शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

औद्योगिक प्रकल्पाची वानवा

By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST

शाहूवाडी तालुका : नुसती आश्वासने, प्रकल्प कागदावर रखडले

राजाराम कांबळे -मलकापूर -शाहूवाडी तालुक्यात औद्योगिक प्रकल्पाची वानवा आहे. कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधींनी तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांना मुंबई-पुण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आजअखेर तालुक्याला आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. आश्वासनाचे प्रकल्प कागदावर रखडले आहेत. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शासनाने प्रत्येक तालुक्याला दूध संघ देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला होता. दूध महापूर योजनेला गती मिळावी व उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर देणे सुलभ व्हावे तसेच शेतीला पूरक असा हा व्यवसाय अधिक वृद्धिंगत व्हावा हा त्यामागील उद्देश होता. तालुक्यातील माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, करणसिंह गायकवाड, मानसिंगराव गायकवाड यांनी प्रस्ताव दाखल केले. दोन्ही गायकवाडांची दिलजमाई झाल्याने उदय सहकारी दूध संघाचे नेतृत्व करणसिंह गायकवाड यांचेकडे आले. राज्यातील सर्वच जिल्हा दूध संघांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात स्थगिती मिळविली. त्यामुळे दूध संघ कागदावर राहिला.सर्वच प्रकारच्या खेळाचे सखोल मार्गदर्शन व्हावे, त्यातून राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाने सन २००१ मध्ये तालुक्याला क्रीडा संकुलनाचा निर्णय जाहीर झाला. तत्कालीन माजी आमदार श्रीमती संजीवनी गायकवाड यांनी २००३ला बांबवडे येथे क्रीडा संकुलनाची मंजुरी मिळविली. बांबवडे ग्रामपंचायतीने चार एकर जागा देऊन या कामाचे २००६ला माजी आमदार सत्यजित पाटील, करणसिंह गायकवाड यांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभ करण्यात आला. पंचवीस लाख रुपये खर्चाचा पहिला दहा लाखांचा हप्ता खर्ची पडला. यामध्ये उर्वरित कामे देखील झाली. मात्र अद्याप बरीच कामे अपूर्ण आहेत.माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनीदेखील बजागेवाडी येथे सहकारी तत्त्वावर सूतगिरणीसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, यावेळी विरोधी पक्षाचे सरकार असल्याने त्यांना देखील या कामात यश मिळाले नाही. अखेर सूतगिरणी कागदावरच राहिली आहे. मानसिंगराव गायकवाड यांनी तालुक्यात साखर कारखाना काढला मात्र, कारखान्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. शाहूवाडी तालुक्याची पुनर्रचना घेऊन शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघ २००९ला निर्माण झाला. निवडणुकीदरम्यान आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडीत बॉक्साईटपासून तुरटी प्रकल्प, वारुळ येथे गाईचा गोठा प्रकल्प, अशी आश्वासने जनतेला दिली होती. मात्र, पाच वर्षे झाली तरी हे प्रकल्प कागदावरच राहिले आहेत.येथील लोकप्रतिनिधींनी जनतेला आश्वासनापलीकडे काहीच दिलेले नाही. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या गटाचा आमदार होण्यासाठी कार्यकर्ते गावा-गावांतील जनतेला आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. मात्र, निवडणूक संपली की पाच वर्षे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांकडे फिरकत नाहीत. एम.आय.डी.सी. जागेवरून वादमाजी आमदार श्रीमती संजीवनी गायकवाड यांनी वारुळ येथे मिनी एम.आय.डी.सी. मंजूर करून घेतली होती. मात्र, एम.आय.डी.सी. ही वारुळ की बांबवडे येथे, यावरून वाद निर्माण झाला. अखेर ही मिनी एम.आय.डी.सी. कागदावरच राहिली. दुसऱ्या गटाचे काम कसे बंद पडेल, आपला गट मोठा कसा होईल, याचाच फायदा राजकीय मंडळींनी घेतला आहे.