शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ कामांची चौकशी करा

By admin | Updated: May 30, 2017 16:38 IST

शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : अधिकारी-ठेकेदारांनी योजना लुटल्याचा आरोप

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : जलयुक्त योजनेतून जिल्ह्यात झालेल्या कामांची जबाबदार अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे केली.

गगनबावडा तालुक्यातील साखरी-म्हाळुंगे कामात अधिकारी व ठेकेदाराने मोठा ढपला पाडला असून तालुक्यातील सर्वच कामे संगनमताने लुटल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला. ‘जलयुक्त’ मधील कामातील भ्रष्टाचाराबाबत मंगळवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. कृषी, वन विभागाच्या कारभाराच्या पंचनामा करणाऱ्या घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून सोडला. त्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले.

पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरून पाण्याची पातळीत वाढ व्हावा, हा चांगला हेतू ‘जलयुक्त’ बाबत सरकारचा आहे. पण दुर्देवाने हा हेतू बासनात गुंडाळून ठेवण्याची करामत काही अधिकाऱ्यांनी केली आहे. अनेक तालुक्यात निकृष्ट दर्जाची कामे झाली असून पाणी मुरूण्याऐवजी पैसे मुरवण्याचे काम अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप संजय पवार यांनी केला.

गेले दोन वर्षात जिल्ह्यात ’जलयुक्त’ची झालेल्या कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करावी, त्यातून वस्तूस्थिती समोर येईल, असेही त्यांनी सांगितले. कुंभोज, तमदलगे येथे झालेल्या ‘जलयुक्त’च्या कामाची चौकशी झाली पण अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांनीच हा अहवाल दडपला आहे. तो खुला करा म्हणजे बडे मासे सापडतील, असे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. यावर ‘जलयुक्त’च्या झालेल्या कामांची माहिती घेऊन चौकशीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.

यावेळी दादांना अधिकाऱ्यांनी फसवले!

मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ‘जलयुक्त’ बाबतची भूमिका चांगली आहे. पण यापुर्वीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या समोर वस्तूस्थिती ठेवली नसल्याने या कामांचा बोजवारा उडला आहे. दादांना अधिकाऱ्यांनी फसवल्याचे संजय पवार यांनी सांगितले.

‘साखरी-म्हाळुंगे’ प्रकरणी पैसे दिले कोणाला?

साखरी-म्हाळुंगे येथील निकृष्ट कामाचा शिवसेनेने पर्दाफाश केला. त्यावेळी कृषी अधिकारी नामदेव परीट यांनी थेट आॅफर देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली. त्यापुढेही जाऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला तीन लाख दिल्याचे म्हटले, पण परीट यांनी हे पैसे दिले कोणाला आणि घेतले कोणी याचे नाव जाहीर त्यांनी जाहीर करावे अन्यथा कायदेशीर मार्गाने शोधून काढू, असा इशारा पवार यांनी दिला.