शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

कोयना धरणातील पाण्याच्या वापरात वाढ

By admin | Updated: December 19, 2014 00:29 IST

पातळी घटली : ८७.०१ टीएमसी पाणीसाठा

पाटण : वीजनिर्मिती आणि सांगलीकडील शेती व सिंचनासाठी पाण्याचा वापर वाढल्याने कोयना धरणातील पाणी कमी होऊ लागले आहे. धरणात केवळ ८७.०१ टीएमसीच पाणी शिल्लक आहे. १ जूनपासून आतापर्यंत ५३ टीएमसी पाण्यापासून १,५६२ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती केली असून, पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीकरून सांगलीकडे १६ टीएमसी पाणी सोडले आहे. कोयना धरणातील पाणी वापराचे तांत्रिक वर्ष १ जूनपासून सुरू होते. ते ३१ मे रोजी संपते. १०५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी वीजनिर्मितीला ६७.५० टीएमसी पाणी वर्षभरात करारानुसार दिले जाते. मात्र, गेल्या वर्षापासून या कराराचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी वीजनिर्मितीसाठी ८७ टीएमसीपर्यंत पाण्याचा वापर झाला होता. यावर्षी १ जूनपासून १,५६२ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती झाली. त्यासाठी आजपर्यंत ५३ टीएमसी पाणी वापरण्यात आले. मात्र, सप्टेंबरच्या मध्यंतरी धरण भरल्यानंतर पाणी दरवाजातून सोडण्यात आले. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दरवाजातून सोडण्यात आलेले पुराचे पाणी वगळता पायथा वीजगृहातून ३३ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती टप्पा क्रमांक एक व दोनमधून ५८१, चौथा टप्पातून ६३४ आणि टप्पा क्रमांक तीनमधून ३१४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती करून पाणी कोयना नदीपात्रअत व चिपळूणकडे सोडण्यात आले. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार १ जूनपासून आजअखेर सोळा टीएमसी पाणी पायथा वीजगृहात वीजनिर्मिती करून सोडण्यात आले. त्यामुळे यापुढे मे महिन्यापर्यंत पाच महिन्यांचा कालावधी कोयना धरणासाठी कसरतीचा ठरतो. वीजनिर्मितीची मागणी वाढते, दुसरीकडे पाणी टंचाईमुळे सांगलीकडील गावांना व कोयना नदीकाठच्या शेतीपिकांसाठी सतत पाण्याची मागणी होते. त्यामुळे कोयणा धरणातही खडखडाट होतो, हे राज्याने यापूर्वी अनुभवले आहे. (प्रतिनिधी) कोयना धरणातील पाण्याचा वापर आगामी पावसाळ्यापर्यंत झालेच पाहिजे. धरणात पाणीसाठा राखून ठेवणे म्हणजे योग्य नियोजन केले, असे नाही. धरणातील पाण्याचा वापर पूर्ण क्षमतेने होणे दरवर्षी गरजेचे असते. - एम. आय. धरणे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन