा तालुक्यातील साखरी-म्हाळुंगे कामात अधिकारी व ठेकेदाराने मोठा ढपला पाडला असून तालुक्यातील सर्वच कामे संगनमताने लुटल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला. ‘जलयुक्त’ मधील कामातील भ्रष्टाचाराबाबत मंगळवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. कृषी, वन विभागाच्या कारभाराच्या पंचनामा करणाऱ्या घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून सोडला. त्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले.

पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरून पाण्याची पातळीत वाढ व्हावा, हा चांगला हेतू ‘जलयुक्त’ बाबत सरकारचा आहे. पण दुर्देवाने हा हेतू बासनात गुंडाळून ठेवण्याची करामत काही अधिकाऱ्यांनी केली आहे. अनेक तालुक्यात निकृष्ट दर्जाची कामे झाली असून पाणी मुरूण्याऐवजी पैसे मुरवण्याचे काम अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप संजय पवार यांनी केला.

गेले दोन वर्षात जिल्ह्यात ’जलयुक्त’ची झालेल्या कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करावी, त्यातून वस्तूस्थिती समोर येईल, असेही त्यांनी सांगितले. कुंभोज, तमदलगे येथे झालेल्या ‘जलयुक्त’च्या कामाची चौकशी झाली पण अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांनीच हा अहवाल दडपला आहे. तो खुला करा म्हणजे बडे मासे सापडतील, असे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. यावर ‘जलयुक्त’च्या झालेल्या कामांची माहिती घेऊन चौकशीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.

यावेळी दादांना अधिकाऱ्यांनी फसवले!

मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ‘जलयुक्त’ बाबतची भूमिका चांगली आहे. पण यापुर्वीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या समोर वस्तूस्थिती ठेवली नसल्याने या कामांचा बोजवारा उडला आहे. दादांना अधिकाऱ्यांनी फसवल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

‘साखरी-म्हाळुंगे’ प्रकरणी पैसे दिले कोणाला?

साखरी-म्हाळुंगे येथील निकृष्ट कामाचा शिवसेनेने पर्दाफाश केला. त्यावेळी कृषी अधिकारी नामदेव परीट यांनी थेट आॅफर देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली. त्यापुढेही जाऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला तीन लाख दिल्याचे म्हटले, पण परीट यांनी हे पैसे दिले कोणाला आणि घेतले कोणी याचे नाव जाहीर त्यांनी जाहीर करावे अन्यथा कायदेशीर मार्गाने शोधून काढू, असा इशारा पवार यांनी दिला.