शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

स्वातंत्र्यदिनी वंचितांची घरे उजळली

By admin | Updated: August 17, 2016 23:53 IST

गगनबावड्यात विजेचे दिवे बसविले : ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर-साठे विचार मंच’चा उपक्रम

कोल्हापूर : देशात ७0 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करीत असताना इतक्या वर्षांत वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबांत आजही विजेचे दिवे नाहीत, हे वास्तव आहे. मात्र, गगनबावड्यातील ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे विचार मंच’ने या परिसरातील वंचित घरांमध्ये विजेचे दिवे बसवून अंधार कायमचा दूर केला. स्वातंत्र्यदिनी विधायक उपक्रम राबविण्याकडे युवा पिढीसह संस्था-संघटनांचा कल असतो. वर्षानुवर्षे अंधारात जगत असलेल्या कुटुंबांत प्रकाश उजळविण्याचे काम ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे विचार मंच’ने केले. ग्रामविकास आणि जलसंपदा विभागाचे अव्वर सचिव मैनुद्दीन तासीलदार, डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी पांडुरंग कांबळे, दाऊद थोडगे, आवराबाई झुरे, अब्दुल नाकाडे, कांचन शिंदे यांच्या घरी मीटरसह विजेचे दिवे बसविण्यात आले आणि स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी या कुटुंबीयांचे घर प्रकाशाने उजळून निघाले. यावेळी कार्यक्रमाचे संकल्पक माजी सभापती बंकट थोडगे, शाहीर आझाद नायकवडी, अमर कांबळे, रंगराव कांबळे, यासीन महात, कुसीम नाकाडे, दिलदार कांबळे, राजू जाधव, यासीन शेख, जमीर मुकादम, मनोज सूर्यवंशी, पांडू कोलके, किशोर कांबळे, सतीश पानारी, बहादूर मकानदार, मुबारक उस्ताद, सिराज मुकादम, आदी उपस्थित होते.