शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राज्य बँकेने विक्री केलेल्या कारखान्यांच्या संचालकांची चौकशी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून कारखान्यांची विक्री केली. असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून कारखान्यांची विक्री केली. असे असताना भाजपचे नेते ईडीची कारवाई करत आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे साखर कारखाने अडचणीत आले त्या संचालकांची चौकशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

साखरेचे दर व द्यावी लागणारी ऊसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने साखर कारखाने कोट्यवधींच्या तोट्यात गेले. परिणाम राज्य बँकेचे कर्ज थकीत गेले आणि बँकही अडचणीत येऊ लागली. बँकेचा एनपीए वाढल्याने नाईलाजाने बँकांना साखर कारखाने विकण्याशिवाय पर्याय नसतो.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जे कारखाने विकले आहेत त्यांची किंमत करून प्रसिद्धी माध्यमातून निविदा काढून ज्यांची जास्त बोली आलेली आहे, त्यांनाच हे कारखाने विकले गेले आहेत. असे असताना केवळ राजकारण म्हणून यामध्ये घोटाळे आहेत. ईडीची चौकशी केली गेली. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून विक्री झालेल्या म्हणजेच सर्व ५४ कारखान्यांची चौकशी लावणार असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी तत्काळ विनाविलंब चौकशी लावावी. या सगळ्या व्यवहाराचे दूध का दूध, पानी का पानी यापूर्वीच झालेले आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी झालेली आहे, माजी न्यायाधीशांनीदेखील चौकशी केलेली आहे. त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. ज्या कारखान्यांच्या संचालकांनी कारखाने तोट्यात घातले त्यांची वास्तविक चौकशी होणे गरजेचे असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.