शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

स्वातंत्र्यदिनी वंचितांची घरे उजळली

By admin | Updated: August 17, 2016 23:53 IST

गगनबावड्यात विजेचे दिवे बसविले : ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर-साठे विचार मंच’चा उपक्रम

कोल्हापूर : देशात ७0 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करीत असताना इतक्या वर्षांत वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबांत आजही विजेचे दिवे नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, गगनबावड्यातील ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे विचार मंच’ने या परिसरातील वंचित घरांमध्ये विजेचे दिवे बसवून अंधार कायमचा दूर केला. स्वातंत्र्यदिनी विधायक उपक्रम राबविण्याकडे युवा पिढीसह संस्था-संघटनांचा कल असतो. वर्षानुवर्षे अंधारात जगत असलेल्या कुटुंबांत प्रकाश उजळविण्याचे काम ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे विचार मंच’ने केले. ग्रामविकास आणि जलसंपदा विभागाचे अव्वर सचिव मैनुद्दीन तासीलदार, डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी पांडुरंग कांबळे, दाऊद थोडगे, आवराबाई झुरे, अब्दुल नाकाडे, कांचन शिंदे यांच्या घरी मीटरसह विजेचे दिवे बसविण्यात आले आणि स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी या कुटुंबीयांचे घर प्रकाशाने उजळून निघाले. यावेळी कार्यक्रमाचे संकल्पक माजी सभापती बंकट थोडगे, शाहीर आझाद नायकवडी, अमर कांबळे, रंगराव कांबळे, यासीन महात, कुसीम नाकाडे, दिलदार कांबळे, राजू जाधव, यासीन शेख, जमीर मुकादम, मनोज सूर्यवंशी, पांडू कोलके, किशोर कांबळे, सतीश पानारी, बहादूर मकानदार, मुबारक उस्ताद, सिराज मुकादम, आदी उपस्थित होते.