शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भात मळणीसाठी ट्रॅक्टरचा वाढता वापर

By admin | Updated: November 17, 2014 23:53 IST

आजरा तालुका : पर्यावरणपूरक शेतीला धोका; भाताच्या उत्पादनात घट

कृष्णा साावंत -- पेरणोली --आजरा तालुक्यात भात सुगीचा हंगाम जोरदार सुरू झाला असून, पारंपरिक बैलांच्या मळणीऐवजी शेतकरी आता ट्रॅक्टरने भात मळणी काढू लागल्याने तालुक्यात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे.शेती, बळिराजा आणि बैलांचे अतूट असे नाते आहे. बैलाद्वारे केलेली शेती पर्यावरणपूरक मानली जाते. मात्र, औद्योगिक प्रगती झाली तशी शेतीमध्येही यंत्रसामग्री वाढत चालली आहे. शेतामध्ये आता बैलांना दिल्या जाणाऱ्या हाका कमी ऐकू येऊ लागल्या आहेत. त्याऐवजी ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, मळणीयंत्र यांचा आवाज घुमू लागला आहे.सध्या ग्रामीण भागात सर्वत्र भात मळणीची धांदल उडाली आहे. बैलांचे वाढलेले दर, खाद्यांच्या वाढलेल्या किमती आणि बैल बाळगण्याची शेतकऱ्यांमधील उदासीनता यामुळे बैल बाळगणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याऐवजी भाड्याने यंत्र घेऊन शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीनुसार खळ्यावर तिढा पद्धतीने मळणी काढली जात होती. तिढ्याला एक बैल बांधून त्याच्यासोबत पाच-सहा जनावरे बांधली जात होती. त्यांच्या पाठीमागे बैल हाकण्यासाठी एक व्यक्ती असायची. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून ही पद्धत बंद होऊन दोन बैलांची पाटा पद्धत आली. सध्या काही शेतकरीच पाटा पद्धतीचा अवलंब करतात.चालू हंगामात मात्र बहुतांश शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर व मळणी यंत्राकडे आहे. बैलांद्वारे होणाऱ्या मळणीत आणि यंत्राद्वारे होणाऱ्या मळणीत मोठा फरक आहे. यंत्राद्वारे काढलेली मळणी लवकर होत असली, तरी बैलांच्या मळणीतून मिळणारे भात अधिक आहे. बैलांच्या मळणीतून मिळणारा आनंद कमी होत चालला आहे. शेतीत वाढत चाललेल्या यंत्रसामग्रीमुळे बैलांच्या पर्यावरणपूरक शेतीला धोका निर्माण झाला आहे.तालुक्यात शेतकऱ्यांनी घनसाळ, रत्नागिरी, सारथी, सोनम यासह नवीन बियाणे वापरली आहेत. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने व मानमोडी रोगामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाताच्या उत्पादनात घट झाली आहे.