शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

कोल्हापूर विभागाच्या ‘आॅक्टोबर’च्या निकालात वाढ

By admin | Updated: November 26, 2014 00:23 IST

आॅनलाईन निकाल जाहीर : दहावी, बारावीत मुलींची आघाडी

कोल्हापूर : दहावी, बारावीच्या आॅक्टोबरच्या परीक्षेत यंदा कोल्हापूर विभागाचा निकाल सरासरी सात ते बारा टक्क्यांनी वाढला आहे. दहावीचा ३०.२, तर बारावीचा २५.१२ टक्के निकाल लागला आहे. तीन वर्षांनंतर निकालाच्या टक्केवारीचा आलेख वाढला असून, राज्यात कोल्हापूर दहावीमध्ये चौथ्या, तर बारावीत सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, मंगळवारी दुपारी एक वाजता दहावी व बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर केला.आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव शरद गोसावी, अध्यक्ष भीमराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. यावेळी शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, सहसचिव पी. डी. भंडारे, सहायक सचिव बाळासाहेब शेटे, लेखाधिकारी डी. वाय. कदम, आदी उपस्थित होते. गोसावी म्हणाले, कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी दहावीसाठी ४९, बारावीसाठी २५ परीक्षा केंद्रांवर २६ सप्टेंबर ते २० आॅक्टोबर या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी ९ हजार ४०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ८२३ विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्यांची टक्केवारी ३०.२ टक्के आहे. तसेच बारावीची परीक्षा ८ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी २ हजार १७३ जण उत्तीर्ण आहेत. त्यांची टक्केवारी २५.१२ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात १२.४० टक्के, तर बारावीच्या निकालामध्ये ६.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दहावीतील मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.५४, तर बारावीत १०.७७ टक्क्यांनी अधिक आहे. तीन वर्षांनी विभागाच्या निकालाचा आलेख वाढला आहे. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत झालेली जागृती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. या परीक्षांमध्ये गैरप्रकार करताना सापडलेल्या ११ जणांवर कारवाई केली आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत ४ डिसेंबरला दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकांची छायाप्रत उद्या, बुधवारपासून १५ डिसेंबरपर्यंत घेता येईल. तसेच मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर १२ डिसेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. (प्रतिनिधी)जिल्हानिहाय निकाल (%)जिल्हादहावी बारावी कोल्हापूर३६.३९२४.६२सांगली२८.२२२३.९३सातारा२४.९८ २६.७२उत्तीर्ण मुले-मुलींची टक्केवारीपरीक्षामुले मुलीदहावी२९.२४३२.७८बारावी२३.४२ ३४.१९राज्यात कोल्हापूर विभाग दहावीमध्ये चौथ्या, तर बारावीच्या आॅक्टोंबरच्या निकालात सहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.