शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

त्रिसूत्रीवर भारताचा आर्थिक विकास

By admin | Updated: August 3, 2014 01:46 IST

यशवंत थोरात : यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलतर्फे व्याख्यान

कोल्हापूर : आर्थिक स्थैर्य, सर्वसमावेशक वृद्धी आणि सुशासन या त्रिसूत्रीच्या आधारावरच भारताचा सर्वंकष आर्थिक विकास साधता येऊ शकेल, असे प्रतिपादन ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. पी. थोरात यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलतर्फे आज, शनिवारी आयोजित ‘महत्त्वाकांक्षी भारतासाठी आर्थिक कार्यक्रम’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. डॉ. थोरात म्हणाले, आर्थिक स्थैर्य हा कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा मूलभूत पाया आहे. नियंत्रण, चलन मजबुती आणि व्याजदरावर नियंत्रण या तीन बाबींच्या योग्य संतुलनातून आर्थिक स्थैर्य व वृद्धिवाढ होऊ शकते. पुढच्या दहा वर्षांत भारताचा महासत्ता नव्हे, तर किमान मध्यम उत्पन्न गटात समाविष्ट व्हावा, यासाठी आजचा दरडोई वृद्धिदर १६०० डॉलर्सवरून ९००० डॉलर्सवर न्यावा लागणार आहे. यावरून आपल्यासमोरील आव्हानांची कल्पना येईल. त्याचप्रमाणे १९५० पासून आपण सामाजिक न्यायाधिष्ठता व सर्वसमावेशक वृद्धीचा पुरस्कार केला आहे. मूठभरांचे वृद्धीचे धोरण स्वीकारले तर राष्ट्राचे स्थैर्य धोक्यात येईल. त्याचप्रमाणे पारदर्शकता, विश्वासार्हता आणि निर्णय प्रक्रियेमध्ये शेवटच्या घटकाचा समावेश या तीन गोष्टींवर आधारित सुशासनाचा अंगीकार केला तरच विकास कार्यक्रमाला योग्य दिशा मिळेल. डॉ. थोरात पुढे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत भारत आणि भारतीयांच्या एकूणच जीवनप्रणालीला वळण देणाऱ्या घटकांचा सविस्तर आढावा घेतला. त्यामध्ये जागतिकीकरणामुळे सरकारकडून बाजाराकडे सरकलेली अर्थव्यवस्थेची सूत्रे, नागरिकांचा सरकारवरील वाढत असलेला प्रभाव, राष्ट्रीय राजधानीकडून राज्यांच्या राजधानीकडे सरकलेला प्रभाव, बिंदूशोषित घटकांमध्ये हक्कांसाठी झालेली जाणीवजागृती, तरुणांची वाढलेली लक्षणीय संख्या, महिला घटकांचा वाढता प्रभाव, शांतिप्रिय भारताला ग्रासलेला दहशतवाद आणि तटस्थ भारताचे बदललेले बहुसहयोगी परराष्ट्र धोरण या आठ घटकांचा मोठा प्रभाव भारताच्या आर्थिक कार्यक्रमावर पडणार आहे. डॉ. पवार म्हणाले, मूल्याधिष्ठित शिक्षणप्रणाली प्रशिक्षण कार्यक्रम राबवूनच भारतीय तरुणांना विकासाभिमुख दिशा देण्याची गरज आहे. तरुणाईच्या बळावर देशाला अर्थिक प्रगतिपथावर नेण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत, याबद्दल जबाबदारीने विचार केला पाहिजे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ए. बी. राजगे, डॉ. डी. व्ही. मुळे, यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलचे संचालक डॉ. व्ही. बी. जुगळे यांनी स्वागत केले; तर कविता वडाळी यांनी परिचय करून दिला. (प्रतिनिधी)